शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे: पाच पिढ्यांची साक्षीदार ‘विठाबाई’! महाराष्ट्रातील ज्येष्ठ आजीबाईचे ११४व्या वर्षी निधन
2
मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण...
3
धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...
4
Virat Kohli: ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कोहलीचा मोठा पराक्रम, इयान बॉथमचा महारेकॉर्ड मोडला!
5
Viral Video : आई रॉक्ड अन् लेकी शॉक्ड! सकाळी उशीरापर्यंत झोपून राहणाऱ्या मुलींना उठवण्यासाठी आईनं काय केलं बघाच!
6
पुढील वर्षी असं काही होईल, जे यापूर्वी कधीच झालं नाही, बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी
7
महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केलेला, त्याने...; बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट
8
Virat Kohli Celebration : चेहऱ्यावर हसू अन् खातं उघडल्याचा 'विराट' आनंद! व्हिडिओ बघाच
9
Crime: एकेकाळी 'राज्यस्तरीय पैलवान', लग्नानंतर ड्रग्जचं व्यसन जडलं, पैशांसाठी मुलाला विकले!
10
अफगाणिस्तानातून कोणकोणत्या नद्या पाकिस्तानच्या दिशेने वाहतात? तालिबानने प्रवाहच रोखला तर काय होईल?
11
भारतीय नर्सला सिंगापूरमध्ये १४ महिन्यांचा कारावास अन् २ चाबकाचे फटके; असं नेमकं काय घडलं?
12
IND vs AUS 3rd ODI : 'या' पठ्ठ्यानं कोच गंभीरचा विश्वास ठरवला सार्थ! ऑस्ट्रेलियनं संघ २३६ धावांवर ऑलआउट
13
जैन बोर्डिंगचा व्यवहार १ तारखेच्या अगोदर रद्द नाही झाला तर संपूर्ण देशभर मोठे आंदोलन; जैन मुनींचा इशारा
14
पाकिस्तान पुन्हा तोंडघशी पडला; UN मध्ये काश्मीरचा मुद्दा उपस्थित करताच भारतानं दाखवला आरसा
15
Shreyas Iyer Brilliant Catch : श्रेयसनं घेतला जबरदस्त कॅच! पण ऑस्ट्रेलियन बॅटरसह त्यानंही सोडलं मैदान; नेमकं काय घडलं?
16
ट्रम्प आता चीनशी पंगा घेणार...! जिनपिंग यांना थेट तैवानवरून जाब विचारणार, आशियाच्या दौऱ्यावर निघाले
17
Pandav Panchami 2025: आजच्या काळात काय आहे पांडव पंचमीचे महत्त्व? तिलाच 'लाभ पंचमी' का म्हणतात?
18
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर; मोदी सरकारनं 'या' प्रस्तावाला दिली मंजुरी, जाणून घ्या
19
VIRAL : एका आठवड्यात पैसे परत करेन म्हणणारी 'ऑनलाइन' मैत्रीण पालटली! १५ हजारांची मदत करणार्‍यालाच सुनावलं
20
पीएसआय गोपाल बदने परळीचा, शेवटचे लोकेशन पंढरपूर; प्रशांत बनकरचे आई-वडील म्हणतात...

इचलकरंजीत पाणी पातळीत वाढ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:21 IST

इचलकरंजी : मध्यरात्रीपासून शहर आणि परिसरात पावसाने उसंत घेतली असली तरी इचलकरंजीत पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ कायम आहे. ...

इचलकरंजी : मध्यरात्रीपासून शहर आणि परिसरात पावसाने उसंत घेतली असली तरी इचलकरंजीत पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ कायम आहे. २४ तासात ८ फूट पाणी वाढून धोका पातळी ओलांडून ७८ फुटावर पोहोचली आहे. पुराचे पाणी नागरी वस्तीत शिरल्याने शनिवारी सायंकाळपर्यंत २ हजार ६३८ कुटुंबातील १० हजार ६६९ नागरिकांचे विविध १५ निवारा छावण्यामध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. तर 291 पेक्षाही अधिक जनावरांनाही सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. नागरिकांत पुराची धास्तीही निर्माण झाली आहे.

अनपेक्षित पणे पाच दिवसांपासून शहर आणि परिसरात तसेच पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गतीने वाढ होत चालली आहे. काल शुक्रवारी रात्री पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे अनेक कुटुंबांची त्रेधातिरपिट उडाली. रात्रीपासूनच नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठीची धडपड सुरू केली. दुचाकी, चारचाकी, टेम्पो, बैलगाडीसह मिळेल त्या वाहनांतून साहित्य हलविण्याचे काम सुरू झाले. इचलकरंजी-टाकवडे, इचलकरंजी-हुपरी हे मार्ग बंद झाले आहेत.

रात्री अनेक सखल भागात तसेच ओढ्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. शांतीनगरकडून नारायण मळ्याकडे जाणाऱ्या आणि निरामय हॉस्पिटलजवळील ओढ्याचे कठडे वाहुन गेले. तसेच रात्रीतून पाणी पातळी ६ फुटाने वाढल्याने थेट नागरी वस्तीत पाणी शिरले. तर बोहरा मार्केट समेारील ओढ्यालगतचा रस्ता खचून कठडा फुटल्याने ओढ्यातील पाणी थेट मार्केटमध्ये शिरल्याने अनेक दुकानगाळे जलमय झाले. आतील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नगराध्यक्षा अलका स्वामी, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपअधीक्षक बाबुराव महामुनी यांच्यासह अधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाकडून पूरग्रस्तांच्या स्थलांतर सुरू केलं आहे. आवाडे सबस्टेशनमध्ये पाणी शिरल्याने तेथील मशिनरी हलवण्याचे काम सुरू असल्याने या सबस्टेशनवरून वीजपुरवठा होत असलेला भाग रात्रभर अंधारातच होता.

वेदभवन, घोरपडे नाट्यगृह, महासत्ता चौक आणि लिंबू चौक ठिकाणी जनावरांसाठी छावण्या उभारण्यात आल्या असून त्या ठिकाणी ५०० जनावरांची सोय करण्यात आली आहे.

महापुराचा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल-डिझेल देण्याचा निर्णय घेतला असला तरी शुक्रवारी रात्रीपासून शहरात पंपांवर वाहनधारकांच्या रांगा लागल्या होत्या. सन २०१९ मध्ये आलेल्या महापुराच्यावेळी पाणी पातळी ८१ फुटांपर्यंत पोहचली होती. पावसाने विश्रांती घेतली असली तरी पाणी पातळीत वाढच होत असल्याने त्या महापुराच्या आठवणींनी नागरिक धास्तावल्याचे दिसत आहे.