शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

अवचितवाडी तलावातील पाणी संस्थेचे बांधकाम रोखले

By admin | Updated: November 20, 2015 00:06 IST

वाद चिघळण्याची शक्यता : प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ - कामगारांत हमरीतुमरी

मुरगूड : अवचितवाडी (ता. कागल) येथील उपराळा तलावामध्ये शेती गेलेल्या जमिनीमालकांच्या तोंडाला शासनाने पाने पुसली आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांची फसवणूक करून पाटबंधारे खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने गावाबाहेरील लोकांना घेऊन स्थापन केलेली पाणी संस्थाच बोगस असल्याचा आरोप करून तलावाच्या शेजारी सुरू असलेल्या पाणी संस्थेचे बांधकाम बंद पाडले. यावेळी प्रकल्पग्रस्त व बांधकाम कागमारांत हमरीतुमरीही झाली. मुरगूड शहरापासून तीन किलोमीटरवर अवचितवाडी येथे दोन वर्षांपूर्वी आठ ते दहा कोटी रुपये खर्च करून शासनाने तलाव पूर्ण केला आहे. तलावामध्ये अवचितवाडीतील चाळीस शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. यापैकी बारा शेतकरी भूमिहीन झाले आहेत. तसेच नुकसान भरपाईपासून वंचित आहेत.खोटी कागदपत्रे शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय सादर करून चिमकाई पाणी वापर संस्थेची स्थापना केल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला आहे. प्रकल्पग्रस्तांना विश्वासात न घेता तलावाच्या पूर्वेला व पश्चिमेला दोन मोटार पंप हाऊसचे बांधकाम सुरू होते. ज्या जागेत बांधकाम केले जात आहे, त्या जागेच्या मालकांची परवानगीही घेतली नाही. याप्रकरणी गुरुवारी घटनास्थळी प्रकल्पग्रस्त व बांधकाम कागमारांत हमरीतुमरीही झाली. पोलीस आल्यानंतर बांधकाम बंद केले. महादेव वगदे, दत्तात्रय कारंडे, संजय आंगज, बाबूराव भारंडे, पांडुरंग भाईगडे, विमल मोरबाळे, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)संस्थेची चौकशी कराचिमकाई पाणी वापर संस्थेच्या स्थापनेसाठी खोटी कागदपत्रे सादर केली असून, शेतकऱ्यांच्या मान्यतासुद्धा खोट्या आहेत. या संस्थेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी तानाजी मोरबाळे यांनी केली.संस्था खासगी आहे. शासनाने मान्यता दिली आहे, पण या सस्थेच्या पंप हाऊससाठी शासकीय हद्दीमध्ये बांधकाम करण्यास आपण परवानगी नाकारली आहे. पण संस्था बांधकाम नेमके कोठे करीत आहे हे आपण पाहू. प्रकल्पग्रस्त व संस्था शासकीय अधिकारी लवकरच चर्चा करू. - आर. पी. डवरी, सहायक अभियंता, पाटबंधारे विभाग, कोल्हापूर