शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
4
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
5
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
6
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
7
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
8
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
9
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
10
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
11
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
12
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
13
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
14
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
15
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
16
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
17
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
18
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
19
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
Daily Top 2Weekly Top 5

कळंब तालुक्यात ४६ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा

By admin | Updated: March 11, 2016 01:05 IST

उस्मानाबाद : दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या कळंब तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे आजघडीला तब्बल ४६ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.

उस्मानाबाद : दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या कळंब तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे आजघडीला तब्बल ४६ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. या टँकरच्या बिलांमध्ये मोठ्याप्रमाणात गैरप्रकार होत असल्याची तक्रार झाल्यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी याची गंभीर दखल घेत चौकशीसाठी पाच सरस्यांची समिती गठित केली आहे. त्यामुळे या चौकशीतून काय समोर येते? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. मागील तीन-चार वर्षांपासून जिल्हाभरात सरासरीच्या अत्यल्प पाऊस होत आहे. गतवर्षी तर सरासरीच्या अवघा ४८ टक्के पाऊस झाला. त्यामुळे बहुतांश प्रकल्प आणि इतर जलस्त्रोत कोरडेठाक आहे. त्यामुळे एकेका गावाला दहा ते २० किमी अंतरावररून टँकरद्वारे पाणी आणून पुरवठा करावा लागत आहे. कळंब तालुक्यातही यापेक्षा काही वेगळे चित्र नाही. आजघडील तब्बल ४६ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु, याच टँकरला वितरित करण्यात आलेली बिले आता चौकशीच्या फेऱ्यात सापडली आहेत. संदीपान कांबळे यांनी याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. खेपा कमी होत असतानाही त्यांना अधिकची बिले दिली जात असून यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यानुसार सीईओ रायते यांनी २९ फेब्रुवारी रोजी सुनावणीही घेतली. सुनावणीदरम्यान झालेल्या चर्चेअंती त्यांनी आजवर वितरित करण्यात आलेल्या बिलांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सदरील चौकशी समितीचे प्रमुख म्हणून पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सदस्य म्हणून पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, वित्त विभागाचे मुख्य लेखा अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक आणि संदीपान कांबळे यांचा समावेश आहे. दरम्यान, सीईओंकडून आदेश प्राप्त होताच चौकशीच्या अनुषंगाने कार्यवाहीला सुरूवात झाली आहे. पंचायत समिती स्तरावरून टँकरला दिलेल्या बिलाच्या अनुषंगाने सर्व रेकॉर्ड मागविण्यात आले आहे. त्यामुळे या चौकशीतून नेमके काय समोर येते? हे चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)