शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

कळंब तालुक्यात ४६ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा

By admin | Updated: March 11, 2016 01:05 IST

उस्मानाबाद : दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या कळंब तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे आजघडीला तब्बल ४६ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.

उस्मानाबाद : दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या कळंब तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे आजघडीला तब्बल ४६ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. या टँकरच्या बिलांमध्ये मोठ्याप्रमाणात गैरप्रकार होत असल्याची तक्रार झाल्यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी याची गंभीर दखल घेत चौकशीसाठी पाच सरस्यांची समिती गठित केली आहे. त्यामुळे या चौकशीतून काय समोर येते? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. मागील तीन-चार वर्षांपासून जिल्हाभरात सरासरीच्या अत्यल्प पाऊस होत आहे. गतवर्षी तर सरासरीच्या अवघा ४८ टक्के पाऊस झाला. त्यामुळे बहुतांश प्रकल्प आणि इतर जलस्त्रोत कोरडेठाक आहे. त्यामुळे एकेका गावाला दहा ते २० किमी अंतरावररून टँकरद्वारे पाणी आणून पुरवठा करावा लागत आहे. कळंब तालुक्यातही यापेक्षा काही वेगळे चित्र नाही. आजघडील तब्बल ४६ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु, याच टँकरला वितरित करण्यात आलेली बिले आता चौकशीच्या फेऱ्यात सापडली आहेत. संदीपान कांबळे यांनी याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. खेपा कमी होत असतानाही त्यांना अधिकची बिले दिली जात असून यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यानुसार सीईओ रायते यांनी २९ फेब्रुवारी रोजी सुनावणीही घेतली. सुनावणीदरम्यान झालेल्या चर्चेअंती त्यांनी आजवर वितरित करण्यात आलेल्या बिलांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सदरील चौकशी समितीचे प्रमुख म्हणून पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सदस्य म्हणून पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, वित्त विभागाचे मुख्य लेखा अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक आणि संदीपान कांबळे यांचा समावेश आहे. दरम्यान, सीईओंकडून आदेश प्राप्त होताच चौकशीच्या अनुषंगाने कार्यवाहीला सुरूवात झाली आहे. पंचायत समिती स्तरावरून टँकरला दिलेल्या बिलाच्या अनुषंगाने सर्व रेकॉर्ड मागविण्यात आले आहे. त्यामुळे या चौकशीतून नेमके काय समोर येते? हे चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)