शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

शिराळी तांदूळ नामशेष होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: February 23, 2015 00:17 IST

पीक पद्धतीत बदलाचा परिणाम : कमी पावसाचाही फटका; कलही बदलला...

विकास शहा -शिराळा तालुका शिराळी मासाड किंवा जोंधळी तांदळासाठी प्रसिद्ध आहे. मात्र हा तांदूळ हळूहळू कालबाह्य होऊ लागला आहे. पावसाचे कमी झालेले प्रमाण व जादा उत्पादन देणारी पिके शेतकरी घेऊ लागल्याने या तांदळाचे उत्पादन अल्प होऊ लागले आहे. परिणामी हे वाण संपण्याच्या मार्गावर आहे.शिराळा तालुक्याच्या उत्तर भागात कमी पाऊस, ओसाड माळरान, तर पश्चिम भागात मुसळधार पाऊस असतो. त्यामुळे दोन्ही विभागात वेगवेगळ्या पद्धतीने भातपिके घेतली जातात. २३ हजार हेक्टर खरीप क्षेत्र असून, त्यामध्ये १३ हजार हेक्टर क्षेत्र फक्त भात पिकाचे आहे. शिराळी तांदळात मासाड, दोडगा, जया, रत्ना १, वडगाव ४८ व जोंधळी या जातींचा-वाणांचा समावेश होतो. शिराळी तांदळाचे उत्पादन कमी होते. मासाड तांदूळ खाण्यास चविष्ट असतो. याचे पोहेही केले जातात. जोंधळी तांदूळ जोंधळ्यासारखा गोलाकार असतो. या तांदळाचा भात घरात शिजत असल्यास रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांनाही त्याचा सुवास येतो. इतर तांदळामध्ये हा तांदूळ मूठभर टाकला तरी त्याचा वास पसरतो. जोंधळी तांदूळ बासमतीपेक्षा जादा वासाचा तसेच खाण्यास चविष्ट असतो. ‘तुला काय पंचायत?’, ‘काळी कंगणी’ आदी वाणही प्रसिद्ध आहेत. अलीकडे त्यांची जागा रत्ना २, इंद्रायणी, बासमती, सोना, सोनम, रत्नागिरी २४ आदी तांदळाच्या जातींनी घेतली आहे. या जाती संशोधकांनी, शासनाच्या कृषी विभागाने आणि कृषी विद्यापीठाने विकसित केल्या आहेत. त्यामुळे कमी पाऊस, जादा उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे शेतकरी वळल्याने जुने बियाणे नामशेष होत आहे.धूळवाफ पद्धतीने तसेच लावण पद्धतीने भाताची पेरणी केली जाते. कमी उत्पन्न मिळत असल्याने जोंधळी तांदळाचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी तो ७० ते ७५ रुपये किलो दराने मोजक्याच शेतकऱ्यांकडे मिळतो. त्यासाठी शिराळा, कोकरूड, चरण, आरळा, शेडगेवाडी, सागाव येथील आठवडा बाजारात शोध घ्यावा लागतो. घाऊक व्यापारी यामध्ये इतर तांदूळ मिसळून विकतात, त्यामुळे मूळ जोंधळी तांदळाची चव चाखायला मिळत नाही. . प्रतिकूल परिस्थितीनेनाराजीसुधारित बियाणे, त्यातही जादा उत्पादन मिळणाऱ्या बियाणांकडे शेतकरी वळला आहे. मजुरांचा तुटवडा, मजुरीचे वाढते दर याचाही परिणाम झाला आहे. त्यातच हे पूर्ण पीक पावसावर अवलंबून असल्यामुळे शेतकरी हे पीक घेण्यास नाखूष आहेत. शिराळी तांदळास बाजारपेठेत मागणी असली, तरी त्याच्या उत्पादनाकडे शेतकरी पाठ फिरवत आहेत. त्यामुळे ‘शिराळी तांदूळ’ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.