शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

जलवाहिनीच्या कामात ‘ढपला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:45 IST

कोल्हापूर : शहराचा पाणीपुरवठा कधी सुरळीत व्हायचा तो होऊ दे, नवीन जलवाहिनी कधी टाकायच्या ते टाकू देत पण आमचं ...

कोल्हापूर : शहराचा पाणीपुरवठा कधी सुरळीत व्हायचा तो होऊ दे, नवीन जलवाहिनी कधी टाकायच्या ते टाकू देत पण आमचं काय? असा सवाल विचारणाऱ्या नगरीच्या सेवकांना जेमतेम बोनस देऊन ‘कारभाºयां’नी मोठा ढपला पाडल्याची चर्चा महानगरपालिका वर्तुळात सुरू आहे. १०८ कोटींच्या जलवाहिनी टाकण्याच्या कामात समान व समाधानकारक वाटपाचे सूत्र बदलल्याने ही चर्चा नाराज झालेल्यांकडून पुढे आली आहे.‘कारभाºयां’नी नेहमीच्या पद्धतीने याही प्रकरणात ‘हात’ मारल्यामुळे कोणाला ५५ हजारांचा तर कोणाला पावणेदोन लाखांचा बोनस मिळाला आहे. बाकीचा सर्व बोनस ठराविक ‘कारभाºयांनी’च लाटल्याचे समजते. त्यामुळे पालिका वर्तुळात नव्यानेच चर्चेला सुरुवात झाली आहे.शहरात १०८ कोटी रुपये खर्च करून नवीन जलवाहिन्या टाकल्या जाणार आहेत. आपल्याच कारकिर्दीत हे काम मंजूर व्हावे म्हणून तत्कालिन बावडेकर सभापतींनी फारच आग्रह धरला होता. परिपूर्ण प्रस्ताव स्थायी समितीसमोर येईपर्यंत या सभापतींची कारक ीर्द संपली तरीही या सभापतींनी आग्रह सोडला नाही.‘कारभाºयां’चे त्यांना पाठबळ असल्याने नवीन सभापतींची निवड काही दिवस पुढे ढकलली. दरम्यानच्या काळात ‘चेअरमन फॉर द मिटिंग’चा आधार घेत त्यांनी हा प्रस्ताव मंजूर करून घेतला. इतका सगळा प्रताप केल्यानंतर या सभापतींनी गेल्या नऊ महिने सातत्याने इमानेइतबारे संबंधित ठेकेदाराबरोबर पाठपुरावा केला.या प्रकरणात तत्कालिन सभापती आणि कारभाºयांनी अडीच खोक्यांचा ढपला पाडल्याची चर्चा असली तर प्रत्यक्षात ८० पेट्यांचाच हा व्यवहार झाल्याचे सांगत सामान्य नगरीच्या सेवकांची फसगत केल्याचा आक्षेप घेतला जात आहे. पाण्यात ‘घाण’ केल्यावर कधी ना कधी वर येते, या निसर्गनियमाप्रमाणे या व्यवहारातील सत्य दोन दिवसांपासून बाहेर आले आहे.त्यामुळे कारभाºयांविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. नेहमीप्रमाणे याही वेळी कारभाºयांनी आपली फसवणूक केल्याची भावना नगरीच्या सेवकांची झाली आहे.सोमवारी रात्री ट्रान्सफॉर्मर जळाल्याने शहरातील पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत झाला आहे. त्याकडे दुर्लक्ष करत कधी पाणी मिळायचे ते मिळू दे, जलवाहिनी कधी टाकायच्या त्या टाकू देत आमचं आणि त्याच काही देणं-घेणं नाही, आमचा संबंध फक्त घेण्याशी आहे, बाकीचे अधिकारी बघून घेतील, अशा विचारांचे नगरीचे सेवक मंगळवारी महापालिकेकडे फिरकलेही नाहीत. विशेष म्हणजे या प्रकरणात पक्ष आघाडी यांचे राजकारण बाजूला ठेऊन सर्वजण एकत्र आल्याचेही चित्र पाहायला मिळाले.धुसफूस नगरसेवकांत : ‘कारभारी’ मोकळेचमहापालिकेत एखादा फायद्याचा विषय असला की सर्व गट-तट, पक्ष विसरून सगळे एकत्र येतात. त्यावेळी आघाडीतील राजकारण विसरून जातात. काही ठरावीक ‘कारभारी’च त्यात लक्ष घालतात, तेच तडजोडी करतात. नगरीच्या सर्वसामान्य सेवकांना त्यातील काहीच कल्पना नसते. शेवटपर्यंत त्यांना काही कळू दिले जात नाही. ठरावीक आकड्यांची पाकिटे त्यांना दिली जातात. पुढे काही दिवसांनी त्या व्यवहारातील सत्य बाहेर पडते आणि आघाडीत धुसफूस सुरू होते. त्याचा राग सर्वसाधारण सभेत व्यक्त होतो. एकाच पक्षाचे दोन सेवक वेगवेगळी भूमिका घेतात आणि समोरच्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतो; पण ‘कारभारी’ मात्र नामानिराळेच राहतात.