शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

चालता बोलता इतिहास हरपला

By admin | Updated: October 9, 2015 23:16 IST

९0 वर्षे पंढरीची वारी : करनूरच्या १0५ वर्षांच्या मुक्ताबाई यांचे निधन

जहाँगीर शेख -- कागल : करनूर (ता. कागल) येथील मुक्ताबाई दत्तात्रय कदम -भोसले या १0५ वर्षीय वृद्धेचे वृद्धापकाळाने निधन झाले. या परिसरातील ‘मुक्ता माळकरीण’ याच नावाने परिचित असणारी ही वृद्धा म्हणजे चालता बोलता इतिहास होता. वयाच्या १३ व्या वर्षी वारकरी संप्रदायाची माळ धारण केल्यापासून आजतागायत त्यांनी विठ्ठल भक्तीत जीवन व्यतीत करीत सलग ९0 वर्षे न चुकता आषाढी एकादशीची पंढरीची वारी केली. गेल्या सप्टेंबर महिन्याच्या २७ तारखेला त्या पंढरपूरला जाऊन आल्या. करनूर ग्रामस्थांनी आणि हनुमान भजनी मंडळाच्या सदस्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात त्यांची अंत्ययात्रा काढली.७ जून १९१0 ही मुक्ताबार्इंची जन्मतारीख. तत्कालीन प्रथेप्रमाणे त्यांचा वयाच्या नवव्या वर्षी कोगनोळी (ता. चिकोडी) येथील दत्तात्रय कदम यांच्याशी बालविवाह झाला. मुक्ताबार्इंना सहा बहिणी, एक भाऊ असा परिवार होता. आई प्लेगच्या साथीने वारली, म्हणून या सहा लहान बहीण-भावांचा सांभाळ करण्यासाठी त्या माहेरी करनूरला परत आल्या, त्या कायमच्याच. वयाच्या १३ व्या वर्षी पंढरीची माळ घातली आणि तेव्हापासून त्या माळकरी म्हणून व्रथस्त जीवन जगत राहिल्या. हातमागावर विणलेली साडी, कपाळावर बुक्का, मुखी पांडुरंगाचे नाव. मात्र, बहिणींची लग्ने, भाऊ शंकर यांचा संसार उभा करण्यापर्यंत या माऊलीने अमाप कष्ट करत भोसले घराण्याला सावरले.ग्रामपंचायत सदस्या, हनुमान भजनी मंडळाच्या एकमेव महिला सदस्या, सगळ्या गावात आदराचे स्थान असणारी मुक्ता माळकरीण म्हणजे चालता-बोलता इतिहास. वयाच्या १३ व्या वर्षांपासून आषाढी एकादशी पंढरपूरच्या वारीला जाण्याचे व्रत त्यांनी जपले. आरती, पाळणा, ओव्या, अभंग, भारुडे, हरीपाठ, रामायण, महाभारत सर्व तोंडपाठ. कोणतीही शाळा न शिकता हे ज्ञान त्यांनी आत्मसात केले होते. इंग्रजांचा कालखंड, स्वातंत्र्य चळवळ, कागलचे संस्थानिक राजे, करवीरकर छत्रपती याचे ‘छबीने’ तत्कालीन गाव रचना, आणीबाणीचा कालखंड आदी गोष्टींवर त्या भरभरून बोलत. गेली दोन वर्षे त्यांची तब्येत बिघडली होती. २०१४ मध्ये आषाढी एकादशीची वारी चुकली म्हणून त्या बेचैन झाल्या. शेवटी घरच्यांनी २७ सप्टेंबर २0१५ रोजी त्यांना पंढरीला नेले. शुक्रवारी (दि. ९) त्यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन भाचे, सुना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, रविवारी आहे.सबला नारीबालविवाह झाला मात्र त्यानंतर माहेर सावरण्यासाठी त्या परत सासरी गेल्या नाहीत. १९२५ च्या क ालखंडापासून पंढरीला तरुण वयात एकटीने जाण्याचे व्रत त्यांनी जपले. आध्यात्मिक ज्ञानाबरोबरच व्यवहारिक ज्ञान ही संपादन केले. तेही कोणत्याही शाळेत न जाता. ग्रामपंचायत सदस्या आणि पुरुषांच्या भजनी मंडळातील एकमेव महिला सदस्या. सबला नारीची व्याख्याच मूक्ताईने आपल्या जगण्यातून सांगितली.