शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
5
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
8
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
9
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
10
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
11
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
12
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
13
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
14
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
15
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
16
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
17
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
18
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
19
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
20
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!

पाणीपुरवठा, पाईप खरेदीवरून खडाजंगी

By admin | Updated: January 3, 2017 01:17 IST

इचलकरंजीच्या नगरपालिका सभेत गदारोळ : दोन्ही विषय मंजूर; नगररचनाकारांवरील तक्रारींवर सवाल

इचलकरंजी : वारणा पाणीपुरवठा योजना कामासाठीची १९.९९ टक्के कमी दराची आर. एस. घुले यांची निविदा आणि डीआय पाईप्सची खरेदी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणऐवजी नगरपरिषदेमार्फत पुरविणे, या दोन्ही विषयांवर इचलकरंजी येथील नगरपालिकेच्या पहिल्या सभेत खडाजंगी झाली. त्यानंतर हे दोन्ही महत्त्वाचे विषय मंजूर करण्यात आले. नगरपालिकेच्या सभागृहात सोमवारी झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अलका स्वामी होत्या. सभेमध्ये वारणा पाणीपुरवठा व पाईप पुरविणे हे दोन विषय होते. यामध्ये वारणा योजनेच्या २४.२८ कोटी रुपये कामासाठी मागविलेल्या निविदांपैकी सर्वांत कमी म्हणजे १९.९९ टक्के कमी दराची निविदा मंजूर करणे तसेच पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक डीआय पाईपचा पुरवठा नगरपरिषदेमार्फत करणे, हे विषय मंजूर करण्यात आले.निवडणुकीनंतर नगरपरिषदेची ही पहिलीच सभा होती. प्रारंभी मुख्याधिकारी प्रशांत रसाळ यांनी सर्व नूतन सदस्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांच्यासह सर्वच सदस्यांनी सभागृहाला आपली ओळख करून दिली, तर विरोधी काँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील, राजर्षी शाहू विकास आघाडीचे पक्षप्रतोद विठ्ठल चोपडे यांनी प्रत्येक विकासकामात सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.सभेला सुरुवात होताच शाहू आघाडीचे नगरसेवक उदयसिंह पाटील यांनी नगररचनाकार सभागृहात हजर नसल्याचे निदर्शनास आणून ते महत्त्वाच्या बैठकीवेळी गैरहजर असतात, त्यांच्याबद्दल नागरिकांच्याही तक्रारी असल्याचा प्रश्न उपस्थित केला; पण त्यावर कार्यालयाकडून मात्र कोणत्याही प्रकारचा खुलासा करण्यात आला नाही. वारणा पाणी योजनेसंबंधीच्या विषयावर बोलताना नगरसेवक शशांक बावचकर यांनी पालघरच्या आर. ए. घुले यांनी यापूर्वी केलेल्या कामाची तपासणी केली आहे काय, योजनेसाठी वारणा धरणातून पाण्याचे आरक्षण केले आहे का, तसेच दानोळी (ता. शिरोळ) येथे योजनेसाठी आवश्यक इंटकवेलसाठी जागा खरेदी केली आहे का, असे सवाल उपस्थित केले. त्यावर मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी सभागृहाला माहिती देताना पाटबंधारे विभागाची नगरपालिकेकडून १७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ती माफ होण्यासाठी जलसंपदा मंत्र्यांकडे मागणी केली आहे. परंतु, त्यांनी त्यास नकार दर्शविला असून, एक कोटी रुपये जमा केल्यास पाण्याचे आरक्षण दिले जाईल, असे आश्वासन दिल्याचे सांगितले. त्यानुसार पालिकेने पाटबंधारे विभागाकडे ८५ लाख रुपये जमा केले असून, मार्चअखेर ३५ लाख रुपये जमा करण्यात येणार आहेत. हे काम शासनाच्या आदेशानुसार सुरू असल्याचे सांगितले. या दोन्ही विषयांवर दोन्ही गटांच्या प्रमुख सदस्यांमध्ये वादावादीचे प्रसंगही घडले. अखेर दोन्ही बाजंूच्या संमतीने मंजुरी देण्यात आली. (वार्ताहर)