शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

चंदगडला २४ गावे, १९ वाड्यांमध्ये पाणीटंचाई

By admin | Updated: December 21, 2015 00:39 IST

उपाययोजना आराखडा सादर : पाणीटंचाई निवारण्यासाठी ३७ लाख रुपये खर्च अपेक्षित

चंदगड : मुबलक पाणी असणाऱ्या चंदगड तालुक्यात यावर्षी पावसाने दगा दिल्याने व पाटबंधारे विभागाच्या चुकीमुळे पाणीटंचाई जाणवणार आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी तब्बल ५०० मि.मी. पाऊस कमी झाल्याने चंदगड तालुक्यातील तलावामध्ये कमी प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. साठवलेले पाणीही पाटबंधारे विभागाने ताम्रपर्णी नदीत न अडवल्याने ते कर्नाटकात वाहून जात आहे. त्यामुळे नदीत पाणीसाठा न झाल्याने शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने २४ गावे, १९ वाड्यांवर तीव्र पाणीटंचाई भासणार असल्याने उपाययोजना करण्यासाठीचा आराखडा जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला आहे.चंदगड तालुक्यातील झांबर, जंगमहट्टी, हेरे, आंबेवाडी व इतर प्रकल्पांत प्रमाणापेक्षा कमी पाणीसाठा झाला. त्यातच पाटबंधारे विभागाने ताम्रपर्णी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना बरगे न घातल्याने पाणी सरळ कर्नाटकात वाहून जात आहे. पाणी नदीत न साठवल्याने जवळपासच्या विहिरींनाही पाणी नाही. त्यामुळे विहिरीवर अवलंबून असणाऱ्या गावांना व शेतकऱ्यांना पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. भविष्यात या गावांना तीव्र टंचाई भासू नये यासाठी पाणीपुरवठा विभागाने ६ सार्वजनिक विहिरी खोल करणे, ६ खासगी विहिरी अधिग्रहण करणे, प्रगतिपथावर असलेल्या ४ गावांच्या नळपाणी योजना तातडीने पूर्ण करणे, २३ गावांत नवीन विंधन विहीर खोदणे, २ गावांच्या नळपाणी योजना दुरुस्त करणे, आदी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.डुक्करवाडी, दाटे, तुडये, सातेरी टोक, गुडेवाडी, हाजगोळी, शिंदेवाडी, चिंचणे, नांदवडे, माडवळे, पाशिवाडा, मोटणवाडी, मौजे व मजरे जट्टेवाडी, खळणेकरवाडी, बांदराई, नगरगाव, आबेमाळ, पारगड नामखोल, वाघोत्रे, लक्कीकट्टे, कोरज या गावांना नवीन विंधन विहीर घेणे गरजेचे आहे, तर मोरेवाडी, देवरवाडी, सुंडी, कौलगे, तुडये/महादेवनगर, बागिलगे या गावांसाठी खासगी विहीर अधिग्रहण केल्यास पाणीटंचाई निवारण होईल. मळवीवाडी, कल्याणपूर, वाळकोळी, जक्कनहट्टी या ठिकाणच्या सार्वजनिक विहिरींतील गाळ काढणे, विहीर खोल कराव्या लागणार आहेत. शिवणगे, हाजगोळी / शिंदेवाडी येथील नळपाणी योजनांची दुरुस्ती करावी लागणार आहे. नागरदळे, चिंचणे येथे तात्पुरती नळपाणी योजना सुरू करण्याबाबत उपाय सुचविला आहे. सुंडी, महिपाळगड, बुक्कीहाळ, होसूर येथील नळपाणी योजना तातडीने सुरू करण्याबाबतची उपाययोजना या विभागाकडून करण्यात आली आहे.नागरिकांना पाणी टंचाईची समस्या जाणवू नये यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून टंचाई निवारण आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी ३७ लाख २८ हजार रुपये अपेक्षित आहेत. आमदार संध्यादेवी कुपेकर, गटविकास अधिकारी एस. डी. सोनवणे, सभापती ज्योती पाटील, शांताराम पाटील यांच्या स्वाक्षरीचे निवेदन जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)ग्रामपंचायतींनी १५०० भरावेतचंदगड तालुक्यात २०० हून अधिक सुस्थित असलेले बोअरवेल आहेत. या बोअरची खासगी दुरुस्ती करून घेतल्यास ग्रामपंचायतींना भरमसाट खर्च येतो. त्यासाठी ग्रामपंचायतींनी पंचायत समितीच्या यांत्रिकी विभागाकडे १५०० रुपये भरल्यास वर्षभर कितीही वेळा मोफत बोअरवेलची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींनी १५०० रुपये या विभागाकडे भरावेत, असे आवाहनही उपअभियंता ए. एस. सावळगी यांनी केले आहे.