शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
2
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
4
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
5
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
6
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
7
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
8
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
9
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
10
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
11
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
12
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
13
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
14
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
15
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
16
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
17
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
18
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
19
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
20
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की

कोरोनाला आम्ही घाबरणारे नाही; आत्महत्या घटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:30 IST

कोल्हापूर : गेल्या सव्वादोन वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तब्बल १३०३ जणांनी नैराश्येतून आत्महत्या केल्याचे पोलीस दप्तरी नोंद आहे. माणसाच्या अपेक्षा ...

कोल्हापूर : गेल्या सव्वादोन वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तब्बल १३०३ जणांनी नैराश्येतून आत्महत्या केल्याचे पोलीस दप्तरी नोंद आहे. माणसाच्या अपेक्षा वाढल्या, त्या पूर्ण करताना होणारी दमछाक व अपेक्षा पूर्ती न झाल्याने माणसांमध्ये नैराश्याची भावना वाढत जाऊन टोकाचा आत्महत्येचा निर्णय घेतल्याने पोलीस तपासात उघड झाले आहे. २०१९ मध्ये सुमारे ५७० जणांनी आत्महत्या केल्या, तर २०२० या कोरोना संकटात अर्थचक्रच बंद पडल्याने अनेक उद्योगधंदे बंद पडले, नोकऱ्या गेल्या, आर्थिक नुकसान झाले. जवळचे कोरोनाने गेले. माणसे व्यसनाधीन बनली. परिणामी माणसात प्रचंड नैराश्य येऊन स्वत:ला असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. नकारात्मकता वाढल्याने अनेकांनी जगण्याची उमेद हरवली. त्यातून अनेकांनी आत्महत्या केल्या.

२०२० मध्येही आत्महत्येचे प्रमाण वाढले. या वर्षात माणसाला कोरोनाने घेरले. त्यातून वर्षभरात सुमारे ६१९ जणांनी आत्महत्या केल्या. आता २०२१ च्या प्रारंभीच्या कालावधीत अनेकजण स्वत:ला सावरत असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा डोके वर काढले; पण गतवर्षीचा अनुभव पाहता आता हे संकट फक्त आपल्या एकट्यावरच नाही, सारेच अडचणीत असल्याची भावना अनेकांच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे गेल्या दोन वर्षांतील आत्महत्येच्या सरासरी प्रमाणात गेल्या तीन महिन्यांत कोरोना संकटामुळे आत्महत्येचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र आहे. जानेवारी ते मार्च २०२१ अखेरपर्यंत ११४ जणांनी आत्महत्या केल्याचे दिसून आले.

पॉईंटर...

- २०१९ मध्ये झालेल्या आत्महत्या : ५७०

- २०२० मध्ये झालेल्या आत्महत्या : ६१९

- २०२१ जानेवारी ते मार्च : ११४

संकट माझ्या एकट्यावर नाही

कोरोना संकटात मी एकटा अडचणीत नाही, तर सारेच अडचणीत आहेत, अशी भावाना प्रत्येकात निर्माण झाली पाहिजे. वस्तुस्थितीची जाणीव करून सकारात्मक विचार करून मार्ग काढणे, नैराश्येत मानसोपचार तज्ज्ञ अगर समुपदेशकांकडून उपचार घेणे, कौटुंबिक संवाद, सकारात्मक छंद वाढविणे, अशामुळे आत्महत्येचे प्रमाण कमी येऊ शकेल.

- डॉ. निखिल चौगले, मानसोपचार तज्ज्ञ

कोरोना संकटात १३ आत्महत्या

कोरोना संकटात अडचणीत सारेच जण आले; पण गेल्या वर्षभरात आर्थिक नुकसानीत पुन्हा उभे राहण्याची उमेद संपल्याच्या नैराश्येतून जिल्ह्यात तेरा जणांनी आत्महत्या केल्या. त्याशिवाय इतरही आत्महत्या झाल्या; पण त्यासाठी ठोस कारण प्रशासनाच्या हाती लागले नाही.