शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

आम्ही सगळे दहावी पास, कोल्हापूर विभागाचा ९९.९२ टक्के निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 19:12 IST

Ssc Result Kolhapur : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावीची परीक्षा रद्द झाल्याने यंदा अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे शुक्रवारी ऑनलाइन निकाल जाहीर झाला. त्यात अर्ज भरून मूल्यांकन प्राप्त कोल्हापूर विभागातील १,३४,८३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामुळे ह्यआम्ही सगळे दहावी पासह्ण असे आनंदाचे वातावरण विद्यार्थ्यांमध्ये होते. कोल्हापूर विभाग ९९.९२ टक्क्यांसह राज्यात आठव्या क्रमांकावर राहिला. गेल्या वर्षीच्या तुलनेत २.२८ टक्क्यांनी निकाल वाढला.

ठळक मुद्देविभागात सांगली जिल्हा प्रथम : मुलींची आघाडी कायमकोल्हापूर जिल्ह्याचा ९९.९० टक्के निकाल

कोल्हापूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावीची परीक्षा रद्द झाल्याने यंदा अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे शुक्रवारी ऑनलाइन निकाल जाहीर झाला. त्यात अर्ज भरून मूल्यांकन प्राप्त कोल्हापूर विभागातील १,३४,८३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामुळे ह्यआम्ही सगळे दहावी पासह्ण असे आनंदाचे वातावरण विद्यार्थ्यांमध्ये होते. कोल्हापूर विभाग ९९.९२ टक्क्यांसह राज्यात आठव्या क्रमांकावर राहिला. गेल्या वर्षीच्या तुलनेत २.२८ टक्क्यांनी निकाल वाढला.या विभागातील लेखी आणि अंतर्गत परीक्षा दिली नसलेले अवघे १०६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. कोल्हापूर विभागात ९९.९४ टक्क्यांसह सांगली जिल्हा अव्वल ठरला. सातारा जिल्हा ९९.९२ टक्क्यांसह द्वितीय, तर कोल्हापूर जिल्हा ९९.९२ टक्क्यांसह तृतीय क्रमांकावर राहिला. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय सचिव देविदास कुलाळ यांनी निकालाची माहिती दिली.

यंदा कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील १,३४,९४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातील १,३४,९३९ जणांचे मूल्यांकन प्राप्त होऊन त्यापैकी १,३४,८३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ७३,४०३ मुले उत्तीर्ण झाली असून, त्यांचे प्रमाण ९९.९० टक्के, तर ६१४३० मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांचे प्रमाण ९९.९३ टक्के आहे. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा ०.०३ टक्के जादा आहे.जिल्हानिहाय निकाल

  • सांगली : ९९.९४ टक्के
  • सातारा : ९९.९२ टक्के
  • कोल्हापूर : ९९.९० टक्के

विभागाचा निकाल एका नजरेत

  • एकूण माध्यमिक शाळा : २,२९९
  • विशेष प्रावीण्य श्रेणीतील उत्तीर्ण विद्यार्थी : ५७,३१०
  • प्रथम श्रेणी व ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेले विद्यार्थी : ५३,७४१
  • पुनर्प्रविष्ट विद्यार्थी उत्तीर्ण : ४,१३१

यावर्षी कोल्हापूर विभागाच्या दहावीच्या निकालात २.२८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विभाग राज्यात आठव्या क्रमांकावर असला, तरी अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत टक्केवारीत फार मोठा फरक नाही. विभागात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे. सातारा जिल्ह्यात शंभर टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. शाळांकडून मूल्यांकन प्राप्त झाले नसलेल्या २७८ विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले आहेत. त्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर विभागाच्या टक्केवारीत आणखी वाढ होईल.-देविदास कुलाळ,विभागीय सचिव

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालkolhapurकोल्हापूर