शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

‘मातोश्री-कृष्णकुंज’च्या आदेशाचीच प्रतीक्षा..!

By admin | Updated: January 28, 2017 22:33 IST

ठाकरे बंधूंचे मनोमिलन : चर्चेमुळे जिल्ह्यातील समीकरणे बदलण्याची चिन्हे

सातारा : महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपची युती तुटली आहे. आता नवीन समीकरणे तयार होण्याची चिन्हे दिसू लागली असून, शिवसेना-महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येऊन आपली ताकद दाखवून देतील, अशी चर्चा शिवसेना व मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे. मातोश्री व कृष्णकुंजवरून काय आदेश होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. शिवसेनेने भाजपाशी युती तोडल्याचे जाहीर केल्यामुळे आता महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत या दोन्ही पक्षांत घमासान होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. सातारा जिल्ह्यात भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याची आधीपासूनच तयारी केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेखील जिल्ह्यातील पंचायत समितीसाठी उमेदवार शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. जावळी व कऱ्हाड तालुक्यांत पंचायत समितीच्या प्रत्येकी दोन तर कोरेगाव, खटाव, सातारा येथील प्रत्येकी एक जागा लढविण्यात येणार आहेत. उंब्रज गटातही मनसे लढणार आहे. शिवसेना व मनसे यांनी स्वतंत्रपणे उमेदवारांचा शोध घेतला आहे. (प्रतिनिधी)केवळ चर्चा सुरू झाली असताना मत व्यक्त करणे ठीक ठरणार नाही, पण शिवसेनेने जिल्हा परिषद व पंचायत समितीसह महापालिकांमध्ये स्वबळाची तयारी केलेली आहे. कोणत्याही पक्षासोबत युती करण्याबाबत पक्षप्रमुख जो आदेश देतील, तो शिरसावंध मानून आम्ही पुढे वाटचाल करणार आहोत. शिवसेना पक्ष चिन्हावर लढण्यासाठी आग्रही आहे.- प्रा. नितीन बानगुडे-पाटील, उपनेते, शिवसेनामहाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष मराठा समाज संरक्षण या मुद्द्यावर एकमताने वाटचाल करत आहेत. हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास मुंबईतला मराठी माणूस प्रथमत: खूश होईल. मराठी माणसाला आणखी आधार मिळेल. सातारा जिल्ह्यातही ताकद वाढविण्यासाठी पोषक परिस्थिती तयार होऊ शकते. - संदीप मोझर, प्रदेश उपाध्यक्ष, मनसे