शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

‘हद्दवाढी’साठी केवळ प्रतीक्षाच..

By admin | Updated: August 9, 2016 00:27 IST

सरकार अनुकूल : १ सप्टेंबरपूर्वी निर्णय घेणे अनिवार्य; पुढील आठवड्यात पुन्हा बैठक

कोल्हापूर : राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार १ सप्टेंबरपासून जिल्हा परिषदेची निवडणूक पूर्व प्रक्रिया सुरू होत आहे. एकदा प्रक्रिया सुरू झाली की, मग त्यात बदल होणार नाहीत. म्हणूनच ही प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी हद्दवाढीचा निर्णय घेणे राज्य सरकारला अडचणीचे होणार आहे. त्यामुळेच हद्दवाढीसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्यास राज्य सरकार विशेषत: पालकमंत्री चंद्रकांत पाटील इच्छुक आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हद्दवाढीची आवश्यकता पटविण्यात यश मिळविले. त्यामुळेच २७ जून रोजी हद्दवाढीची अधिसूचना तयार करण्यात आली. विधिमंडळ अधिवेशनाच्या गडबडीत असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी तयार केलेल्या अधिसूचनेवर सहीसुद्धा केली; परंतु त्याची कुणकुण लागलेल्या आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार सुजित मिणचेकर यांनी मुख्यमंत्री दालनात फडणवीस यांची भेट घेतली. विरोध असतानाही जर अधिसूचना जारी झाली तर मोठे आंदोलन सुरू होईल, असा इशाराच तिघा आमदारांनी दिला. त्यामुळे १ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांनी यासंबंधी दोन्ही बाजूच्या प्रमुखांशी चर्चा करून पंधरा दिवसांनी निर्णय देऊ, असे सांगितले. वास्तविक सरकारनियुक्त तज्ज्ञांच्या समितीने अभ्यास करून हद्दवाढीस अनुकूल अहवाल नगर विकास विभागाला दिला होता. तसेच आता निर्णय लांबला तर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पूर्व प्रक्रियामुळे अडचणी निर्माण होणार आहेत, याचीही स्पष्ट कल्पना होती. तरीही १ आॅगस्टच्या बैठकीत विरोधकांना दुखावणे त्यांच्या गैरसोयीचे होते. आता पंधरा दिवसांनी म्हणजेच २० आॅगस्टनंतर जर निर्णय घ्यायचा म्हटले तरी पुढील सर्व प्रक्रिया नियमानुसार राबविण्यास किमान एक महिना ते दीड महिना लागणार आहे. त्यामुळेच इच्छा असूनसुद्धा ३० आॅगस्टपर्यंत हद्दवाढीचा निर्णय सरकारला घेता येणे अशक्य आहे. सरकार कितीही सकारात्मक असले तरी निवडणूक आयोगाचे निर्देश आणि कालमर्यादेचे बंधन लक्षात घेता हद्दवाढीचा निर्णय लगेच घेणे अशक्य होण्याची शक्यता आहे.कोल्हापूर शहराच्या हद्दवाढसंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील आठवड्यात पुन्हा एकदा सर्व घटकांची बैठक घेणार आहेत. गुणवत्तेच्या पातळीवर हद्दवाढ होईलच, पण कोणत्याही परिस्थितीत ग्रामीण जनतेला विश्वासात न घेता त्यांच्यावर हद्दवाढ लादली जाणार नाही. - चंद्रकांत पाटील, पालकमंत्री