शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

शिराळी तांदूळ नामशेष होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: February 23, 2015 00:17 IST

पीक पद्धतीत बदलाचा परिणाम : कमी पावसाचाही फटका; कलही बदलला...

विकास शहा -शिराळा तालुका शिराळी मासाड किंवा जोंधळी तांदळासाठी प्रसिद्ध आहे. मात्र हा तांदूळ हळूहळू कालबाह्य होऊ लागला आहे. पावसाचे कमी झालेले प्रमाण व जादा उत्पादन देणारी पिके शेतकरी घेऊ लागल्याने या तांदळाचे उत्पादन अल्प होऊ लागले आहे. परिणामी हे वाण संपण्याच्या मार्गावर आहे.शिराळा तालुक्याच्या उत्तर भागात कमी पाऊस, ओसाड माळरान, तर पश्चिम भागात मुसळधार पाऊस असतो. त्यामुळे दोन्ही विभागात वेगवेगळ्या पद्धतीने भातपिके घेतली जातात. २३ हजार हेक्टर खरीप क्षेत्र असून, त्यामध्ये १३ हजार हेक्टर क्षेत्र फक्त भात पिकाचे आहे. शिराळी तांदळात मासाड, दोडगा, जया, रत्ना १, वडगाव ४८ व जोंधळी या जातींचा-वाणांचा समावेश होतो. शिराळी तांदळाचे उत्पादन कमी होते. मासाड तांदूळ खाण्यास चविष्ट असतो. याचे पोहेही केले जातात. जोंधळी तांदूळ जोंधळ्यासारखा गोलाकार असतो. या तांदळाचा भात घरात शिजत असल्यास रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांनाही त्याचा सुवास येतो. इतर तांदळामध्ये हा तांदूळ मूठभर टाकला तरी त्याचा वास पसरतो. जोंधळी तांदूळ बासमतीपेक्षा जादा वासाचा तसेच खाण्यास चविष्ट असतो. ‘तुला काय पंचायत?’, ‘काळी कंगणी’ आदी वाणही प्रसिद्ध आहेत. अलीकडे त्यांची जागा रत्ना २, इंद्रायणी, बासमती, सोना, सोनम, रत्नागिरी २४ आदी तांदळाच्या जातींनी घेतली आहे. या जाती संशोधकांनी, शासनाच्या कृषी विभागाने आणि कृषी विद्यापीठाने विकसित केल्या आहेत. त्यामुळे कमी पाऊस, जादा उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे शेतकरी वळल्याने जुने बियाणे नामशेष होत आहे.धूळवाफ पद्धतीने तसेच लावण पद्धतीने भाताची पेरणी केली जाते. कमी उत्पन्न मिळत असल्याने जोंधळी तांदळाचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी तो ७० ते ७५ रुपये किलो दराने मोजक्याच शेतकऱ्यांकडे मिळतो. त्यासाठी शिराळा, कोकरूड, चरण, आरळा, शेडगेवाडी, सागाव येथील आठवडा बाजारात शोध घ्यावा लागतो. घाऊक व्यापारी यामध्ये इतर तांदूळ मिसळून विकतात, त्यामुळे मूळ जोंधळी तांदळाची चव चाखायला मिळत नाही. . प्रतिकूल परिस्थितीनेनाराजीसुधारित बियाणे, त्यातही जादा उत्पादन मिळणाऱ्या बियाणांकडे शेतकरी वळला आहे. मजुरांचा तुटवडा, मजुरीचे वाढते दर याचाही परिणाम झाला आहे. त्यातच हे पूर्ण पीक पावसावर अवलंबून असल्यामुळे शेतकरी हे पीक घेण्यास नाखूष आहेत. शिराळी तांदळास बाजारपेठेत मागणी असली, तरी त्याच्या उत्पादनाकडे शेतकरी पाठ फिरवत आहेत. त्यामुळे ‘शिराळी तांदूळ’ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.