शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
4
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
5
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
6
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
7
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
8
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
9
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
10
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
11
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
12
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
13
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
14
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
15
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
16
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
17
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
18
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
19
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
20
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला

वारकऱ्यांना चंद्रभागेचे वाळवंटच हवे

By admin | Updated: July 18, 2015 00:17 IST

आंदोलनाचा इशारा : सोलापूर जिल्हा प्रवेशापर्यंत सरकारला ‘डेडलाईन’

खंडाळा/ लोणंद : पंढरपूर येथे चंद्रभागेच्या वाळवंटात वारकऱ्यांची व्यवस्था होण्यासाठी सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे. पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी शासनाने निर्णय न घेतल्यास वारकरी तीव्र आंदोलन करतील, असा इशारा दिंडीप्रमुखांच्या बैठकीत देण्यात आला.न्यायालयाच्या आदेशानुसार चंद्रभागा नदीच्या वाळवंटात वारकऱ्यांच्या व्यवस्थेला बंदी घालण्यात आली आहे. याबाबत सरकारने वारकऱ्यांच्या बाजूने भूमिका मांडावी. पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या आळंदी ते पंढरपूर वारीच्या परंपरागत प्रथा कायम ठेवण्यात येतील. ज्या गावांना ग्रामप्रदक्षिणांचे मान देण्यात आले आहेत, ते अबाधित राहतील, असे या बैठकीत सांगण्यात आले. माउलींच्या लोणंद मुक्कामी पालखी तळावर श्रीमंत शितोळे सरकार यांच्या पालासमोर पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्यासमवेत सर्व दिंडीप्रमुखांची बैठक झाली. यावेळी पालखी सोहळ्याचे प्रमुख शामसुंदर मुळे, विश्वस्त प्रशांत सुरू, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार, दिंडी समाजाचे अध्यक्ष भानुदास ढवळीकर, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष मारुती कोकाटे, माउली जळगावकर, राणूमहाराज वास्कर, नामदेवमहाराज वास्कर यांच्यासह दिंडीप्रमुख उपस्थित होते. माउलींच्या वारीमध्ये वाल्हे, माळशिरस यांसारख्या गावांना ग्रामप्रदक्षिणेचे मान दिलेले आहेत. यावर्षी वाल्ह्यातून प्रदक्षिणा घेण्याबाबत मतभेद निर्माण झाले होते. मात्र, श्रीमंत शितोळे सरकारच्या मध्यस्थीने पूर्वीची प्रथा कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे माळशिरस येथील प्रदक्षिणेचा मार्ग मोकळा झाला आहे. (प्रतिनिधी/ वार्ताहर)