शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

‘हद्दवाढी’साठी केवळ प्रतीक्षाच..

By admin | Updated: August 9, 2016 00:27 IST

सरकार अनुकूल : १ सप्टेंबरपूर्वी निर्णय घेणे अनिवार्य; पुढील आठवड्यात पुन्हा बैठक

कोल्हापूर : राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार १ सप्टेंबरपासून जिल्हा परिषदेची निवडणूक पूर्व प्रक्रिया सुरू होत आहे. एकदा प्रक्रिया सुरू झाली की, मग त्यात बदल होणार नाहीत. म्हणूनच ही प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी हद्दवाढीचा निर्णय घेणे राज्य सरकारला अडचणीचे होणार आहे. त्यामुळेच हद्दवाढीसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्यास राज्य सरकार विशेषत: पालकमंत्री चंद्रकांत पाटील इच्छुक आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हद्दवाढीची आवश्यकता पटविण्यात यश मिळविले. त्यामुळेच २७ जून रोजी हद्दवाढीची अधिसूचना तयार करण्यात आली. विधिमंडळ अधिवेशनाच्या गडबडीत असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी तयार केलेल्या अधिसूचनेवर सहीसुद्धा केली; परंतु त्याची कुणकुण लागलेल्या आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार सुजित मिणचेकर यांनी मुख्यमंत्री दालनात फडणवीस यांची भेट घेतली. विरोध असतानाही जर अधिसूचना जारी झाली तर मोठे आंदोलन सुरू होईल, असा इशाराच तिघा आमदारांनी दिला. त्यामुळे १ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांनी यासंबंधी दोन्ही बाजूच्या प्रमुखांशी चर्चा करून पंधरा दिवसांनी निर्णय देऊ, असे सांगितले. वास्तविक सरकारनियुक्त तज्ज्ञांच्या समितीने अभ्यास करून हद्दवाढीस अनुकूल अहवाल नगर विकास विभागाला दिला होता. तसेच आता निर्णय लांबला तर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पूर्व प्रक्रियामुळे अडचणी निर्माण होणार आहेत, याचीही स्पष्ट कल्पना होती. तरीही १ आॅगस्टच्या बैठकीत विरोधकांना दुखावणे त्यांच्या गैरसोयीचे होते. आता पंधरा दिवसांनी म्हणजेच २० आॅगस्टनंतर जर निर्णय घ्यायचा म्हटले तरी पुढील सर्व प्रक्रिया नियमानुसार राबविण्यास किमान एक महिना ते दीड महिना लागणार आहे. त्यामुळेच इच्छा असूनसुद्धा ३० आॅगस्टपर्यंत हद्दवाढीचा निर्णय सरकारला घेता येणे अशक्य आहे. सरकार कितीही सकारात्मक असले तरी निवडणूक आयोगाचे निर्देश आणि कालमर्यादेचे बंधन लक्षात घेता हद्दवाढीचा निर्णय लगेच घेणे अशक्य होण्याची शक्यता आहे.कोल्हापूर शहराच्या हद्दवाढसंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील आठवड्यात पुन्हा एकदा सर्व घटकांची बैठक घेणार आहेत. गुणवत्तेच्या पातळीवर हद्दवाढ होईलच, पण कोणत्याही परिस्थितीत ग्रामीण जनतेला विश्वासात न घेता त्यांच्यावर हद्दवाढ लादली जाणार नाही. - चंद्रकांत पाटील, पालकमंत्री