शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

शिरोळला नगरपालिकेची प्रतीक्षा

By admin | Updated: April 13, 2017 00:21 IST

शासनाकडे जनरेट्याची गरज : खासदार, आमदार आश्वासनपूर्ती करणार का ?

संदीप बावचे --शिरोळ  --हुपरीनंतर आता शिरोळला नगरपालिका स्थापनेच्या अंतिम मंजूरीकडे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या अडीच वर्षांपासून नगरपरिषदेचा प्रश्न शासन दरबारी या ना त्या कारणाने प्रलंबित पडला आहे. हुपरी ग्रामस्थांच्या जनरेट्यामुळे अखेर ग्रामपंचायत बरखास्त करण्यात आली. त्यामुळे शिरोळला नगरपालिकेसाठी जनरेट्याची गरज निर्माण झाली आहे. याप्रश्नी खासदार, आमदार यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्ती होणार का? असा सवाल शहरवासीयांतून उपस्थित केला जात आहे.आघाडी शासनाच्या काळात तालुक्याच्या ठिकाणी नगरपरिषदांचा आदेश जारी करण्यात आला होता. त्यानंतर प्रस्तावदेखील शासन दरबारी पाठविण्यात आले. शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार मार्च २०१४ मध्ये शिरोळ नगरपरिषदेची उद्घोषणा प्रसिध्द झाली. यामध्ये हरकतींसह जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेच्या बाजूने सादर केलेला अहवाल शासनास मिळाला होता. मात्र, या ना त्या कारणाने याबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित पडला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने नगरपरिषदेची चर्चा पुन्हा सुरू झाली होती. यावेळी आंदोलन अंकुश सामाजिक संस्थेने ‘नगरपरिषद का गरजेची’ यासाठी जनजागृती केली. शिरोळ नगरपरिषदेप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयातील याचिका फेटाळण्यात आल्यामुळे शिरोळला जिल्हा परिषद मतदारसंघ निश्चित झाला होता. निवडणुक प्रक्रियेमुळे शासनानेच नगरपालिकेचा निर्णय घ्यावा, असे निवडणूक आयोगाने सुचित केले होते. न्यायालयाने देखील शासनाला याबाबतचा निर्णय घ्यावा, असे सूचित केल्यामुळे नगरपालिकेच्या निर्णयाचा चेंडू शासन दरबारी पुन्हा प्रलंबित पडला होता. खासदार, आमदारांचे आश्वासनशिरोळला नगरपालिका अंतिम मंजुरीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करू, असे आश्वासन खासदार राजू शेट्टी व आमदार उल्हास पाटील दिले होते. याप्रश्नी मुख्यमंत्र्यांनादेखील दोघांनी साकडे घातले होते. नगरपालिका होण्यासाठी ग्रामपंचायतीनेही मासिक सभा व ग्रामसभेचा ठराव दिला होता. शहराच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने हा प्रश्न सोडविण्यासाठी आता लोकप्रतिनिधींना पुन्हा शासनाकडे पाठपुरावा करावा लागणार आहे. नगरपरिषदेत समाविष्टसाठी ग्रामपंचायतीने ठराव दिला आहे. पालिकेसाठी आता पुन्हा एकदा एकवटण्याची गरज आहे. शासनाकडे पाठपुराव्यानंतरच पालिका स्थापनेला मूर्त स्वरूप येईल. मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल करणार आहोत.- धनाजी चुडमुंगे, आंदोलन अंकुशगावचा विस्तार वाढल्यामुळे नागरी सुविधा देण्यासाठी ग्रामपंचायत अपयशी ठरत आहे. गावच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपालिका गरजेची आहे. सातत्याने माझा पाठपुरावा सुरू असून पुन्हा याप्रश्नी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. - दिलीप पाटील, माजी अध्यक्ष गोकुळ दूध संघ