शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
3
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
4
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
5
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
6
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
7
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
8
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
9
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
10
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
11
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

वारणाकाठचा लढा हक्कासाठीच ! इचलकरंजीकर, कृती समिती भूमिकेवर ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 00:21 IST

जयसिंगपूर : वारणेच्या पाण्याचा एक थेंबही देणार नाही, अशी आक्रमक भूमिका दानोळीसह वारणा नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी घेतली आहे.

संदीप बावचे ।जयसिंगपूर : वारणेच्या पाण्याचा एक थेंबही देणार नाही, अशी आक्रमक भूमिका दानोळीसह वारणा नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी घेतली आहे. इचलकरंजी नगरपालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात दानोळी येथे योजनेचे काम सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दानोळीकरांनी तो हाणून पाडला. साडेतीन लाख लोकसंख्येच्या शहरासाठी वारणा योजना सुरू व्हावी, यासाठी आंदोलन करण्याची भूमिका इचलकरंजी पालिकेने घेतली आहे. इचलकरंजीला एक टीएमसी पाणी राखून ठेवल्यास याचा फटका शेतीला बसेल व गंभीर स्थिती निर्माण होईल, अशीच भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. एकूणच वारणाकाठचा लढा हा हक्कासाठीच असेच चित्र सध्या आहे.वारणा नदीचे उजवा कालवा आणि डावा कालवा असे दोन विभागात नियोजन आहे. नियोजनात उजवा कालवा ११७ कि. मी.चा असून त्याचे काम ३० कि.मी. झाले आहे. आणि डावा कालवा ७० कि.मी.चा आहे, पण त्याचे काम कमी झाले आहे. अमृत योजनेस आजपर्यंत वारणा काठावरील पस्तीस गावांनी, निषेध, गावबंद, उपोषणे करून विरोध दर्शविला आहे. तसेच गावसभेचे विरोधाचे ठराव दिलेले आहेत.चांदोली धरण बांधताना धरणातील पाणी साठा हा सिंचनासाठी १८.०५ टीएमसी, पिण्यासाठी ९.५५ टीएमसी उद्योगासाठी १.२७ टीएमसी, तसेच वापरात न येणारे पाणी यामध्ये बाष्पीभवन १.२८ टीएमसी आणि मृत साठा ६.८८ असा एकूण साठा ३७.४८ इतका अपेक्षित होता. मात्र, धरण ३४.३९ टीएमसीचे बांधले गेले. एकूणच धरणाची क्षमता ही गरजेपेक्षा ३.०९ टीएमसीने कमी आहे. त्यामुळे ठरल्याप्रमाणे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. सध्या वारणा धरण लाभक्षेत्रात २८३ गावे आहेत. पैकी फक्त ८२ गावांना पाणी मिळाले आहे. तर बाकी २०१ गावांना अद्याप वारणेचे पाणी मिळालेले नाही, तर शेतीला पाणीपुरवठा करणाºया सुमारे २०० संस्थांचे काम पूर्ण होणार आहे. यामुळे सध्या असणारा पाणी साठा कमी पडणार असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. तसेच पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली इचलकरंजीकरांचा प्रोसेस व कापड उद्योगासाठी पाणी नेण्याचा प्रयत्न आहे व ( पान ४ वर)शेतकऱ्यांमध्ये भीतीकागदोपत्री जेवढे पाणी उपसणार त्यापेक्षा तिप्पट पाण्याचा उपसा सुमारे चार हजार हॉर्स पॉवरच्या पंपाद्वारे २४ तास या योजनेतून होणार असल्याने शेतीसाठी पाणीच उरणार नाही. त्यामुळे वारणाकाठाला पुन्हा १९७२ प्रमाणे दुष्काळाच्या झळा बसतील, अशी भीती शेतकºयांमध्ये आहे. शासनाने केवळ इचलकरंजी शहराचा विचार करून ही योजना मंजूर केली. पंचगंगा नदीच्या पाण्यावर शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील अनेक गावे अवलंबून आहेत. नदीतील शुद्धीकरणाकडे शासनाचे दुर्लक्ष आहे, असे शेतकºयांचे म्हणणे आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरwater transportजलवाहतूक