शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

संगणकीय प्रणालीद्वारे पाणी व्यवस्थापन शक्य

By admin | Updated: June 8, 2016 00:08 IST

व्यंकटेश मेरवाडे : अचूक हवामानाच्या अंदाजासाठी सदोष माहिती आवश्यक

कोल्हापूर : जागतिक हवामानातील बदलांमुळे यापुढे पूर आणि दुष्काळ कमी-जास्त होत राहणार आहे. त्यामध्ये आपल्याला हस्तक्षेप करता येत नाही. मात्र, अद्ययावत संगणकीय प्रणालींच्या माध्यमातून व्यवस्थापन करून पाणीटंचाईवर मात करणे शक्य असल्याचे मत अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठातील प्रा. डॉ. व्यंकटेश मेरवाडे यांनी मंगळवारी व्यक्त केले.मूळचे कोल्हापूरचे असणारे प्रा. मेरवाडे हे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे पुरस्कृत ‘ग्यान’ उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठात मार्गदर्शनासाठी आले आहेत. त्यांनी पाणी व्यवस्थापनासाठी संगणकीय प्रणालीचा वापर, याबाबत ‘लोकमत’समवेत संवाद साधला. ते म्हणाले, भारतातील शहरासह ग्रामीण भागातील विकासाच्या वेगाचा परिणाम पाणी उपलब्धतेवर होत आहे. हवामानातील बदलांमुळे एकीकडे पूर येईपर्यंत पाऊस पडतो; तर दुसरीकडे दुष्काळ उद्भवतो. जमिनीचा वापर आणि पर्यावरणातील बदलांमुळे जलस्रोतांचे व्यवस्थापन करणे कठीण बनते. त्यातून पाणीटंचाई निर्माण होते. ती रोखण्यासाठी पाऊस आणि दुष्काळी स्थितीचा अंदाज घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या देशात अमेरिका, युरोप, इंग्लंड, हॉलंड, आदी देशांप्रमाणे पाणी व्यवस्थापनासाठी संगणकीय प्रणालींचा वापर करणे उपयुक्त आहे. त्यासाठी राजकीय पातळीवरून पाठबळ देण्याची गरज आहे. अचूक हवामान समजल्यास भविष्यातील धोक्यांबाबत दक्ष राहून कार्यवाही करता येणे शक्य आहे. त्यामुळे देशातील अचूक हवामानासाठी संबंधित यंत्रणेने सदोष माहितीचा वापर करणे आवश्यक आहे. लहान गावांमध्ये जलयुक्त शिवार पाणी संवर्धनासाठी ठीक आहे; पण मोठी शहरे, त्यांच्या परिसरात संगणकीय प्रणालीद्वारे जलस्रोतांचे व्यवस्थापन करून पाण्याचे अधिक संवर्धन करणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, अद्ययावत संगणकीय प्रणालीद्वारे नद्यांमधील उपलब्ध पाणीसाठा, पाऊस पडल्यास पाणी संवर्धनासाठी नेमके कोठे काय करावे, दुष्काळ पडणार असल्यास पाणी व्यवस्थापन कसे करावे याची माहिती उपलब्ध होत असल्याने त्यांचा वापर उपयुक्त ठरतो.प्रणाली विकसित : माहिती देण्याची तयारीसध्या होआयो नदीच्या व्यवस्थापनावर संशोधन करीत असलेल्या प्रा. मेरवाडे यांनी या संशोधनासाठी डिजिटल इलेव्हेशन मॉडेलद्वारे विकसित केलेल्या प्रणालीबाबत तांत्रिक माहिती देशाला देण्याची तयारी असल्याचे सांगितले. सहकाऱ्यांनी यासाठी तीन महिन्यांतील दुष्काळाची पूर्वकल्पना देणारी ‘ड्रॉट इंडेक्स’ प्रणाली विकसित केली आहे. तिचा वापर केल्यास देशात दुष्काळाची माहिती घेऊन नद्या तसेच जलस्रोतांच्या पाण्याचे व्यवस्थापन करता येऊ शकते. यासाठी पायाभूत सुविधा, सायबर तंत्रज्ञान, अद्ययावत डाटा सिम्युलेशन व ज्ञान, माहितीची देवाण-घेवाण महत्त्वपूर्ण ठरते. प्रणाली विकसित : माहिती देण्याची तयारीसध्या होआयो नदीच्या व्यवस्थापनावर संशोधन करीत असलेल्या प्रा. मेरवाडे यांनी या संशोधनासाठी डिजिटल इलेव्हेशन मॉडेलद्वारे विकसित केलेल्या प्रणालीबाबत तांत्रिक माहिती देशाला देण्याची तयारी असल्याचे सांगितले. सहकाऱ्यांनी यासाठी तीन महिन्यांतील दुष्काळाची पूर्वकल्पना देणारी ‘ड्रॉट इंडेक्स’ प्रणाली विकसित केली आहे. तिचा वापर केल्यास देशात दुष्काळाची माहिती घेऊन नद्या तसेच जलस्रोतांच्या पाण्याचे व्यवस्थापन करता येऊ शकते. यासाठी पायाभूत सुविधा, सायबर तंत्रज्ञान, अद्ययावत डाटा सिम्युलेशन व ज्ञान, माहितीची देवाण-घेवाण महत्त्वपूर्ण ठरते.