शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

बस्तवाडला दूषित पाणीपुरवठा

By admin | Updated: November 6, 2014 00:38 IST

पन्नासजणांंना साथीचे आजार : टँकरने पाणीपुरवठा सुरू; आरोग्य यंत्रणा खडबडून जागी

कुरुंदवाड : कृष्णा नदीत मळीयुक्त दूषित पाणी आल्यामुळे बस्तवाड (ता. शिरोळ) येथील नागरिकांना उलट्या व जुलाब होत असून, पन्नासहून अधिक लोकांना या साथीच्या आजारांची लागण झाली आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत असून, नदी दूषित करणाऱ्यांची चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे. दूषित पाण्यामुळे नदी उशाला असूनही ग्रामस्थांना टॅँकरच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. या साथीच्या आजारांमुळे तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, तालुका वैद्यकीय अधिकारी पी. एस. दातार यांच्या नेतृत्वाखाली आठ डॉक्टरांचे पथक कार्यरत झाले आहे. दरम्यान, दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाल्याने आमदार उल्हास पाटील, जि. प. आरोग्य सभापती सीमा पाटील यांनी गावाला भेट देऊन रुग्णांची चौकशी केली.कृष्णा नदीकाठावर असलेल्या बस्तवाड गावाला या नदीतून पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा केला जातो. गावाला फिल्टर योजना नसल्याने टीसीएल (पाणी शुद्धिकरण पावडर) वापरून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या दोन दिवसांपासून नदीला काळेकुट्ट व दुर्गंधी सुटणारे मळीयुक्त पाणी आल्याने व ते पाणी गावात पुरवठा केल्याने नागरिकांना उलट्यांचा त्रास जाणवू लागला. सरपंच शमाबानू जमादार, उपसरपंच जे. डी. चव्हाण यांनी आरोग्य विभागाला कळविल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. आज, बुधवारी सकाळी पंचायत समिती तालुका वैद्यकीय अधिकारी पी. एस. दातार यांच्या नेतृत्वाखाली व टाकळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी एम. ए. ऐनापुरे यांच्यासह आठ डॉक्टरांच्या पथकाने तपासणी व उपचार मोहीम सुरू केली. अचानक उद्भवलेल्या साथीच्या आजारांमुळे नागरिकांतून भीती व्यक्त होत असून, ग्रामस्थांना पिण्यासाठी दत्त साखर कारखान्याच्या अग्निशमन विभागाकडून टॅँकरने पाण्याचा पुरवठा केला जात आहे. ग्रामस्थांची झुंबड उडाली असून, नदी उशाला व तुडुंब भरलेली असतानाही पाण्याच्या टॅँकरची वाट पाहावी लागत आहे, हे दुर्दैव आहे.गावामध्ये आरोग्याचा प्रश्न गंभीर बनल्याचे समजताच आ. उल्हास पाटील यांनी गावाला भेट देऊन नदीतील पाण्याची पाहणी करून अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. तसेच जि. प. आरोग्य सभापती सीमा पाटील, स्वाभिमानी संघटनेचे युवा आघाडी तालुकाध्यक्ष बंडू पाटील, विजय पाटील यांनी नदीतील प्रदूषित पाणी घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. गावाला टँकरने शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी इरफान जमादार, जे. डी. चव्हाण, जाफर पटेल, महावीर मगदूम, आसिफ पटेल, दिलावर पटेल, आदी प्रयत्न करीत आहेत, तर गावातील तरुण कार्यकर्त्यांनी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीची श्रमदानातून स्वच्छता केली. (प्रतिनिधी)कृष्णा नदीत अचानक आलेल्या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याचे उपसरपंच जे. डी. चव्हाण म्हणाले. ते म्हणाले, त्यामुळे गावाची पिण्याची नळ पाणीपुरवठा व्यवस्था तात्पुरती बंद ठेवली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था केली असून, नागरिकांनी पिण्यासाठी याच पाण्याचा वापर करावा. नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांची चौकशी होऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी.