शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
5
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
6
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
7
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
8
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
9
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
10
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
11
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
12
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
13
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
14
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
15
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
16
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
17
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
18
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
19
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
20
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत

दिल्लीच्या धर्तीवर मुंबईच्या सीमा रोखू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:18 IST

कोल्हापूर : केंद्र सरकारने मंजूर केलेले अन्यायी कृषी कायदे मागच्या दाराने राज्यात लाग करण्याची संशयास्पद घाई थांबवावी; अन्यथा दिल्लीच्या ...

कोल्हापूर : केंद्र सरकारने मंजूर केलेले अन्यायी कृषी कायदे मागच्या दाराने राज्यात लाग करण्याची संशयास्पद घाई थांबवावी; अन्यथा दिल्लीच्या धर्तीवर मुंबईच्याही सीमा रोखू, असा इशारा अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने राज्य सरकारला शनिवारी दिला.

किसान संघर्ष समन्वय समितीचे अशोक ढवळे, राजू शेट्टी, जयंत पाटील, मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे, नामदेव गावडे, प्रा. एस. व्ही. जाधव, अजित नवले, किशोर ढमाले, सुभाष लोमटे, सीमा कुलकर्णी, सुभाष काकुस्ते, राजू देसले यांनी निवेदनाद्वारे राज्य सरकारला दिला आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, केंद्राच्या कायद्यामध्ये किरकोळ बदल केले तर ते पवित्र होणार नाही, कायदे आणण्यामागील केंद्राचा उद्देश व कायद्यांचे शेतकरी विरोधी, कार्पोरेट धार्जीणे चरित्रही बदलले जाणार नाही. शेतकऱ्यांना संकटात टाकणाऱ्या या कायद्यांनाच विरोध असताना त्यात जुजबी बदल करून लागू करण्यास आमचा ठाम विरोध आहे. त्यामुळे हे कायदे रद्द करा, यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या धर्तीवर मुंबईत सीमा रोखून धरत आरपारची लढाई लढण्यास सज्ज आहोत. राज्य सरकारने कृषी कायद्यांची अंमलबजावणी करणार नसल्याचा आणि शेतमालाला उत्पादनाच्या दीडपट हमीभाव द्यावा, असा ठराव पुढील अधिवेशनात मंजूर करण्यासाठी पाऊले उचलावीत; अन्यथा केंद्राप्रमाणेच राज्याचीही नियत शेतकरी विरोधीच असल्याचे गृहीत धरून राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलनाची आघाडी उघडली जाईल असेही निवेदनात म्हटले आहे.