शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १३० तलावांत सिंचन योजनांचे पाणी --: जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:59 IST

जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मात करून जनतेला दिलासा देण्यासाठी प्रशासनाचे नियोजन होत आहे. पाणी योजनांसाठी पाणी पुरवठा होत असलेले तलावही भरून घेण्याबाबत कार्यवाही होणार आहे. दुष्काळी परिस्थितीत दिलासा देण्यासाठी १५९ तलावांपैकी

ठळक मुद्देउर्वरित लवकरच भरणार

सांगली : जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मात करून जनतेला दिलासा देण्यासाठी प्रशासनाचे नियोजन होत आहे. पाणी योजनांसाठी पाणी पुरवठा होत असलेले तलावही भरून घेण्याबाबत कार्यवाही होणार आहे. दुष्काळी परिस्थितीत दिलासा देण्यासाठी १५९ तलावांपैकी १३० तलाव उपसा सिंचन योजनेच्या पाण्यातून भरून घेतले आहेत. उर्वरित तलाव तातडीने भरून घ्यावेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी बुधवारी सांगलीत दिले.जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरआयोजित पाणी टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, जिल्ह्यात कुठेही पाणी टंचाई जाणवणार नाही, यासाठी प्रशासनाने नियोजन केले असून, इतरही विभागांनी आपले नियोजन करून टंचाई निवारणास प्राधान्य द्यावे. सध्या जिल्ह्यातील पाणी योजनांचे आवर्तन सुरू असून त्या माध्यमातून जलस्रोत भरून घेण्यात यावेत. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून १५९ तलाव भरून घेण्याची मागणी करण्यात आली होती. यापैकी १३० तलाव भरून घेण्यात आले आहेत. उर्वरित तलावही तातडीने भरून घ्यावेत.

यावेळी उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी, अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले, कार्यकारी अभियंता एन. एस. करे, सूर्यकांत नलवडे, प्रशांत कडुसकर, व्ही. पी. पाटील, एस. के. पवार, डी. जे. सोनावणे उपस्थित होते.पाणीसाठ्याचे नियोजन आवश्यकजिल्हाधिकारी म्हणाले, कमी पाऊसमानामुळे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाणीसाठ्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. जत तालुक्यातील १४, मिरज, कवठेमहांकाळ, खानापूर, कडेगाव, तासगाव तालुक्यातील ६१, तर आटपाडीतील ११ जलसाठ्यांतील पाणीसाठा आरक्षित ठेवण्यात आला आहे. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगली