शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत पाणी पातळीत वाढ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:21 IST

इचलकरंजी : मध्यरात्रीपासून शहर आणि परिसरात पावसाने उसंत घेतली असली तरी इचलकरंजीत पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ कायम आहे. ...

इचलकरंजी : मध्यरात्रीपासून शहर आणि परिसरात पावसाने उसंत घेतली असली तरी इचलकरंजीत पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ कायम आहे. २४ तासात ८ फूट पाणी वाढून धोका पातळी ओलांडून ७८ फुटावर पोहोचली आहे. पुराचे पाणी नागरी वस्तीत शिरल्याने शनिवारी सायंकाळपर्यंत २ हजार ६३८ कुटुंबातील १० हजार ६६९ नागरिकांचे विविध १५ निवारा छावण्यामध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. तर 291 पेक्षाही अधिक जनावरांनाही सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. नागरिकांत पुराची धास्तीही निर्माण झाली आहे.

अनपेक्षित पणे पाच दिवसांपासून शहर आणि परिसरात तसेच पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गतीने वाढ होत चालली आहे. काल शुक्रवारी रात्री पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे अनेक कुटुंबांची त्रेधातिरपिट उडाली. रात्रीपासूनच नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठीची धडपड सुरू केली. दुचाकी, चारचाकी, टेम्पो, बैलगाडीसह मिळेल त्या वाहनांतून साहित्य हलविण्याचे काम सुरू झाले. इचलकरंजी-टाकवडे, इचलकरंजी-हुपरी हे मार्ग बंद झाले आहेत.

रात्री अनेक सखल भागात तसेच ओढ्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. शांतीनगरकडून नारायण मळ्याकडे जाणाऱ्या आणि निरामय हॉस्पिटलजवळील ओढ्याचे कठडे वाहुन गेले. तसेच रात्रीतून पाणी पातळी ६ फुटाने वाढल्याने थेट नागरी वस्तीत पाणी शिरले. तर बोहरा मार्केट समेारील ओढ्यालगतचा रस्ता खचून कठडा फुटल्याने ओढ्यातील पाणी थेट मार्केटमध्ये शिरल्याने अनेक दुकानगाळे जलमय झाले. आतील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नगराध्यक्षा अलका स्वामी, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपअधीक्षक बाबुराव महामुनी यांच्यासह अधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाकडून पूरग्रस्तांच्या स्थलांतर सुरू केलं आहे. आवाडे सबस्टेशनमध्ये पाणी शिरल्याने तेथील मशिनरी हलवण्याचे काम सुरू असल्याने या सबस्टेशनवरून वीजपुरवठा होत असलेला भाग रात्रभर अंधारातच होता.

वेदभवन, घोरपडे नाट्यगृह, महासत्ता चौक आणि लिंबू चौक ठिकाणी जनावरांसाठी छावण्या उभारण्यात आल्या असून त्या ठिकाणी ५०० जनावरांची सोय करण्यात आली आहे.

महापुराचा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल-डिझेल देण्याचा निर्णय घेतला असला तरी शुक्रवारी रात्रीपासून शहरात पंपांवर वाहनधारकांच्या रांगा लागल्या होत्या. सन २०१९ मध्ये आलेल्या महापुराच्यावेळी पाणी पातळी ८१ फुटांपर्यंत पोहचली होती. पावसाने विश्रांती घेतली असली तरी पाणी पातळीत वाढच होत असल्याने त्या महापुराच्या आठवणींनी नागरिक धास्तावल्याचे दिसत आहे.