शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

तीन महिने पुरेल एवढा पाणीसाठा

By admin | Updated: June 3, 2015 01:06 IST

धरणांची स्थिती : २८.५३ टीएमसी साठा शिल्लक

कोल्हापूर : विदर्भ, मराठवाडा पाण्याने तहानलेला असताना आणि तेथील जनता भीषण पाणीटंचाईला सामोरे जात असताना कोल्हापूर जिल्हा मात्र पाण्याच्या बाबतीत नशीबवान ठरला आहे. कोल्हापूरकरांना अद्याप तीन महिने पुरेल एवढा पाणीसाठा जिल्ह्यातील धरणांतून उपलब्ध आहे.कोल्हापूर जिल्ह्यात चौदा लहान-मोठी धरणे असून, प्रत्येक वर्षी या धरणांत पावसाळ्यात ८८ टीएमसी जलसंचय होतो. मंगळवारी जलसंपदा विभागाने जी आकडेवारी प्रसिद्ध केली, त्यावरून या सर्व धरणांत मिळून २८.५३ टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा पाहता कोल्हापूरकरांची किमान तीन महिन्यांची गरज आरामात पूर्ण होईल. जिल्ह्यात प्रत्येक महिन्याला शेती आणि पिण्यासाठी सरासरी ९ ते १० टीएमसी पाण्याचा वापर होतो, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या हिशेबाने पुढचे अडीच ते तीन महिने जरी पाऊस लांबला तरी कोल्हापूरकरांना पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही. तरीही सर्वच धरणांतून आता गरज इतकेच पाणी सोडण्यात येत आहे. राधानगरी ६६.५७ (५९०.९८) तुळशी ३६.२४ (६१६.९१)वारणा ५३२.३४ (६२६.९०) दूधगंगा २०६.६३ (६४६)कासारी २८.९७ (६२३.००) कडवी २९.८९ (६०१.२५)कुंभी २६.८२ (६१२.२०) पाटगाव ३६.४० (६२६.६०) चिकोत्रा ८.४१ (६८८.००)चित्री १३.८० (७१८.९०)जंगमहट्टी ९.१२ (७२६.२०) घटप्रभा २२.४६ (७४२.३५) जांबरे ०.०० (७३७.२३) कोदे ल. पा. १.२३ (१२२.००)असा आहे पाणीसाठाजिल्ह्यात मंगळवारी सकाळी सातच्या नोंदीनुसार धरणांतील पाणीसाठ्याची माहिती पुढीलप्रमाणे आहे. अनुक्रमे धरणाचे नाव, आजचा पाणीसाठा, पूर्णसंचय पाणीसाठा कंसामध्ये दर्शविण्यात आला आहे. सर्व आकडे दशलक्ष घनमीटरमध्ये आहेत.आजच्या नोंदीप्रमाणे कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी १३ फूट ६ इंच, सुर्वे ११ फूट, ३ इंच, रुई ४२ फूट, तेरवाड ३५ फूट ६ इंच, शिरोळ २७ फूट, नृसिंहवाडी २३ फूट.