शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

टोलनाक्यांवर ‘वसुली’ची अरेरावी

By admin | Updated: November 14, 2014 00:45 IST

लोकांतून संताप : सरकारच्या पावित्र्याचे ‘आयआरबी’ला बळ

कोल्हापूर : राज्यात नव्याने सत्तारुढ झालेल्या भाजपच्या सरकारने टोल संस्कृतीचे समर्थनच केल्याने आयआरबी कंपनीच्या येथील टोल नाक्यांवरील कर्मचाऱ्यांची अरेरावी वाढली आहे. आतापर्यंत कोल्हापूरच्या गाडया अडविल्या जात नव्हत्या परंतू आता त्या देखील अडवून ठेवल्या जावू लागल्या आहेत. त्यामुळे नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागत असल्याचे चित्र दिसत आहे.‘लोकमत’ ने गुरुवारी प्रमुख नाक्यांवर थांबून नेमकी वस्तूस्थिती पाहिली असता तोच अनुभव आला. टोलविरोधात रान पेटविलेल्या राज्यकर्त्यांबरोबर प्रशासनातील अधिकाऱ्यांना कोल्हापूरकरांनी वठणीवर आणले; पण या टोलमधून कोल्हापूरकरांची सुटका कधी, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. शहरात आय.आर. बी. कंपनीने ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा ’अर्थात बीओटी तत्त्वावर सुमारे ४९.४९ किलोमीटरचे रस्ते केले; पण ते निकृष्ट दर्जाचा आरोप शहरवासीय करूलागले आहेत. टोल विरोधात पेटविलेले रान राज्यभर पोहोचले. याचा धसका घेत नवीन आलेल्या भाजप सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधाऱ्यांना घालवा असा नारा देत,आमचे सरकार सत्तेवर आल्यावर राज्य टोलमुक्त करू, अशी घोषणा केली होती; परंतु भाजपने मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव घोषित केल्यावर फडणवीस यांनी अवघ्या काही तासांतच टोलसंस्कृती देशभर स्विकारली असून जे टोल मुदत संपल्यानंतरही वसूल केले जात आहेत असे अन्यायकारक टोल रद्द करु असे घूमजाव केले. त्यामुळे टोलचे भूत बाजूला होण्याची शक्यता धूसर बनली. परिणाम म्हणून टोलवसूलीच्या कर्मचाऱ्यांची दादागिरी सुरु झाली आहे. (प्रतिनिधी)