शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

जत तालुक्यातील खरीप हंगाम वाया

By admin | Updated: July 19, 2015 23:35 IST

शेतकरी हवालदिल : पावसाअभावी दुष्काळाची छाया गडद

भागवत काटकर-शेगाव -जत तालुक्यात पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप हंगाम पूर्णत: वाया जाण्याच्या मार्गावर आहे. आता दुबार पेरण्याही होणे शक्य होणार नाही. पिण्याच्या पाण्याची टंचाई, चाराटंचाई व पिकांचे नुकसान अशा तिहेरी संकटात जत तालुक्यातील शेतकरी सापडला आहे. पावसाने आणखी ओढ दिल्यास दुष्काळाची छाया गडद होणार आहे. जत तालुक्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांनी बाजरी, मका, मूग, भुईमूग, उडीद, तूर, सूर्यफुल आदी पिकांची लागवड केली आहे. एकूण तालुक्यात ६४ हजार हेक्टर क्षेत्र खरिपाचे असून, पैकी २४ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. या खरीप हंगामातील कडधान्यांच्या उत्पन्नातून शेतकऱ्यांना थोडेफार आर्थिक सहाय्य मिळते. मात्र पावसाच्या ओढीने व वाढते तापमान यामुळे पिकांची हानी होत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी तालुक्यात टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दिवसभर ढगाळ वातावरण व रात्री थंड हवा, अशा विचित्र हवामानामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने पशुधन कसे वाचवायचे, या चिंतेत पशुपालक शेतकरी आहेत. पावसाने ओढ दिल्याने ज्वारीचा कडबा शेकडा ८०० रूपयांवरून १८०० ते २००० रूपये झाला आहे. ज्वारीच्या एका पेंडीचा दर १८ ते २० रूपयांपर्यंत झाला आहे. जनावरे जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड चालू आहे. शिवाय ऊस दर २५०० ते २८०० रुपये टनापर्यंत पोहोचला आहे. शेतीपूरक व्यवसायाला जोड म्हणून शेतकऱ्यांनी जनावरांची जोपासना मोठ्या प्रमाणात केली आहे. तालुक्यात एकूण जनावरांची संख्या ६ लाख १० हजार ६०५ इतकी आहे. जनावरे शेळ्या, मेंढ्या जगविण्यासाठी पाणी व चाराटंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात हवामान विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत केंद्रीय कृ षिमंत्री राधामोहन सिंह यांनी कमी पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना डिझेल, बियाणे व विजेसाठी अनुदान देऊ, असे जाहीर केले होते. बियाणांवर ५० टक्के अनुुदान व शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज दिली जाईल, असेही जाहीर केले होते. त्याचा पाठपुरावा खा. संजय पाटील यांनी करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.