शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

मुख्यमंत्र्यांविरोधात गनिमी काव्याने आंदोलन करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 12:12 IST

टोलविरोधी कृती समितीच्या कार्र्यकर्त्यांवरील टोल आंदोलनातील खटले मागे घेण्याचे आश्वासन देऊन मुख्यमंत्र्यांनी ते घेतलेले नाहीत. ते पूर्ण करावे, अन्यथा त्यांच्या विरोधात नाईलाजास्तव गनिमी काव्याने आंदोलन करू, असा इशारा टोलविरोधी कृती समितीने दिला.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांविरोधात गनिमी काव्याने आंदोलन करूटोलविरोधी कृती समितीचा इशारा

कोल्हापूर : टोलविरोधी कृती समितीच्या कार्र्यकर्त्यांवरील टोल आंदोलनातील खटले मागे घेण्याचे आश्वासन देऊन मुख्यमंत्र्यांनी ते घेतलेले नाहीत. ते पूर्ण करावे, अन्यथा त्यांच्या विरोधात नाईलाजास्तव गनिमी काव्याने आंदोलन करू, असा इशारा टोलविरोधी कृती समितीने दिला.राज्यशासनाने आय. आर. बी. कंपनीच्या माध्यमातून कोल्हापूर शहरावर लादलेला टोल हटविण्यासाठी कोल्हापूरच्या जनतेने पाच वर्षे रस्त्यावर उतरून टोलविरोधी कृती समितीच्या माध्यमातून लढा दिला. या जनआंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांवर वेगवेगळ्या आंदोलनांत पोलिसांनी खटले दाखल केले आहे. ते आजही न्यायालयात प्रलंबित आहेत. यात कार्यकर्त्यांना न्यायालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत. काहींवर रोख दंडात्मक कारवाईही झाली आहे.शासनाने आय. आर. बी. कंपनीला ४०० कोटी रुपये भागविले आहेत. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा कोल्हापूरकरांच्या वतीने भव्य सत्कार करून आभार मानले होते. यावेळी टोल आम्ही रद्द केला आहे.

जनआंदोलनातील कार्यकर्त्यांवरील खटले शासन मागे घेणार, अशी घोषणा केली, तसे शासन परिपत्रकही काढले; पण अद्यापही काहीच कारवाई झालेली नाही. त्यानंतर बऱ्याचवेळा मुख्यमंत्र्यांना निवेदन व स्मरणपत्रेही दिली आहेत. वारंवार पालकमंत्री पाटील यांना विनंतीही केली आहे; त्यामुळे आम्हा आंदोलकांना वेगळीच शंका येत आहे.

सनदशीर व लोकशाही मार्गाने आंदोलने पुन्हा कोणी करू नयेत म्हणून हे खटले मागे घेतलेले नाहीत; त्यामुळे आमच्यावरील खटले त्वरित मागे घ्या, अन्यथा गनिमी काव्याने आंदोलन करू, असे या पत्रकात म्हटले आहे. या पत्रकावर चंद्रकांत यादव, दिलीप देसाई, अशोक पोवार, रमेश मोरे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर आदींच्या सह्या आहेत. 

 

टॅग्स :tollplazaटोलनाकाkolhapurकोल्हापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस