शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

केएमटी 'जनता गाडी'च्या मार्गावर

By admin | Updated: December 16, 2014 23:49 IST

‘एसटी’च्या सेवेला खो : केएमटीला दिवसात ५० हजारांचा फायदा, सहा बसेस सुरू

कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयाने एस. टी. महामंडळास महापालिका हद्दीत प्रवासी वाहतुकीला मज्जाव केला. यानंतर एस.टी.ची जनता गाडी सुरू करण्याची मागणी प्रवाशांतून जोर धरू लागली. मात्र, आरटीओंच्या या निर्णयाने ‘केएमटी’ला आज, मंगळवारी एका दिवसात ५० हजारांचा फायदा झाला. प्रवाशांना जलद सेवा देण्यासाठी ‘केएमटी’नेही नव्याने सहा बसेस जनता गाडीच्या मार्गावर सुरू केल्या. तसेच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येणाऱ्या २५ नव्या बसेसमुळे ‘जनता’ प्रवास आणखी सुखकर व जलद होईल, अशी ग्वाही ‘केएमटी’चे व्यवस्थापक संजय भोसले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.प्रादेशिक परिवहन कार्यालयाने पालिकेच्या हद्दीत नियमबाह्य प्रवासी वाहतूक करणारी एस.टी.ची जनता गाडी बंद करावी, अशी मागणी विविध रिक्षा संघटना व ‘केएमटी’ प्रशासनाची होती. याबाबत आरटीओ लक्ष्मण दराडे यांच्याकडून एस.टी. प्रशासनाला ही सेवा बंद करण्याबाबत दीड वर्षांपासून पत्रव्यवहार सुरू होता. तरीही एस.टी.ने जनता सेवा सुरूच ठेवली होती. अवैध जनता गाडी बंद करण्याबाबत एका बाजूला रिक्षा संघटनांची आंदोलने व ‘केएमटी’ची जोर, तर दोन रुपयांची स्वस्त जनता गाडी सुरू करण्याची प्रवाशांची मागणी, अशा कचाट्यात सापडलेल्या आरटीओ दराडे यांनी कायद्याचा बडगा उगारत एस.टी.ची अवैध सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. याबाबत प्रवाशांतून उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, ही गाडी बंद झाल्याने शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. तसेच ‘केएमटी’ला हक्काचे उत्पन्न मिळणार आहे. (प्रतिनिधी)‘केएमटी’च्या ताफ्यात नवीन १३० बसेसची भर पडणार आहे. सर्व बसेसच्या मार्गांचे नियोजन तयार आहे. कोणत्याही मार्गावरील प्रवाशांना, विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागणार नाही. जनता गाडीची उणीव ‘केएमटी’ भरून काढेल. - संजय भोसले(व्यवस्थापक केएमटी)‘केएमटी’ किंवा रिक्षाने जाण्यासाठी मला जादा पैसे मोजावे लागतात. कागल-रंकाळा बसचे शहरांतर्गत थांबे बंद करताना प्रशासनाने जादा गाड्यांचे नियोजन करणे आवश्यक होते. मात्र, दोन दिवसांपासून अन्य पर्यायी व्यवस्थेमुळे मोठा त्रास होत आहे. - बाळू माळी, विद्यार्थी मोटार वाहन कायद्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या शहरात एस.टी.ला स्थानिक सेवा देण्याची परवानगी देता येत नाही. त्यामुळे नियमानुसारच जनता गाडी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. - लक्ष्मण दराडे (प्रादेशिक परिवहन अधिकारी)