शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

टोलनाक्यांवर ‘वसुली’ची अरेरावी

By admin | Updated: November 14, 2014 00:45 IST

लोकांतून संताप : सरकारच्या पावित्र्याचे ‘आयआरबी’ला बळ

कोल्हापूर : राज्यात नव्याने सत्तारुढ झालेल्या भाजपच्या सरकारने टोल संस्कृतीचे समर्थनच केल्याने आयआरबी कंपनीच्या येथील टोल नाक्यांवरील कर्मचाऱ्यांची अरेरावी वाढली आहे. आतापर्यंत कोल्हापूरच्या गाडया अडविल्या जात नव्हत्या परंतू आता त्या देखील अडवून ठेवल्या जावू लागल्या आहेत. त्यामुळे नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागत असल्याचे चित्र दिसत आहे.‘लोकमत’ ने गुरुवारी प्रमुख नाक्यांवर थांबून नेमकी वस्तूस्थिती पाहिली असता तोच अनुभव आला. टोलविरोधात रान पेटविलेल्या राज्यकर्त्यांबरोबर प्रशासनातील अधिकाऱ्यांना कोल्हापूरकरांनी वठणीवर आणले; पण या टोलमधून कोल्हापूरकरांची सुटका कधी, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. शहरात आय.आर. बी. कंपनीने ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा ’अर्थात बीओटी तत्त्वावर सुमारे ४९.४९ किलोमीटरचे रस्ते केले; पण ते निकृष्ट दर्जाचा आरोप शहरवासीय करूलागले आहेत. टोल विरोधात पेटविलेले रान राज्यभर पोहोचले. याचा धसका घेत नवीन आलेल्या भाजप सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधाऱ्यांना घालवा असा नारा देत,आमचे सरकार सत्तेवर आल्यावर राज्य टोलमुक्त करू, अशी घोषणा केली होती; परंतु भाजपने मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव घोषित केल्यावर फडणवीस यांनी अवघ्या काही तासांतच टोलसंस्कृती देशभर स्विकारली असून जे टोल मुदत संपल्यानंतरही वसूल केले जात आहेत असे अन्यायकारक टोल रद्द करु असे घूमजाव केले. त्यामुळे टोलचे भूत बाजूला होण्याची शक्यता धूसर बनली. परिणाम म्हणून टोलवसूलीच्या कर्मचाऱ्यांची दादागिरी सुरु झाली आहे. (प्रतिनिधी)