शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

राजापूर बंधाऱ्यावर पाण्याच्या नियोजनाची गरज

By admin | Updated: December 7, 2015 00:24 IST

बरगे बसविण्याची मागणी : कमी पावसामुळे पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न बनणार गंभीर

संदीप बावचे-- शिरोळ -यंदा दुष्काळसदृश परिस्थिती असल्यामुळे शिरोळ तालुक्यात पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची चिन्हे आहेत. बरग्यांअभावी राजापूर बंधाऱ्यातून दररोज लाखो लिटर पाणी कर्नाटकात वाया जात आहे. आतापासूनच योग्य नियोजन साधले नाही, तर शिरोळ तालुक्याला पाणी-पाणी म्हणण्याची वेळ येणार आहे. पावसाळ्यात पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्यामुळे पुढील येणाऱ्या काळात भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत. दिवसेंदिवस कृष्णा नदीपात्रातील पाण्याची पातळी खालावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. त्याचबरोबर शेतीस पुरवठा करणाऱ्या पाणी संस्थांचेही नियोजन कोलमडण्याची चिन्हे आहेत.दरवर्षी कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडू लागले तर शेतकरी शेती पिकास पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी जेसीबी यंत्राच्या साहाय्याने खड्डे मारून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी कसरत करतात. योग्य नियोजन न साधल्यामुळे प्रत्येक वर्षी पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसतो, ही वस्तुस्थिती आहे. सध्या कृष्णा-पंचगंगा नद्यांची पाणी पातळी खालावली आहे. पाटबंधारे विभागाने जाहीर प्रकटनाद्वारे पाणी कमी पडणार असल्याने शेतकऱ्यांना उसाऐवजी कडधान्य पीक घेण्याचे आवाहन केले आहे. नद्यांची पाणी पातळी खालावली असताना राजापूर बंधाऱ्याला बरगेच बसविले नसल्याने सध्या लाखो लिटर पाणी दररोज वाया जात आहे. टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणी अडविण्यासाठी राजापूर बंधाऱ्याला तत्काळ बरगे बसविण्याची गरज आहे. अनेक गावे अवलंबूनयंदा पाऊस कमी झाल्याने ऊस पिकाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे उत्पादनात घट येणार आहे. आगामी काळात ऊस क्षेत्राला पाणी कमी मिळणार असल्यामुळे शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त होत आहे. त्यातच राजापूर बंधाऱ्यावर बरगे नसल्याने मोठ्या प्रमाणात कृष्णा नदीतून पाणी पुढे जात आहे. येणाऱ्या उन्हाळ्यात बंधाऱ्यावर अवलंबून असलेल्या २२ हून अधिक गावांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच पाणीपुरवठ्याचे नियोजन करून राजापूर बंधाऱ्याला बरगे घालून पाण्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.प्रस्ताव कागदावरच१९८० ला बांधण्यात आलेला राजापूर बंधारा सध्या कमकुवत बनला आहे. कर्नाटकातील हिप्परगी धरणावरील स्वयंचलित दरवाजानुसार राजापूरचा बंधारा करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्याचा आराखडा अजूनही कागदावरच राहिला आहे. नाशिक येथील कंपनीकडे आराखडा करण्यासाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.