शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

दिल्लीच्या धर्तीवर मुंबईच्या सीमा रोखू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:18 IST

कोल्हापूर : केंद्र सरकारने मंजूर केलेले अन्यायी कृषी कायदे मागच्या दाराने राज्यात लाग करण्याची संशयास्पद घाई थांबवावी; अन्यथा दिल्लीच्या ...

कोल्हापूर : केंद्र सरकारने मंजूर केलेले अन्यायी कृषी कायदे मागच्या दाराने राज्यात लाग करण्याची संशयास्पद घाई थांबवावी; अन्यथा दिल्लीच्या धर्तीवर मुंबईच्याही सीमा रोखू, असा इशारा अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने राज्य सरकारला शनिवारी दिला.

किसान संघर्ष समन्वय समितीचे अशोक ढवळे, राजू शेट्टी, जयंत पाटील, मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे, नामदेव गावडे, प्रा. एस. व्ही. जाधव, अजित नवले, किशोर ढमाले, सुभाष लोमटे, सीमा कुलकर्णी, सुभाष काकुस्ते, राजू देसले यांनी निवेदनाद्वारे राज्य सरकारला दिला आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, केंद्राच्या कायद्यामध्ये किरकोळ बदल केले तर ते पवित्र होणार नाही, कायदे आणण्यामागील केंद्राचा उद्देश व कायद्यांचे शेतकरी विरोधी, कार्पोरेट धार्जीणे चरित्रही बदलले जाणार नाही. शेतकऱ्यांना संकटात टाकणाऱ्या या कायद्यांनाच विरोध असताना त्यात जुजबी बदल करून लागू करण्यास आमचा ठाम विरोध आहे. त्यामुळे हे कायदे रद्द करा, यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या धर्तीवर मुंबईत सीमा रोखून धरत आरपारची लढाई लढण्यास सज्ज आहोत. राज्य सरकारने कृषी कायद्यांची अंमलबजावणी करणार नसल्याचा आणि शेतमालाला उत्पादनाच्या दीडपट हमीभाव द्यावा, असा ठराव पुढील अधिवेशनात मंजूर करण्यासाठी पाऊले उचलावीत; अन्यथा केंद्राप्रमाणेच राज्याचीही नियत शेतकरी विरोधीच असल्याचे गृहीत धरून राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलनाची आघाडी उघडली जाईल असेही निवेदनात म्हटले आहे.