शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

चालता बोलता इतिहास हरपला

By admin | Updated: October 9, 2015 23:16 IST

९0 वर्षे पंढरीची वारी : करनूरच्या १0५ वर्षांच्या मुक्ताबाई यांचे निधन

जहाँगीर शेख -- कागल : करनूर (ता. कागल) येथील मुक्ताबाई दत्तात्रय कदम -भोसले या १0५ वर्षीय वृद्धेचे वृद्धापकाळाने निधन झाले. या परिसरातील ‘मुक्ता माळकरीण’ याच नावाने परिचित असणारी ही वृद्धा म्हणजे चालता बोलता इतिहास होता. वयाच्या १३ व्या वर्षी वारकरी संप्रदायाची माळ धारण केल्यापासून आजतागायत त्यांनी विठ्ठल भक्तीत जीवन व्यतीत करीत सलग ९0 वर्षे न चुकता आषाढी एकादशीची पंढरीची वारी केली. गेल्या सप्टेंबर महिन्याच्या २७ तारखेला त्या पंढरपूरला जाऊन आल्या. करनूर ग्रामस्थांनी आणि हनुमान भजनी मंडळाच्या सदस्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात त्यांची अंत्ययात्रा काढली.७ जून १९१0 ही मुक्ताबार्इंची जन्मतारीख. तत्कालीन प्रथेप्रमाणे त्यांचा वयाच्या नवव्या वर्षी कोगनोळी (ता. चिकोडी) येथील दत्तात्रय कदम यांच्याशी बालविवाह झाला. मुक्ताबार्इंना सहा बहिणी, एक भाऊ असा परिवार होता. आई प्लेगच्या साथीने वारली, म्हणून या सहा लहान बहीण-भावांचा सांभाळ करण्यासाठी त्या माहेरी करनूरला परत आल्या, त्या कायमच्याच. वयाच्या १३ व्या वर्षी पंढरीची माळ घातली आणि तेव्हापासून त्या माळकरी म्हणून व्रथस्त जीवन जगत राहिल्या. हातमागावर विणलेली साडी, कपाळावर बुक्का, मुखी पांडुरंगाचे नाव. मात्र, बहिणींची लग्ने, भाऊ शंकर यांचा संसार उभा करण्यापर्यंत या माऊलीने अमाप कष्ट करत भोसले घराण्याला सावरले.ग्रामपंचायत सदस्या, हनुमान भजनी मंडळाच्या एकमेव महिला सदस्या, सगळ्या गावात आदराचे स्थान असणारी मुक्ता माळकरीण म्हणजे चालता-बोलता इतिहास. वयाच्या १३ व्या वर्षांपासून आषाढी एकादशी पंढरपूरच्या वारीला जाण्याचे व्रत त्यांनी जपले. आरती, पाळणा, ओव्या, अभंग, भारुडे, हरीपाठ, रामायण, महाभारत सर्व तोंडपाठ. कोणतीही शाळा न शिकता हे ज्ञान त्यांनी आत्मसात केले होते. इंग्रजांचा कालखंड, स्वातंत्र्य चळवळ, कागलचे संस्थानिक राजे, करवीरकर छत्रपती याचे ‘छबीने’ तत्कालीन गाव रचना, आणीबाणीचा कालखंड आदी गोष्टींवर त्या भरभरून बोलत. गेली दोन वर्षे त्यांची तब्येत बिघडली होती. २०१४ मध्ये आषाढी एकादशीची वारी चुकली म्हणून त्या बेचैन झाल्या. शेवटी घरच्यांनी २७ सप्टेंबर २0१५ रोजी त्यांना पंढरीला नेले. शुक्रवारी (दि. ९) त्यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन भाचे, सुना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, रविवारी आहे.सबला नारीबालविवाह झाला मात्र त्यानंतर माहेर सावरण्यासाठी त्या परत सासरी गेल्या नाहीत. १९२५ च्या क ालखंडापासून पंढरीला तरुण वयात एकटीने जाण्याचे व्रत त्यांनी जपले. आध्यात्मिक ज्ञानाबरोबरच व्यवहारिक ज्ञान ही संपादन केले. तेही कोणत्याही शाळेत न जाता. ग्रामपंचायत सदस्या आणि पुरुषांच्या भजनी मंडळातील एकमेव महिला सदस्या. सबला नारीची व्याख्याच मूक्ताईने आपल्या जगण्यातून सांगितली.