शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

‘महाड’च्या वाटेवर... कोल्हापूर!

By admin | Updated: August 4, 2016 01:22 IST

आयुष्य संपलेले ब्रिटिशकालीन चार पूल : वाहतुकीचा प्रचंड ताण; दुर्घटना झाल्यावरच जागे होणार का..?

प्रवीण देसाई, कोल्हापूर - -महाडमधील (जि. रायगड) ब्रिटिशकालीन पूल मंगळवारी रात्री वाहून गेल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शिवाजी पुलासह बालिंगा, निढोरी व आजरा येथील शंभरी ओलांडलेल्या, पण वाहतुकीचा ताण झेलणाऱ्या पुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. एखाद्या पुलाचे आयुष्यमान हे तांत्रिकदृष्ट्या किमान ७० ते ८० वर्षे इतके गृहीत धरले जाते. त्यानंतर पर्यायी पूल बांधणे गरजेचे आहे; परंतु शिवाजी पूलवगळता एकाही शंभरी गाठलेल्या पर्यायी पुलाचा प्रस्ताव बांधकाम विभागाने वरिष्ठ स्तरावर पाठविलेला नाही. रखडलेल्या पर्यायी शिवाजी पुलाची पुरातत्त्व खात्याची परवानगी केंद्र सरकार महाडसारखी दुर्घटना घडल्यानंतरच देणार काय? असा संतप्त सूर सर्वसामान्यांतून उमटत आहे.साधारणत: ७० ते ८० वर्षे पूर्ण झाल्यानंतर पर्यायी पूल बांधण्याची आवश्यकता असते. त्यानुसार जिल्ह्यातील शिवाजी पूल, व्हिक्टोरिया, पेरिस व रिव्हज या पुलांना पर्यायी पूल बांधण्याची गरज आहे. शिवाजी पूलाला पर्यायी पूल बांधण्याचे काम सुरू असून जवळपास ७० टक्के काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित काम हे केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या परवानगीअभावी गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे महाडची दुर्घटना घडल्यानंतर शिवाजी पुलाच्या प्रश्नांने चांगलीच उसळी घेतली. जीवितहानी झाल्यानंतरच केंद्र सरकारचे डोळे उघडणार आहेत का? कागदी घोडे नाचवून नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ आता तरी थांबणार का? असा संतप्त सवालही सर्वसामान्यांतून विचारला गेला.सार्वजनिक बांधकाम विभागाने निढोरी, बालिंगा व व्हिक्टोरिया या पुलांना पर्यायी पूल बांधावेत, असा कोणताही प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविलेला नाही. या पुलांना कोणताही धोका नसून ते सुस्थितीत असल्याचा या खात्याचा दावा आहे. शिवाजी पुलास शंभर वर्षे पूर्ण झाल्यानंतर ब्रिटिश सरकारकडून पत्र पाठवून त्याची कल्पना दिली आहे. पुलाच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्थानिक यंत्रणेकडे सोपविण्यात आली. तशी कल्पना उर्वरीत पुलांबाबत ब्रिटिश सरकारकडून देण्यात आली नसल्याचे या खात्याकडून सांगण्यात आले.राज्य शासनाकडून पुलांचा आढावामहाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून सतर्कतेच्या सूचना देत जिल्ह्यातील पुलांची माहिती मागविली आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण विभागाकडून सर्व माहिती राज्य सरकारला पाठविण्यात आली.जिल्ह्यातील मोठे पूलसार्वजनिक बांधकाम विभाग (उत्तर) (कागल, हातकणंगले, करवीर, शिरोळ) : अर्जुनवाड, दिनकर यादव पूल, चिकोत्रा, निढोरी, इचलकरंजी नवीन पूल, इचलकरंजी जुना पूल, न्यू प्रयाग पूल, एमआयडीसी पूल, सिद्धनेर्ली, शिरढोण, रुई, औरवाड, सांगरूळ, महे, हळदी, कापशी. सार्वजनिक बांधकाम विभाग (दक्षिण) (भुदरगड, राधानगरी, आजरा, गडहिंग्लज, चंदगड) : सरवडे, गारगोटी, घटप्रभा, ताम्रपर्णी, व्हिक्टोरिया, मुत्नाळ, बिद्री, भडगाव, कूर, चिकोत्रा, अडकूर, बिद्री (नवीन), ताम्रपर्णी, इब्राहिमपूर, मोरवल, ताम्रपर्णी (कोवाड), राशिवडे.बांधकाम विभाग (विशेष प्रकल्प) (शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा) : कडवी, माण, मौसम, रूपनी, साळवण, बालिंगा, कोडोली, कासारी, शित्तूर, माजगाव, मल्हारपेठ, गोटे, सरुड.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील व्हिक्टोरिया, पेरिस व बालिंगा या पुलांना शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. हे पूल भक्कम असून त्यांना कोणताही धोका नाही. पावसाळ्यापूर्वी म्हणजे एप्रिल ते मेदरम्यान यासह इतर सर्व पुलांची पाहणी करण्यात आली आहे. - सदाशिव साळुंखे, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कोल्हापूर विभागराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियंत्रणाखालील पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाला कोणताही धोका नाही. असे असले तरी पर्यायी पूल बांधला जात आहे. हे काम सध्या पुरातत्त्व खात्याच्या परवानगीअभावी रखडले असून, या संदर्भात १२ आॅगस्टला दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत आहे.- आर. के.बामणे, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, कोल्हापूर-रत्नागिरी राज्यमार्गावर पंचगंगा नदीवरील १३४.८० मीटर लांबीच्या पर्यायी शिवाजी पुलासाठी १५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मार्च २०१३ मध्ये पुलाच्या कामाला सुरुवात झाली. अठरा महिन्यांत हे काम पूर्ण करायचे होते; परंतु पुरातत्त्व खात्याच्या परवानगीअभावी ते रखडल्याने या कामासाठी ३१ मार्च २०१६ रोजी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यातील ७० टक्के काम पूर्ण झाले असून यावर १० कोटी रुपये खर्च झाले आहेत. या पुलाचे एकूण तीन गाळे आहेत. त्यांपैकी दोन गाळ्यांचे काम पूर्ण झाले असून कोल्हापूरच्या बाजूकडील एका गाळ्याचे काम राष्ट्रीय स्मारक समितीच्या परवानगीअभावी रखडले आहे. ही परवानगी मिळाल्यानंतरच हे काम सुरू होणार आहे.शिवाजी पूल वाहून जाण्याची वाट पाहायची काय?महाड घटनेचे तीव्र पडसाद सोशल मीडियावरही उमटले. सरकारला या भावना कळाव्यात यासाठी दिवसभर ‘महाड गावचा पूल पुराच्या पाण्याने वाहून गेला.... मग आता कोल्हापूरचा शिवाजी पूलसुद्धा वाहून जायची वाट पाहायची काय? केव्हा होणार नवीन पुलाचे काम पूर्ण...?’ असे संदेश दिवसभर व्हॉट्स अ‍ॅपवरून फिरत होते.