शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

पश्चिमेकडील कारखान्यांच्या ऊसतोडण्या सुरू; ‘स्वाभिमानी’च्या प्रभावक्षेत्रातील कारखान्यांची धुराडी थंडच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 13:03 IST

‘स्वाभिमानी’चे प्रभावक्षेत्र असलेल्या हातकणंगले व शिरोळ तालुक्यांतील साखर कारखाने अद्याप बंदच आहेत. ‘दत्त-शिरोळ’, ‘गुरुदत्त-टाकळीवाडी’, ‘शरद-नरंदे’, ‘पंचगंगा-इचलकरंजी’, ‘जवाहर-हुपरी’ या कारखान्यांनी अद्याप ऊसतोड दिलेली नाही. ‘वारणा’ कारखान्याने बॉयलर अग्निप्रदीपन केले आहे; पण मागील थकीत एफआरपीमुळे गाळप परवाना अडकला आहे.

ठळक मुद्देयामध्ये ‘एफआरपी अधिक दोनशे’ रुपये दराची मागणी झाली. साधारणत: एकरकमी एफआरपी आणि पैशांची उपलब्धता होईल, तसे त्यानंतरचे पैसे देण्याबाबत चर्चेतून तोडगा पुढे येऊ शकतो.

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रभावक्षेत्र असलेल्या हातकणंगले व शिरोळ तालुक्यांतील साखर कारखान्यांची धुराडी अद्याप थंडच आहेत. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील बहुतांश कारखान्यांच्या ऊसतोडण्या सुरू झाल्या आहेत.

परतीच्या पावसामुळे मुळातच उशीर झालेल्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम यंदा दबकतच सुरू झाला. संताजी घोरपडे व डी. वाय. पाटील साखर कारखाने यंदा अगोदर सुरू झाले. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अडवाअडवी सुरू केल्यानंतर एक-दोन दिवस गाळप अडखळले. त्यात ‘स्वाभिमानी’ची जयसिंगपूरची ऊस परिषद झाली. यामध्ये ‘एफआरपी अधिक दोनशे’ रुपये दराची मागणी झाली. साधारणत: एकरकमी एफआरपी आणि पैशांची उपलब्धता होईल, तसे त्यानंतरचे पैसे देण्याबाबत चर्चेतून तोडगा पुढे येऊ शकतो.

‘स्वाभिमानी’चे प्रभावक्षेत्र असलेल्या हातकणंगले व शिरोळ तालुक्यांतील साखर कारखाने अद्याप बंदच आहेत. ‘दत्त-शिरोळ’, ‘गुरुदत्त-टाकळीवाडी’, ‘शरद-नरंदे’, ‘पंचगंगा-इचलकरंजी’, ‘जवाहर-हुपरी’ या कारखान्यांनी अद्याप ऊसतोड दिलेली नाही. ‘वारणा’ कारखान्याने बॉयलर अग्निप्रदीपन केले आहे; पण मागील थकीत एफआरपीमुळे गाळप परवाना अडकला आहे.‘हमीदवाडा’, ‘संताजी घोरपडे’, ‘शाहू’, ‘बिद्री’, ‘कुंभी’, ‘डी. वाय. पाटील’, ‘दालमिया’ यांसह इतर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. हंगामाला अद्याप गती नसली तरी येत्या चार-पाच दिवसांत त्याला गती येईल. 

  • राजकीय घडामोडींमुळे बैठक स्थगित

‘स्वाभिमानी’च्या ऊस परिषदेनंतर साखर कारखाने व संघटनेचे पदाधिकाऱ्यांची आज, सोमवारी बैठक होणार होती; पण राज्यात उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीमुळे प्रमुख नेते मुंबईत अडकून पडले आहेत. त्यामुळे ही बैठक स्थगित झाली आहे. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने