शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

कळंब तालुक्यात ४६ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा

By admin | Updated: March 11, 2016 01:05 IST

उस्मानाबाद : दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या कळंब तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे आजघडीला तब्बल ४६ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.

उस्मानाबाद : दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या कळंब तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे आजघडीला तब्बल ४६ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. या टँकरच्या बिलांमध्ये मोठ्याप्रमाणात गैरप्रकार होत असल्याची तक्रार झाल्यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी याची गंभीर दखल घेत चौकशीसाठी पाच सरस्यांची समिती गठित केली आहे. त्यामुळे या चौकशीतून काय समोर येते? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. मागील तीन-चार वर्षांपासून जिल्हाभरात सरासरीच्या अत्यल्प पाऊस होत आहे. गतवर्षी तर सरासरीच्या अवघा ४८ टक्के पाऊस झाला. त्यामुळे बहुतांश प्रकल्प आणि इतर जलस्त्रोत कोरडेठाक आहे. त्यामुळे एकेका गावाला दहा ते २० किमी अंतरावररून टँकरद्वारे पाणी आणून पुरवठा करावा लागत आहे. कळंब तालुक्यातही यापेक्षा काही वेगळे चित्र नाही. आजघडील तब्बल ४६ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु, याच टँकरला वितरित करण्यात आलेली बिले आता चौकशीच्या फेऱ्यात सापडली आहेत. संदीपान कांबळे यांनी याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. खेपा कमी होत असतानाही त्यांना अधिकची बिले दिली जात असून यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यानुसार सीईओ रायते यांनी २९ फेब्रुवारी रोजी सुनावणीही घेतली. सुनावणीदरम्यान झालेल्या चर्चेअंती त्यांनी आजवर वितरित करण्यात आलेल्या बिलांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सदरील चौकशी समितीचे प्रमुख म्हणून पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सदस्य म्हणून पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, वित्त विभागाचे मुख्य लेखा अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक आणि संदीपान कांबळे यांचा समावेश आहे. दरम्यान, सीईओंकडून आदेश प्राप्त होताच चौकशीच्या अनुषंगाने कार्यवाहीला सुरूवात झाली आहे. पंचायत समिती स्तरावरून टँकरला दिलेल्या बिलाच्या अनुषंगाने सर्व रेकॉर्ड मागविण्यात आले आहे. त्यामुळे या चौकशीतून नेमके काय समोर येते? हे चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)