शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी शनिवार उजाडणार

By admin | Updated: August 19, 2016 00:35 IST

जलवाहिनी जोडली तरीही प्रतीक्षाच : टॅँकरसाठी नगरसेवकांत चढाओढ; वादावादीचे प्रसंग

कोल्हापूर : चंबुखडी परिसरात फुटलेली ११०० एम.एम. जाडीची मुख्य जलवाहिनी जोडण्यात पाणीपुरवठा विभागास गुरुवारी सायंकाळी यश आले खरे पण शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास उद्या, शनिवार उजाडावा लागणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरातील निम्म्या भागास पाणीपुरवठा होत नसल्याने गुरुवारी पाण्याचे टॅँकर मिळविण्यात नगरसेवकांतच चढाओढ लागली. काहीवेळा वादाचे प्रसंग निर्माण झाल्याने कळंबा जलशुद्धिकरण केंद्रावर पोलिस बंदोबस्त ठेवावा लागला. कोल्हापूर शहराच्या उपनगर आणि ई वॉर्ड परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिंगणापूर पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी मंगळवारी दुपारी चंबुखडी येथे फुटली. पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी असल्याने ती तातडीने दुरुस्त करण्यात आली; परंतु त्याच दिवशी रात्री साडेआठ वाजता त्याच ठिकाणापासून वीस फुटांवर पुन्हा जलवाहिनी फुटली. त्यामुळे चंबुखडी परिसरातील अनेक घरांतून पाणी शिरले. बुधवारी सकाळी वीस फूट अंतरातील जलवाहिनीचा फुटलेला भाग जेसीबीच्या सहायाने काढण्यात आला. त्यानंतर त्या भागात नवीन जलवाहिनी टाकण्यात आली. गेले दोन दिवस जलवाहिनीचे जोडकाम, वेल्डिंगचे काम सुरू असून, गुरुवारी दुपारी हे काम पूर्ण झाले. त्यानंतर जोडलेल्या भागात सिमेंट कॉँक्रीट टाकण्यात आले. कॉँक्रीट वाळण्यास काही तास जावे लागतात. आज, शुक्रवारी सकाळी हळूहळू पाणी उपसा सुरू केला जाणार आहे. त्यामुळे उद्या, शनिवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. गुरुवारी सायंकाळी महापौर अश्विनी रामाणे, स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, कॉँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक मधुकर रामाणे यांनी जलवाहिनी दुरुस्तीच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली तसेच कामाची माहिती करून घेतली. यावेळी महानगरपालिकेचे जलअभियंता मनीष पवार, शाखा अभियंता बी. जी. कुऱ्हाडे, कनिष्ठ अभियंता कुंभार उपस्थित होते. दरम्यान, शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी महानगरपालिकेचे आठ, तर खासगी सोळा असे एकूण चोवीस टॅँकर वापरण्यात आले. कळंबा जलशुद्धिकरण केंद्रात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. या ठिकाणी महापौर अश्विनी रामाणे यांनी भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. दिवसभरात चोवीस टॅँकरच्या १०० हून अधिक फेऱ्या झाल्या होत्या. आज, शुक्रवारीसुद्धा उपनगर आणि ई वॉर्डातील पूर्वभागाला टॅँकरचाच आधार घ्यावा लागणार आहे. पोलिस बंदोबस्तकसबा बावडा व कळंबा जलशुद्धिकरण केंद्रातून टॅँकर वाटप होत होते; परंतु टॅँकरला जादा मागणी असल्याने अनेक नगरसेवक केंद्रावर थांबून होते. काही नगरसेवक तर टॅँकरमध्ये बसूनच होते. त्यामुळे वादावादी होत होती. त्यामुळे कळंबा जलशुद्धिकरण केंद्रावर पोलिस बंदोबस्त ठेवावा लागला.