शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

मुख्यमंत्र्यांविरोधात गनिमी काव्याने आंदोलन करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 12:12 IST

टोलविरोधी कृती समितीच्या कार्र्यकर्त्यांवरील टोल आंदोलनातील खटले मागे घेण्याचे आश्वासन देऊन मुख्यमंत्र्यांनी ते घेतलेले नाहीत. ते पूर्ण करावे, अन्यथा त्यांच्या विरोधात नाईलाजास्तव गनिमी काव्याने आंदोलन करू, असा इशारा टोलविरोधी कृती समितीने दिला.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांविरोधात गनिमी काव्याने आंदोलन करूटोलविरोधी कृती समितीचा इशारा

कोल्हापूर : टोलविरोधी कृती समितीच्या कार्र्यकर्त्यांवरील टोल आंदोलनातील खटले मागे घेण्याचे आश्वासन देऊन मुख्यमंत्र्यांनी ते घेतलेले नाहीत. ते पूर्ण करावे, अन्यथा त्यांच्या विरोधात नाईलाजास्तव गनिमी काव्याने आंदोलन करू, असा इशारा टोलविरोधी कृती समितीने दिला.राज्यशासनाने आय. आर. बी. कंपनीच्या माध्यमातून कोल्हापूर शहरावर लादलेला टोल हटविण्यासाठी कोल्हापूरच्या जनतेने पाच वर्षे रस्त्यावर उतरून टोलविरोधी कृती समितीच्या माध्यमातून लढा दिला. या जनआंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांवर वेगवेगळ्या आंदोलनांत पोलिसांनी खटले दाखल केले आहे. ते आजही न्यायालयात प्रलंबित आहेत. यात कार्यकर्त्यांना न्यायालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत. काहींवर रोख दंडात्मक कारवाईही झाली आहे.शासनाने आय. आर. बी. कंपनीला ४०० कोटी रुपये भागविले आहेत. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा कोल्हापूरकरांच्या वतीने भव्य सत्कार करून आभार मानले होते. यावेळी टोल आम्ही रद्द केला आहे.

जनआंदोलनातील कार्यकर्त्यांवरील खटले शासन मागे घेणार, अशी घोषणा केली, तसे शासन परिपत्रकही काढले; पण अद्यापही काहीच कारवाई झालेली नाही. त्यानंतर बऱ्याचवेळा मुख्यमंत्र्यांना निवेदन व स्मरणपत्रेही दिली आहेत. वारंवार पालकमंत्री पाटील यांना विनंतीही केली आहे; त्यामुळे आम्हा आंदोलकांना वेगळीच शंका येत आहे.

सनदशीर व लोकशाही मार्गाने आंदोलने पुन्हा कोणी करू नयेत म्हणून हे खटले मागे घेतलेले नाहीत; त्यामुळे आमच्यावरील खटले त्वरित मागे घ्या, अन्यथा गनिमी काव्याने आंदोलन करू, असे या पत्रकात म्हटले आहे. या पत्रकावर चंद्रकांत यादव, दिलीप देसाई, अशोक पोवार, रमेश मोरे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर आदींच्या सह्या आहेत. 

 

टॅग्स :tollplazaटोलनाकाkolhapurकोल्हापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस