शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

‘शिवपुतळा’च्या कामासाठी राज्यपालांच्या मान्यतेची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 14:46 IST

शिवाजी विद्यापीठाची ओळख असलेल्या शिवपुतळा परिसरातील बगीचाच्या संरक्षक कठड्याचे काम सुरू करण्यासाठी राज्यपाल तथा कुलपतींच्या मान्यतेची प्रतीक्षा लागून राहिली आहे. येत्या १५ दिवसांत ही मान्यता मिळेल, अशी शक्यता विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केली आहे. ​​​​​​​

ठळक मुद्दे‘शिवपुतळा’च्या कामासाठी राज्यपालांच्या मान्यतेची प्रतीक्षाविद्युतीकरण पूर्ण; शिवाजी विद्यापीठाकडून त्रुटींची पूर्तता

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाची ओळख असलेल्या शिवपुतळा परिसरातील बगीचाच्या संरक्षक कठड्याचे काम सुरू करण्यासाठी राज्यपाल तथा कुलपतींच्या मान्यतेची प्रतीक्षा लागून राहिली आहे. येत्या १५ दिवसांत ही मान्यता मिळेल, अशी शक्यता विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केली आहे.विद्यापीठातील छत्रपती शिवराय यांचा अश्वारूढ पुतळा आणि त्या परिसरातील बगीचा सुशोभीकरणाचे काम विद्यापीठाकडून करण्यात येत आहे. त्यात जून २०१९ मध्ये सुशोभीकरणाअंतर्गत बगीचाच्या संरक्षक कठड्याचे (रेलिंग) काम काळ्या घडीव दगडांमध्ये करावे. त्यासाठी सध्या वापरलेला दगड आणि रचनेला समस्त कोल्हापूरवासीय शिवभक्त नागरी कृती समितीने विरोध केला.

शहरातील महाराणी ताराराणी चौक, निवृत्ती चौकातील शिवाजी अर्धपुतळा परिसरातील संरक्षक कठड्याचे काम पाहून विद्यापीठ प्रशासनाने पुढील काम करावे, अशी मागणी या समितीने केली. ती मान्य करून विद्यापीठाने काम सुरू केले. सुशोभीकरणाच्या कामासाठी एकूण ४५ लाख रुपये खर्च येणार आहे. त्यातील घडीव दगड लावण्यासाठी २५ लाख रुपये खर्च येणार आहे. त्यासाठी राज्यपालांची मान्यता घेणे आवश्यक आहे.

मान्यतेसाठी विद्यापीठाने राज्यपाल कार्यालयाने दाखविलेल्या त्रुटींची पूर्तता करून पत्रव्यवहार केला आहे. ही मान्यता प्राप्त होताच त्याच्या दुसऱ्या दिवसापासून घडीव दगड लावण्याचे काम सुरू केले जाणार आहे. दरम्यान, या कृती समितीने संंबंधित काम दि. १ एप्रिलपासून सुरू करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

या सुशोभीकरणाअंतर्गत विद्युतीकरण, पादचारी मार्ग, आदी स्वरूपांतील काम पूर्ण झाले आहे. संरक्षक कठड्याला बाहेरून घडीव दगड लावण्याच्या कामासाठी आर्थिक खर्च करण्यासंबंधी राज्यपालांची मान्यता घेण्याबाबतचा पत्रव्यवहार झाला आहे. मान्यता प्राप्त होताच लगेच काम सुरू केले जाईल. या आठवड्यात मान्यता मिळेल अशी अपेक्षा होती. त्यामुळे दि. १५ मार्चपासून हे काम सुरू करण्याची ग्वाही दिली होती. मात्र, त्याला विलंब लागणार असल्याचे दिसते. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत हे काम पूर्ण करण्याचे विद्यापीठ प्रशासनाचे ध्येय आहे.-डॉ. विलास नांदवडेकर,कुलसचिव 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर