शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
3
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
4
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
5
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
6
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
7
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
8
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
9
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
10
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
11
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
12
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
13
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
14
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
15
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
16
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
17
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
18
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
19
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
20
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  

संगणकीय प्रणालीद्वारे पाणी व्यवस्थापन शक्य

By admin | Updated: June 8, 2016 00:08 IST

व्यंकटेश मेरवाडे : अचूक हवामानाच्या अंदाजासाठी सदोष माहिती आवश्यक

कोल्हापूर : जागतिक हवामानातील बदलांमुळे यापुढे पूर आणि दुष्काळ कमी-जास्त होत राहणार आहे. त्यामध्ये आपल्याला हस्तक्षेप करता येत नाही. मात्र, अद्ययावत संगणकीय प्रणालींच्या माध्यमातून व्यवस्थापन करून पाणीटंचाईवर मात करणे शक्य असल्याचे मत अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठातील प्रा. डॉ. व्यंकटेश मेरवाडे यांनी मंगळवारी व्यक्त केले.मूळचे कोल्हापूरचे असणारे प्रा. मेरवाडे हे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे पुरस्कृत ‘ग्यान’ उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठात मार्गदर्शनासाठी आले आहेत. त्यांनी पाणी व्यवस्थापनासाठी संगणकीय प्रणालीचा वापर, याबाबत ‘लोकमत’समवेत संवाद साधला. ते म्हणाले, भारतातील शहरासह ग्रामीण भागातील विकासाच्या वेगाचा परिणाम पाणी उपलब्धतेवर होत आहे. हवामानातील बदलांमुळे एकीकडे पूर येईपर्यंत पाऊस पडतो; तर दुसरीकडे दुष्काळ उद्भवतो. जमिनीचा वापर आणि पर्यावरणातील बदलांमुळे जलस्रोतांचे व्यवस्थापन करणे कठीण बनते. त्यातून पाणीटंचाई निर्माण होते. ती रोखण्यासाठी पाऊस आणि दुष्काळी स्थितीचा अंदाज घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या देशात अमेरिका, युरोप, इंग्लंड, हॉलंड, आदी देशांप्रमाणे पाणी व्यवस्थापनासाठी संगणकीय प्रणालींचा वापर करणे उपयुक्त आहे. त्यासाठी राजकीय पातळीवरून पाठबळ देण्याची गरज आहे. अचूक हवामान समजल्यास भविष्यातील धोक्यांबाबत दक्ष राहून कार्यवाही करता येणे शक्य आहे. त्यामुळे देशातील अचूक हवामानासाठी संबंधित यंत्रणेने सदोष माहितीचा वापर करणे आवश्यक आहे. लहान गावांमध्ये जलयुक्त शिवार पाणी संवर्धनासाठी ठीक आहे; पण मोठी शहरे, त्यांच्या परिसरात संगणकीय प्रणालीद्वारे जलस्रोतांचे व्यवस्थापन करून पाण्याचे अधिक संवर्धन करणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, अद्ययावत संगणकीय प्रणालीद्वारे नद्यांमधील उपलब्ध पाणीसाठा, पाऊस पडल्यास पाणी संवर्धनासाठी नेमके कोठे काय करावे, दुष्काळ पडणार असल्यास पाणी व्यवस्थापन कसे करावे याची माहिती उपलब्ध होत असल्याने त्यांचा वापर उपयुक्त ठरतो.प्रणाली विकसित : माहिती देण्याची तयारीसध्या होआयो नदीच्या व्यवस्थापनावर संशोधन करीत असलेल्या प्रा. मेरवाडे यांनी या संशोधनासाठी डिजिटल इलेव्हेशन मॉडेलद्वारे विकसित केलेल्या प्रणालीबाबत तांत्रिक माहिती देशाला देण्याची तयारी असल्याचे सांगितले. सहकाऱ्यांनी यासाठी तीन महिन्यांतील दुष्काळाची पूर्वकल्पना देणारी ‘ड्रॉट इंडेक्स’ प्रणाली विकसित केली आहे. तिचा वापर केल्यास देशात दुष्काळाची माहिती घेऊन नद्या तसेच जलस्रोतांच्या पाण्याचे व्यवस्थापन करता येऊ शकते. यासाठी पायाभूत सुविधा, सायबर तंत्रज्ञान, अद्ययावत डाटा सिम्युलेशन व ज्ञान, माहितीची देवाण-घेवाण महत्त्वपूर्ण ठरते. प्रणाली विकसित : माहिती देण्याची तयारीसध्या होआयो नदीच्या व्यवस्थापनावर संशोधन करीत असलेल्या प्रा. मेरवाडे यांनी या संशोधनासाठी डिजिटल इलेव्हेशन मॉडेलद्वारे विकसित केलेल्या प्रणालीबाबत तांत्रिक माहिती देशाला देण्याची तयारी असल्याचे सांगितले. सहकाऱ्यांनी यासाठी तीन महिन्यांतील दुष्काळाची पूर्वकल्पना देणारी ‘ड्रॉट इंडेक्स’ प्रणाली विकसित केली आहे. तिचा वापर केल्यास देशात दुष्काळाची माहिती घेऊन नद्या तसेच जलस्रोतांच्या पाण्याचे व्यवस्थापन करता येऊ शकते. यासाठी पायाभूत सुविधा, सायबर तंत्रज्ञान, अद्ययावत डाटा सिम्युलेशन व ज्ञान, माहितीची देवाण-घेवाण महत्त्वपूर्ण ठरते.