शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

इचलकरंजीत पाणी पातळीत वाढ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:21 IST

इचलकरंजी : मध्यरात्रीपासून शहर आणि परिसरात पावसाने उसंत घेतली असली तरी इचलकरंजीत पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ कायम आहे. ...

इचलकरंजी : मध्यरात्रीपासून शहर आणि परिसरात पावसाने उसंत घेतली असली तरी इचलकरंजीत पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ कायम आहे. २४ तासात ८ फूट पाणी वाढून धोका पातळी ओलांडून ७८ फुटावर पोहोचली आहे. पुराचे पाणी नागरी वस्तीत शिरल्याने शनिवारी सायंकाळपर्यंत २ हजार ६३८ कुटुंबातील १० हजार ६६९ नागरिकांचे विविध १५ निवारा छावण्यामध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. तर 291 पेक्षाही अधिक जनावरांनाही सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. नागरिकांत पुराची धास्तीही निर्माण झाली आहे.

अनपेक्षित पणे पाच दिवसांपासून शहर आणि परिसरात तसेच पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गतीने वाढ होत चालली आहे. काल शुक्रवारी रात्री पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे अनेक कुटुंबांची त्रेधातिरपिट उडाली. रात्रीपासूनच नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठीची धडपड सुरू केली. दुचाकी, चारचाकी, टेम्पो, बैलगाडीसह मिळेल त्या वाहनांतून साहित्य हलविण्याचे काम सुरू झाले. इचलकरंजी-टाकवडे, इचलकरंजी-हुपरी हे मार्ग बंद झाले आहेत.

रात्री अनेक सखल भागात तसेच ओढ्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. शांतीनगरकडून नारायण मळ्याकडे जाणाऱ्या आणि निरामय हॉस्पिटलजवळील ओढ्याचे कठडे वाहुन गेले. तसेच रात्रीतून पाणी पातळी ६ फुटाने वाढल्याने थेट नागरी वस्तीत पाणी शिरले. तर बोहरा मार्केट समेारील ओढ्यालगतचा रस्ता खचून कठडा फुटल्याने ओढ्यातील पाणी थेट मार्केटमध्ये शिरल्याने अनेक दुकानगाळे जलमय झाले. आतील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नगराध्यक्षा अलका स्वामी, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपअधीक्षक बाबुराव महामुनी यांच्यासह अधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाकडून पूरग्रस्तांच्या स्थलांतर सुरू केलं आहे. आवाडे सबस्टेशनमध्ये पाणी शिरल्याने तेथील मशिनरी हलवण्याचे काम सुरू असल्याने या सबस्टेशनवरून वीजपुरवठा होत असलेला भाग रात्रभर अंधारातच होता.

वेदभवन, घोरपडे नाट्यगृह, महासत्ता चौक आणि लिंबू चौक ठिकाणी जनावरांसाठी छावण्या उभारण्यात आल्या असून त्या ठिकाणी ५०० जनावरांची सोय करण्यात आली आहे.

महापुराचा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल-डिझेल देण्याचा निर्णय घेतला असला तरी शुक्रवारी रात्रीपासून शहरात पंपांवर वाहनधारकांच्या रांगा लागल्या होत्या. सन २०१९ मध्ये आलेल्या महापुराच्यावेळी पाणी पातळी ८१ फुटांपर्यंत पोहचली होती. पावसाने विश्रांती घेतली असली तरी पाणी पातळीत वाढच होत असल्याने त्या महापुराच्या आठवणींनी नागरिक धास्तावल्याचे दिसत आहे.