शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

कचऱ्याचा डोंगर वाढता वाढे...

By admin | Updated: January 7, 2015 00:04 IST

शहराचा प्रश्न गंभीर : कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प कागदावरच

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील दररोजच्या दोनशे टन कचरा निराकरणाचा प्रश्न गंभीर बनला असून कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रस्तावीत असलेला ‘रोकेम’ कंपनीचा प्रकल्प अद्यापही कागदावरच आहे. प्रकल्पासाठी जागेचा तिढा सुटत नसल्याने कचराप्रश्नी कोल्हापूरचीही कचरापूर म्हणून ओळख असलेल्या पुण्यासारखीच अवस्था झाली आहे. पुणे शहरातील कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणाऱ्या ‘रोकेम’ कंपनीचा ठेका रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे पुण्यात दररोज दोन हजार टन कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे येथील कचरा प्रश्न गंभीर वळणार पोहोचला आहे. पुण्यानंतर ‘रोकेम’ने कोल्हापुरातील कचऱ्यापासून वीज निर्मितीचा ठेका मिळविला. निविदा मंजूर होऊन वर्ष उलटले. कंपनीने दीड कोटी बँक गॅरंटीसह ४० लाख रुपयांची अनामत रक्कमही महापालिकेकडे जमा केली आहे. मात्र, कंपनीला आवश्यक असणारी चार एकरांपैकी एक एकर जागाही झूम प्रकल्पावर उपलब्ध होऊ न शकल्याने प्रकल्प कागदावरच राहिला आहे तसेच ‘रोकेम’ला जागेअभावी पुण्यातील सुरू असलेला प्रकल्प गुंडाळण्याची वेळ आली आहे. शहरात दररोज निर्माण होणारा २००टन कचरा टाकायचा कुठे, हा प्रश्न कोल्हापूर महापालिकेला सतावत आहे. कोंडाळ्यातच कचरा जाळणे, तीन-चार दिवसांनंतर उठाव करणे, झूम प्रकल्पातील वाळलेला कचरा जाळून जागा निर्माण करणे, आदी जुजबी उपाय मनपा प्रशासन करत आहे. शहरात झूम प्रकल्पावर साचलेला तब्बल तीन लाख टन कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न प्रशासनासमोर आहे. त्यामुळष पुणे-नाशिकनंतर ‘सर्वांत वेगाने विस्तारणारे शहर’ असे बिरुद घेऊन वाटचाल करणाऱ्या कोल्हापूरची नवी ओळख ‘कचरापूर’ अशीच होत आहे. कचऱ्यापासून वीज निर्मितीचा ठेकामहापालिकेने रोकेम ग्रीन एनर्जी प्रा. लि. या कंपनीला कचऱ्यापासून वीज निर्मितीचा ठेका दिला आहे. महापालिका प्रतिटन ३०८ रुपये दराने पैसे देऊन प्रकल्पापर्यंत कचरा पोहोच करणार आहे. हा दर तीस वर्षांपर्यंत स्थिर राहील यामध्ये बदल होणार नाही. प्रकल्पासाठी १ रुपया प्रति चौ. फू ट दराने महापालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी लागेल. प्रकल्पसाठीचा किमान ३० कोटी रुपयांचा खर्च कंपनी करणार आहे.पावसाळ्यानंतर राजारामपुरी परिसरातील टाकाळा खणीत ‘लँडफिल्ड साईट डेव्हलपिंग’(कचरा टाकण्याची शास्त्रीय जागा) तयार करण्याचे थांबलेले काम आता पुन्हा वेगाने सुरू झाले आहे. झूम प्रकल्पातील कचऱ्याची चाळण करून राहिलेल्या कचऱ्याचे घटक (इनर्ट मटेरिअल) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या निकषांनुसारच या खणीत टाकले जाणार आहेत. खणीचे काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. ही जागा उपलब्ध झाल्यानंतरच कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प दृष्टिक्षेपात येईल.- डॉ. विजय पाटील (मुख्य आरोग्य निरीक्षक)पाच हजार टन ई-कचऱ्याचे आव्हानवर्षाला पाच हजार टनांहून अधिक ई-कचऱ्याच्या विल्हेवाटीचा यक्षप्र्रश्न महापालिकेसमोर आहे. जागोजागी भंगार जमा करणाऱ्यांकडून सोने, चांदी, तांबे, लोखंड, अ‍ॅल्युमिनिअम, आदी धातंूच्या आमिषापोटी खराब झालेले टी.व्ही., कॉम्प्युटर, वायर्स व सीडी, आदीं ई-कचऱ्याची अशास्त्रीय विल्हेवाट लावली जात असल्याचे सहज दृष्टीस पडते. त्यामुळे क्लोरिन, सल्फर डायॉक्साईड, डायोक्सिन, क्लोरिनेटेड डायोक्सिन, पॉलिक्लिनिक एरोमॅटिक हायड्रोकार्बन्स, बेरिलियम कॅडमियम, आदी विषारी वायू व घटकांचा पर्यावरणात भडिमार केला जातो.