शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

टोलनाक्यांवर ‘वसुली’ची अरेरावी

By admin | Updated: November 14, 2014 00:45 IST

लोकांतून संताप : सरकारच्या पावित्र्याचे ‘आयआरबी’ला बळ

कोल्हापूर : राज्यात नव्याने सत्तारुढ झालेल्या भाजपच्या सरकारने टोल संस्कृतीचे समर्थनच केल्याने आयआरबी कंपनीच्या येथील टोल नाक्यांवरील कर्मचाऱ्यांची अरेरावी वाढली आहे. आतापर्यंत कोल्हापूरच्या गाडया अडविल्या जात नव्हत्या परंतू आता त्या देखील अडवून ठेवल्या जावू लागल्या आहेत. त्यामुळे नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागत असल्याचे चित्र दिसत आहे.‘लोकमत’ ने गुरुवारी प्रमुख नाक्यांवर थांबून नेमकी वस्तूस्थिती पाहिली असता तोच अनुभव आला. टोलविरोधात रान पेटविलेल्या राज्यकर्त्यांबरोबर प्रशासनातील अधिकाऱ्यांना कोल्हापूरकरांनी वठणीवर आणले; पण या टोलमधून कोल्हापूरकरांची सुटका कधी, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. शहरात आय.आर. बी. कंपनीने ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा ’अर्थात बीओटी तत्त्वावर सुमारे ४९.४९ किलोमीटरचे रस्ते केले; पण ते निकृष्ट दर्जाचा आरोप शहरवासीय करूलागले आहेत. टोल विरोधात पेटविलेले रान राज्यभर पोहोचले. याचा धसका घेत नवीन आलेल्या भाजप सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधाऱ्यांना घालवा असा नारा देत,आमचे सरकार सत्तेवर आल्यावर राज्य टोलमुक्त करू, अशी घोषणा केली होती; परंतु भाजपने मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव घोषित केल्यावर फडणवीस यांनी अवघ्या काही तासांतच टोलसंस्कृती देशभर स्विकारली असून जे टोल मुदत संपल्यानंतरही वसूल केले जात आहेत असे अन्यायकारक टोल रद्द करु असे घूमजाव केले. त्यामुळे टोलचे भूत बाजूला होण्याची शक्यता धूसर बनली. परिणाम म्हणून टोलवसूलीच्या कर्मचाऱ्यांची दादागिरी सुरु झाली आहे. (प्रतिनिधी)