शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

चालता बोलता इतिहास हरपला

By admin | Updated: October 9, 2015 23:16 IST

९0 वर्षे पंढरीची वारी : करनूरच्या १0५ वर्षांच्या मुक्ताबाई यांचे निधन

जहाँगीर शेख -- कागल : करनूर (ता. कागल) येथील मुक्ताबाई दत्तात्रय कदम -भोसले या १0५ वर्षीय वृद्धेचे वृद्धापकाळाने निधन झाले. या परिसरातील ‘मुक्ता माळकरीण’ याच नावाने परिचित असणारी ही वृद्धा म्हणजे चालता बोलता इतिहास होता. वयाच्या १३ व्या वर्षी वारकरी संप्रदायाची माळ धारण केल्यापासून आजतागायत त्यांनी विठ्ठल भक्तीत जीवन व्यतीत करीत सलग ९0 वर्षे न चुकता आषाढी एकादशीची पंढरीची वारी केली. गेल्या सप्टेंबर महिन्याच्या २७ तारखेला त्या पंढरपूरला जाऊन आल्या. करनूर ग्रामस्थांनी आणि हनुमान भजनी मंडळाच्या सदस्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात त्यांची अंत्ययात्रा काढली.७ जून १९१0 ही मुक्ताबार्इंची जन्मतारीख. तत्कालीन प्रथेप्रमाणे त्यांचा वयाच्या नवव्या वर्षी कोगनोळी (ता. चिकोडी) येथील दत्तात्रय कदम यांच्याशी बालविवाह झाला. मुक्ताबार्इंना सहा बहिणी, एक भाऊ असा परिवार होता. आई प्लेगच्या साथीने वारली, म्हणून या सहा लहान बहीण-भावांचा सांभाळ करण्यासाठी त्या माहेरी करनूरला परत आल्या, त्या कायमच्याच. वयाच्या १३ व्या वर्षी पंढरीची माळ घातली आणि तेव्हापासून त्या माळकरी म्हणून व्रथस्त जीवन जगत राहिल्या. हातमागावर विणलेली साडी, कपाळावर बुक्का, मुखी पांडुरंगाचे नाव. मात्र, बहिणींची लग्ने, भाऊ शंकर यांचा संसार उभा करण्यापर्यंत या माऊलीने अमाप कष्ट करत भोसले घराण्याला सावरले.ग्रामपंचायत सदस्या, हनुमान भजनी मंडळाच्या एकमेव महिला सदस्या, सगळ्या गावात आदराचे स्थान असणारी मुक्ता माळकरीण म्हणजे चालता-बोलता इतिहास. वयाच्या १३ व्या वर्षांपासून आषाढी एकादशी पंढरपूरच्या वारीला जाण्याचे व्रत त्यांनी जपले. आरती, पाळणा, ओव्या, अभंग, भारुडे, हरीपाठ, रामायण, महाभारत सर्व तोंडपाठ. कोणतीही शाळा न शिकता हे ज्ञान त्यांनी आत्मसात केले होते. इंग्रजांचा कालखंड, स्वातंत्र्य चळवळ, कागलचे संस्थानिक राजे, करवीरकर छत्रपती याचे ‘छबीने’ तत्कालीन गाव रचना, आणीबाणीचा कालखंड आदी गोष्टींवर त्या भरभरून बोलत. गेली दोन वर्षे त्यांची तब्येत बिघडली होती. २०१४ मध्ये आषाढी एकादशीची वारी चुकली म्हणून त्या बेचैन झाल्या. शेवटी घरच्यांनी २७ सप्टेंबर २0१५ रोजी त्यांना पंढरीला नेले. शुक्रवारी (दि. ९) त्यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन भाचे, सुना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, रविवारी आहे.सबला नारीबालविवाह झाला मात्र त्यानंतर माहेर सावरण्यासाठी त्या परत सासरी गेल्या नाहीत. १९२५ च्या क ालखंडापासून पंढरीला तरुण वयात एकटीने जाण्याचे व्रत त्यांनी जपले. आध्यात्मिक ज्ञानाबरोबरच व्यवहारिक ज्ञान ही संपादन केले. तेही कोणत्याही शाळेत न जाता. ग्रामपंचायत सदस्या आणि पुरुषांच्या भजनी मंडळातील एकमेव महिला सदस्या. सबला नारीची व्याख्याच मूक्ताईने आपल्या जगण्यातून सांगितली.