शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर बंधाऱ्यावर पाण्याच्या नियोजनाची गरज

By admin | Updated: December 7, 2015 00:24 IST

बरगे बसविण्याची मागणी : कमी पावसामुळे पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न बनणार गंभीर

संदीप बावचे-- शिरोळ -यंदा दुष्काळसदृश परिस्थिती असल्यामुळे शिरोळ तालुक्यात पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची चिन्हे आहेत. बरग्यांअभावी राजापूर बंधाऱ्यातून दररोज लाखो लिटर पाणी कर्नाटकात वाया जात आहे. आतापासूनच योग्य नियोजन साधले नाही, तर शिरोळ तालुक्याला पाणी-पाणी म्हणण्याची वेळ येणार आहे. पावसाळ्यात पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्यामुळे पुढील येणाऱ्या काळात भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत. दिवसेंदिवस कृष्णा नदीपात्रातील पाण्याची पातळी खालावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. त्याचबरोबर शेतीस पुरवठा करणाऱ्या पाणी संस्थांचेही नियोजन कोलमडण्याची चिन्हे आहेत.दरवर्षी कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडू लागले तर शेतकरी शेती पिकास पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी जेसीबी यंत्राच्या साहाय्याने खड्डे मारून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी कसरत करतात. योग्य नियोजन न साधल्यामुळे प्रत्येक वर्षी पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसतो, ही वस्तुस्थिती आहे. सध्या कृष्णा-पंचगंगा नद्यांची पाणी पातळी खालावली आहे. पाटबंधारे विभागाने जाहीर प्रकटनाद्वारे पाणी कमी पडणार असल्याने शेतकऱ्यांना उसाऐवजी कडधान्य पीक घेण्याचे आवाहन केले आहे. नद्यांची पाणी पातळी खालावली असताना राजापूर बंधाऱ्याला बरगेच बसविले नसल्याने सध्या लाखो लिटर पाणी दररोज वाया जात आहे. टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणी अडविण्यासाठी राजापूर बंधाऱ्याला तत्काळ बरगे बसविण्याची गरज आहे. अनेक गावे अवलंबूनयंदा पाऊस कमी झाल्याने ऊस पिकाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे उत्पादनात घट येणार आहे. आगामी काळात ऊस क्षेत्राला पाणी कमी मिळणार असल्यामुळे शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त होत आहे. त्यातच राजापूर बंधाऱ्यावर बरगे नसल्याने मोठ्या प्रमाणात कृष्णा नदीतून पाणी पुढे जात आहे. येणाऱ्या उन्हाळ्यात बंधाऱ्यावर अवलंबून असलेल्या २२ हून अधिक गावांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच पाणीपुरवठ्याचे नियोजन करून राजापूर बंधाऱ्याला बरगे घालून पाण्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.प्रस्ताव कागदावरच१९८० ला बांधण्यात आलेला राजापूर बंधारा सध्या कमकुवत बनला आहे. कर्नाटकातील हिप्परगी धरणावरील स्वयंचलित दरवाजानुसार राजापूरचा बंधारा करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्याचा आराखडा अजूनही कागदावरच राहिला आहे. नाशिक येथील कंपनीकडे आराखडा करण्यासाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.