शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
3
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
4
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
5
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
6
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
7
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
8
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
9
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
10
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
11
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
12
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
13
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
14
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
15
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
16
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
17
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
18
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
19
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
20
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार

एमसीसी विषयच बंद पडण्याच्या मार्गावर

By admin | Updated: December 9, 2014 23:17 IST

शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष : फाटके ड्रेस, उसवलेल्या बुटांमध्ये नाईलाजास्तव प्रशिक्षण

मुरगूड : शालेय वयातच विद्यार्थ्यांच्या मनावर देशप्रेमाचे धडे बिंबविल्यास भावी नागरिक सक्षम तर बनतीलच; शिवाय देशाच्या अखंडत्वाला आपोआपच मजबुती येईल. या उद्दात्त हेतूने अगदी गाजावाजा करीत सुरू केलेला एमसीसी हा विषय शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वच शाळांमध्ये फाटक्या ड्रेसमध्ये व उसवलेल्या बुटांमध्ये नाईलाजास्तव मुले प्रशिक्षण घेत आहेत. राज्यात नवीनच सत्तेत आलेले युती सरकार याकडे गांभीर्याने पाहणार का? आणि या विषयाला नवसंजीवनी देण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार का? हा प्रश्न एमसीसी प्रशिक्षक व विद्यार्थ्यांना पडला आहे. काही मोजक्याच हायस्कूलमध्ये केंद्र सरकारने राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) हा विषय सुरू केला आहे. महाराष्ट्र शासनाने जुलै १९९७ मध्ये गाजावाजा करीत सर्वच शाळांमध्ये महाराष्ट्र छात्र सेना अर्थात एमसीसी हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केला. दरम्यान, युतीचे शासन बदलले आणि राज्यात आघाडी सरकारने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सुरुवातीला दिलेल्या ड्रेसचाच वापर आजही अनेक विद्यार्थी करीत आहेत. त्यामुळे काहींचे ड्रेस फाटले, तर काहींचे बूट तुटलेल्या अवस्थेतच दिसतात. काही शाळांमध्ये, तर शालेय युनिफॉर्ममध्येच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत. सध्या एमसीसी कवायत स्पर्धा सुरू होण्याच्या लगबगी सुरू झाल्या आहेत; पण विषय शिक्षकांची व विद्यार्थ्यांची मानसिकताच बदलली आहे. युनिफॉर्म नाही, शासकीय पातळीवर नोंद नाही, मग या स्पर्धांचा दिखावा कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (वार्ताहर)शालेय अभ्यासक्रमात अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणून एमसीसीकडे पाहिले जाते; पण विविध साधने, सोयी, उपलब्ध न झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उदासीनता निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने त्वरित याकडे लक्ष देऊन योग्य साधने पुरवावीत. - एस. एस. कळंत्रे, एमसीसी प्रशिक्षक, मुरगूड विद्यालय