शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
2
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...
3
अजब मध्यप्रदेशातील गजब पूल! भोपाळपेक्षा दोन पावले पुढे इंदूर, झेड आकाराचा बांधलाय पूल
4
ट्रम्प यांचा भारतासह ब्रिक्स देशांना 'अल्टिमेटम'! २१ देशांवर टॅरिफचा बॉम्ब, मित्राच्या देशावरच लादला सर्वाधिक कर
5
"ट्रम्प घरासमोर सनबाथ घेत असताना एक ड्रोन येईल आणि…’’ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इराणची उघड धमकी
6
"माझं आडनाव कोणालाच...", अमृता सुभाषने सांगितलं वडिलांचं नाव लावण्यामागचं कारण
7
ललित प्रभाकरसोबत झळकणार 'ही' हिंदी अभिनेत्री, शुभमन गिलशी अफेअरच्या रंगल्या चर्चा
8
Aastha Poonia : आकाशाला गवसणी! नौदलाची पहिली महिला फायटर पायलट; 'विंग्स ऑफ गोल्ड'ने सन्मान
9
Video: विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या नयन शाहांचं मराठी एकदा ऐकाच...
10
'ब्लड मनी' घेण्यास तलालच्या कुटुंबाने दिला नकार! येमेनमधल्या निमिषा प्रियाला वाचवण्याची एकमेव आशाही धूसर?
11
विजय देवरकोंडा, प्रकाश राज अन् राणा दग्गुबातीसह अनेक तेलुगू कलाकारांवर ED ची कारवाई; कारण...
12
Viral Video : विटा आणि सीमेंट बघून काय समजलात? पठ्ठ्यानं घरातच बनवला झकास कूलर; एसीलाही देतोय टक्कर
13
भारतातील सर्वात श्रीमंत ढाबा! फक्त आलू पराठे विकून वर्षाला कमावतो १०० कोटी? काय आहे यशाचं गुपित?
14
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
15
Guru Purnima 2025: स्वामी समर्थांची 'ही' एक शिकवण बदलून टाकेल आपले आयुष्य!
16
NASA मधून २ हजार कर्मचाऱ्यांना नारळ मिळणार! डोनाल्ड ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात
17
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
18
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं कारण कळताच पती हादरला!
19
UP च्या 'या' शहराशी नातं, कोण आहेत सबीह खान, ज्यांच्या खांद्यावर आहे Apple च्या COO पदाची जबाबदारी
20
'व्हायरल गर्ल' मोनालिसाला लागली मोठी लॉटरी, 'बिग बॉस'मध्ये करणार एन्ट्री, म्हणाली - "मी जाणार..."

पाण्यासाठी शनिवार उजाडणार

By admin | Updated: August 19, 2016 00:35 IST

जलवाहिनी जोडली तरीही प्रतीक्षाच : टॅँकरसाठी नगरसेवकांत चढाओढ; वादावादीचे प्रसंग

कोल्हापूर : चंबुखडी परिसरात फुटलेली ११०० एम.एम. जाडीची मुख्य जलवाहिनी जोडण्यात पाणीपुरवठा विभागास गुरुवारी सायंकाळी यश आले खरे पण शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास उद्या, शनिवार उजाडावा लागणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरातील निम्म्या भागास पाणीपुरवठा होत नसल्याने गुरुवारी पाण्याचे टॅँकर मिळविण्यात नगरसेवकांतच चढाओढ लागली. काहीवेळा वादाचे प्रसंग निर्माण झाल्याने कळंबा जलशुद्धिकरण केंद्रावर पोलिस बंदोबस्त ठेवावा लागला. कोल्हापूर शहराच्या उपनगर आणि ई वॉर्ड परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिंगणापूर पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी मंगळवारी दुपारी चंबुखडी येथे फुटली. पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी असल्याने ती तातडीने दुरुस्त करण्यात आली; परंतु त्याच दिवशी रात्री साडेआठ वाजता त्याच ठिकाणापासून वीस फुटांवर पुन्हा जलवाहिनी फुटली. त्यामुळे चंबुखडी परिसरातील अनेक घरांतून पाणी शिरले. बुधवारी सकाळी वीस फूट अंतरातील जलवाहिनीचा फुटलेला भाग जेसीबीच्या सहायाने काढण्यात आला. त्यानंतर त्या भागात नवीन जलवाहिनी टाकण्यात आली. गेले दोन दिवस जलवाहिनीचे जोडकाम, वेल्डिंगचे काम सुरू असून, गुरुवारी दुपारी हे काम पूर्ण झाले. त्यानंतर जोडलेल्या भागात सिमेंट कॉँक्रीट टाकण्यात आले. कॉँक्रीट वाळण्यास काही तास जावे लागतात. आज, शुक्रवारी सकाळी हळूहळू पाणी उपसा सुरू केला जाणार आहे. त्यामुळे उद्या, शनिवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. गुरुवारी सायंकाळी महापौर अश्विनी रामाणे, स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, कॉँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक मधुकर रामाणे यांनी जलवाहिनी दुरुस्तीच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली तसेच कामाची माहिती करून घेतली. यावेळी महानगरपालिकेचे जलअभियंता मनीष पवार, शाखा अभियंता बी. जी. कुऱ्हाडे, कनिष्ठ अभियंता कुंभार उपस्थित होते. दरम्यान, शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी महानगरपालिकेचे आठ, तर खासगी सोळा असे एकूण चोवीस टॅँकर वापरण्यात आले. कळंबा जलशुद्धिकरण केंद्रात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. या ठिकाणी महापौर अश्विनी रामाणे यांनी भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. दिवसभरात चोवीस टॅँकरच्या १०० हून अधिक फेऱ्या झाल्या होत्या. आज, शुक्रवारीसुद्धा उपनगर आणि ई वॉर्डातील पूर्वभागाला टॅँकरचाच आधार घ्यावा लागणार आहे. पोलिस बंदोबस्तकसबा बावडा व कळंबा जलशुद्धिकरण केंद्रातून टॅँकर वाटप होत होते; परंतु टॅँकरला जादा मागणी असल्याने अनेक नगरसेवक केंद्रावर थांबून होते. काही नगरसेवक तर टॅँकरमध्ये बसूनच होते. त्यामुळे वादावादी होत होती. त्यामुळे कळंबा जलशुद्धिकरण केंद्रावर पोलिस बंदोबस्त ठेवावा लागला.