शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

संगणकीय प्रणालीद्वारे पाणी व्यवस्थापन शक्य

By admin | Updated: June 8, 2016 00:08 IST

व्यंकटेश मेरवाडे : अचूक हवामानाच्या अंदाजासाठी सदोष माहिती आवश्यक

कोल्हापूर : जागतिक हवामानातील बदलांमुळे यापुढे पूर आणि दुष्काळ कमी-जास्त होत राहणार आहे. त्यामध्ये आपल्याला हस्तक्षेप करता येत नाही. मात्र, अद्ययावत संगणकीय प्रणालींच्या माध्यमातून व्यवस्थापन करून पाणीटंचाईवर मात करणे शक्य असल्याचे मत अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठातील प्रा. डॉ. व्यंकटेश मेरवाडे यांनी मंगळवारी व्यक्त केले.मूळचे कोल्हापूरचे असणारे प्रा. मेरवाडे हे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे पुरस्कृत ‘ग्यान’ उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठात मार्गदर्शनासाठी आले आहेत. त्यांनी पाणी व्यवस्थापनासाठी संगणकीय प्रणालीचा वापर, याबाबत ‘लोकमत’समवेत संवाद साधला. ते म्हणाले, भारतातील शहरासह ग्रामीण भागातील विकासाच्या वेगाचा परिणाम पाणी उपलब्धतेवर होत आहे. हवामानातील बदलांमुळे एकीकडे पूर येईपर्यंत पाऊस पडतो; तर दुसरीकडे दुष्काळ उद्भवतो. जमिनीचा वापर आणि पर्यावरणातील बदलांमुळे जलस्रोतांचे व्यवस्थापन करणे कठीण बनते. त्यातून पाणीटंचाई निर्माण होते. ती रोखण्यासाठी पाऊस आणि दुष्काळी स्थितीचा अंदाज घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या देशात अमेरिका, युरोप, इंग्लंड, हॉलंड, आदी देशांप्रमाणे पाणी व्यवस्थापनासाठी संगणकीय प्रणालींचा वापर करणे उपयुक्त आहे. त्यासाठी राजकीय पातळीवरून पाठबळ देण्याची गरज आहे. अचूक हवामान समजल्यास भविष्यातील धोक्यांबाबत दक्ष राहून कार्यवाही करता येणे शक्य आहे. त्यामुळे देशातील अचूक हवामानासाठी संबंधित यंत्रणेने सदोष माहितीचा वापर करणे आवश्यक आहे. लहान गावांमध्ये जलयुक्त शिवार पाणी संवर्धनासाठी ठीक आहे; पण मोठी शहरे, त्यांच्या परिसरात संगणकीय प्रणालीद्वारे जलस्रोतांचे व्यवस्थापन करून पाण्याचे अधिक संवर्धन करणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, अद्ययावत संगणकीय प्रणालीद्वारे नद्यांमधील उपलब्ध पाणीसाठा, पाऊस पडल्यास पाणी संवर्धनासाठी नेमके कोठे काय करावे, दुष्काळ पडणार असल्यास पाणी व्यवस्थापन कसे करावे याची माहिती उपलब्ध होत असल्याने त्यांचा वापर उपयुक्त ठरतो.प्रणाली विकसित : माहिती देण्याची तयारीसध्या होआयो नदीच्या व्यवस्थापनावर संशोधन करीत असलेल्या प्रा. मेरवाडे यांनी या संशोधनासाठी डिजिटल इलेव्हेशन मॉडेलद्वारे विकसित केलेल्या प्रणालीबाबत तांत्रिक माहिती देशाला देण्याची तयारी असल्याचे सांगितले. सहकाऱ्यांनी यासाठी तीन महिन्यांतील दुष्काळाची पूर्वकल्पना देणारी ‘ड्रॉट इंडेक्स’ प्रणाली विकसित केली आहे. तिचा वापर केल्यास देशात दुष्काळाची माहिती घेऊन नद्या तसेच जलस्रोतांच्या पाण्याचे व्यवस्थापन करता येऊ शकते. यासाठी पायाभूत सुविधा, सायबर तंत्रज्ञान, अद्ययावत डाटा सिम्युलेशन व ज्ञान, माहितीची देवाण-घेवाण महत्त्वपूर्ण ठरते. प्रणाली विकसित : माहिती देण्याची तयारीसध्या होआयो नदीच्या व्यवस्थापनावर संशोधन करीत असलेल्या प्रा. मेरवाडे यांनी या संशोधनासाठी डिजिटल इलेव्हेशन मॉडेलद्वारे विकसित केलेल्या प्रणालीबाबत तांत्रिक माहिती देशाला देण्याची तयारी असल्याचे सांगितले. सहकाऱ्यांनी यासाठी तीन महिन्यांतील दुष्काळाची पूर्वकल्पना देणारी ‘ड्रॉट इंडेक्स’ प्रणाली विकसित केली आहे. तिचा वापर केल्यास देशात दुष्काळाची माहिती घेऊन नद्या तसेच जलस्रोतांच्या पाण्याचे व्यवस्थापन करता येऊ शकते. यासाठी पायाभूत सुविधा, सायबर तंत्रज्ञान, अद्ययावत डाटा सिम्युलेशन व ज्ञान, माहितीची देवाण-घेवाण महत्त्वपूर्ण ठरते.