शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

जत तालुक्यातील खरीप हंगाम वाया

By admin | Updated: July 19, 2015 23:35 IST

शेतकरी हवालदिल : पावसाअभावी दुष्काळाची छाया गडद

भागवत काटकर-शेगाव -जत तालुक्यात पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप हंगाम पूर्णत: वाया जाण्याच्या मार्गावर आहे. आता दुबार पेरण्याही होणे शक्य होणार नाही. पिण्याच्या पाण्याची टंचाई, चाराटंचाई व पिकांचे नुकसान अशा तिहेरी संकटात जत तालुक्यातील शेतकरी सापडला आहे. पावसाने आणखी ओढ दिल्यास दुष्काळाची छाया गडद होणार आहे. जत तालुक्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांनी बाजरी, मका, मूग, भुईमूग, उडीद, तूर, सूर्यफुल आदी पिकांची लागवड केली आहे. एकूण तालुक्यात ६४ हजार हेक्टर क्षेत्र खरिपाचे असून, पैकी २४ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. या खरीप हंगामातील कडधान्यांच्या उत्पन्नातून शेतकऱ्यांना थोडेफार आर्थिक सहाय्य मिळते. मात्र पावसाच्या ओढीने व वाढते तापमान यामुळे पिकांची हानी होत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी तालुक्यात टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दिवसभर ढगाळ वातावरण व रात्री थंड हवा, अशा विचित्र हवामानामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने पशुधन कसे वाचवायचे, या चिंतेत पशुपालक शेतकरी आहेत. पावसाने ओढ दिल्याने ज्वारीचा कडबा शेकडा ८०० रूपयांवरून १८०० ते २००० रूपये झाला आहे. ज्वारीच्या एका पेंडीचा दर १८ ते २० रूपयांपर्यंत झाला आहे. जनावरे जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड चालू आहे. शिवाय ऊस दर २५०० ते २८०० रुपये टनापर्यंत पोहोचला आहे. शेतीपूरक व्यवसायाला जोड म्हणून शेतकऱ्यांनी जनावरांची जोपासना मोठ्या प्रमाणात केली आहे. तालुक्यात एकूण जनावरांची संख्या ६ लाख १० हजार ६०५ इतकी आहे. जनावरे शेळ्या, मेंढ्या जगविण्यासाठी पाणी व चाराटंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात हवामान विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत केंद्रीय कृ षिमंत्री राधामोहन सिंह यांनी कमी पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना डिझेल, बियाणे व विजेसाठी अनुदान देऊ, असे जाहीर केले होते. बियाणांवर ५० टक्के अनुुदान व शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज दिली जाईल, असेही जाहीर केले होते. त्याचा पाठपुरावा खा. संजय पाटील यांनी करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.