शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत पाणी पातळीत वाढ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:21 IST

इचलकरंजी : मध्यरात्रीपासून शहर आणि परिसरात पावसाने उसंत घेतली असली तरी इचलकरंजीत पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ कायम आहे. ...

इचलकरंजी : मध्यरात्रीपासून शहर आणि परिसरात पावसाने उसंत घेतली असली तरी इचलकरंजीत पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ कायम आहे. २४ तासात ८ फूट पाणी वाढून धोका पातळी ओलांडून ७८ फुटावर पोहोचली आहे. पुराचे पाणी नागरी वस्तीत शिरल्याने शनिवारी सायंकाळपर्यंत २ हजार ६३८ कुटुंबातील १० हजार ६६९ नागरिकांचे विविध १५ निवारा छावण्यामध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. तर 291 पेक्षाही अधिक जनावरांनाही सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. नागरिकांत पुराची धास्तीही निर्माण झाली आहे.

अनपेक्षित पणे पाच दिवसांपासून शहर आणि परिसरात तसेच पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गतीने वाढ होत चालली आहे. काल शुक्रवारी रात्री पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे अनेक कुटुंबांची त्रेधातिरपिट उडाली. रात्रीपासूनच नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठीची धडपड सुरू केली. दुचाकी, चारचाकी, टेम्पो, बैलगाडीसह मिळेल त्या वाहनांतून साहित्य हलविण्याचे काम सुरू झाले. इचलकरंजी-टाकवडे, इचलकरंजी-हुपरी हे मार्ग बंद झाले आहेत.

रात्री अनेक सखल भागात तसेच ओढ्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. शांतीनगरकडून नारायण मळ्याकडे जाणाऱ्या आणि निरामय हॉस्पिटलजवळील ओढ्याचे कठडे वाहुन गेले. तसेच रात्रीतून पाणी पातळी ६ फुटाने वाढल्याने थेट नागरी वस्तीत पाणी शिरले. तर बोहरा मार्केट समेारील ओढ्यालगतचा रस्ता खचून कठडा फुटल्याने ओढ्यातील पाणी थेट मार्केटमध्ये शिरल्याने अनेक दुकानगाळे जलमय झाले. आतील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नगराध्यक्षा अलका स्वामी, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपअधीक्षक बाबुराव महामुनी यांच्यासह अधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाकडून पूरग्रस्तांच्या स्थलांतर सुरू केलं आहे. आवाडे सबस्टेशनमध्ये पाणी शिरल्याने तेथील मशिनरी हलवण्याचे काम सुरू असल्याने या सबस्टेशनवरून वीजपुरवठा होत असलेला भाग रात्रभर अंधारातच होता.

वेदभवन, घोरपडे नाट्यगृह, महासत्ता चौक आणि लिंबू चौक ठिकाणी जनावरांसाठी छावण्या उभारण्यात आल्या असून त्या ठिकाणी ५०० जनावरांची सोय करण्यात आली आहे.

महापुराचा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल-डिझेल देण्याचा निर्णय घेतला असला तरी शुक्रवारी रात्रीपासून शहरात पंपांवर वाहनधारकांच्या रांगा लागल्या होत्या. सन २०१९ मध्ये आलेल्या महापुराच्यावेळी पाणी पातळी ८१ फुटांपर्यंत पोहचली होती. पावसाने विश्रांती घेतली असली तरी पाणी पातळीत वाढच होत असल्याने त्या महापुराच्या आठवणींनी नागरिक धास्तावल्याचे दिसत आहे.