शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

वारणाकाठचा लढा हक्कासाठीच ! इचलकरंजीकर, कृती समिती भूमिकेवर ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 00:21 IST

जयसिंगपूर : वारणेच्या पाण्याचा एक थेंबही देणार नाही, अशी आक्रमक भूमिका दानोळीसह वारणा नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी घेतली आहे.

संदीप बावचे ।जयसिंगपूर : वारणेच्या पाण्याचा एक थेंबही देणार नाही, अशी आक्रमक भूमिका दानोळीसह वारणा नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी घेतली आहे. इचलकरंजी नगरपालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात दानोळी येथे योजनेचे काम सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दानोळीकरांनी तो हाणून पाडला. साडेतीन लाख लोकसंख्येच्या शहरासाठी वारणा योजना सुरू व्हावी, यासाठी आंदोलन करण्याची भूमिका इचलकरंजी पालिकेने घेतली आहे. इचलकरंजीला एक टीएमसी पाणी राखून ठेवल्यास याचा फटका शेतीला बसेल व गंभीर स्थिती निर्माण होईल, अशीच भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. एकूणच वारणाकाठचा लढा हा हक्कासाठीच असेच चित्र सध्या आहे.वारणा नदीचे उजवा कालवा आणि डावा कालवा असे दोन विभागात नियोजन आहे. नियोजनात उजवा कालवा ११७ कि. मी.चा असून त्याचे काम ३० कि.मी. झाले आहे. आणि डावा कालवा ७० कि.मी.चा आहे, पण त्याचे काम कमी झाले आहे. अमृत योजनेस आजपर्यंत वारणा काठावरील पस्तीस गावांनी, निषेध, गावबंद, उपोषणे करून विरोध दर्शविला आहे. तसेच गावसभेचे विरोधाचे ठराव दिलेले आहेत.चांदोली धरण बांधताना धरणातील पाणी साठा हा सिंचनासाठी १८.०५ टीएमसी, पिण्यासाठी ९.५५ टीएमसी उद्योगासाठी १.२७ टीएमसी, तसेच वापरात न येणारे पाणी यामध्ये बाष्पीभवन १.२८ टीएमसी आणि मृत साठा ६.८८ असा एकूण साठा ३७.४८ इतका अपेक्षित होता. मात्र, धरण ३४.३९ टीएमसीचे बांधले गेले. एकूणच धरणाची क्षमता ही गरजेपेक्षा ३.०९ टीएमसीने कमी आहे. त्यामुळे ठरल्याप्रमाणे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. सध्या वारणा धरण लाभक्षेत्रात २८३ गावे आहेत. पैकी फक्त ८२ गावांना पाणी मिळाले आहे. तर बाकी २०१ गावांना अद्याप वारणेचे पाणी मिळालेले नाही, तर शेतीला पाणीपुरवठा करणाºया सुमारे २०० संस्थांचे काम पूर्ण होणार आहे. यामुळे सध्या असणारा पाणी साठा कमी पडणार असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. तसेच पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली इचलकरंजीकरांचा प्रोसेस व कापड उद्योगासाठी पाणी नेण्याचा प्रयत्न आहे व ( पान ४ वर)शेतकऱ्यांमध्ये भीतीकागदोपत्री जेवढे पाणी उपसणार त्यापेक्षा तिप्पट पाण्याचा उपसा सुमारे चार हजार हॉर्स पॉवरच्या पंपाद्वारे २४ तास या योजनेतून होणार असल्याने शेतीसाठी पाणीच उरणार नाही. त्यामुळे वारणाकाठाला पुन्हा १९७२ प्रमाणे दुष्काळाच्या झळा बसतील, अशी भीती शेतकºयांमध्ये आहे. शासनाने केवळ इचलकरंजी शहराचा विचार करून ही योजना मंजूर केली. पंचगंगा नदीच्या पाण्यावर शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील अनेक गावे अवलंबून आहेत. नदीतील शुद्धीकरणाकडे शासनाचे दुर्लक्ष आहे, असे शेतकºयांचे म्हणणे आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरwater transportजलवाहतूक