शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

ग्रामीण भागातील ज्येष्ठांना प्रतिक्षा विरंगुळा केंद्रांची: आठ वर्षापूर्वी शासन निर्णय; अद्याप अंमलबजावणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 14:05 IST

ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक गेल्या आठ वर्षापासून विरंगुळा केंद्रांच्या प्रतिक्षेत आहेत. शासन निर्णय होऊनही त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. आणखी किती वाट बघायची असा प्रश्न ज्येष्ठ

ठळक मुद्देशासनाचा निर्णयच जर धाब्यावर बसविण्याचा प्रकार होत असेल तर या ज्येष्ठांनी बघायचे कोणाकडे व यांना वाली कोण?

- प्रवीण देसाई -

कोल्हापूर : ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक गेल्या आठ वर्षापासून विरंगुळा केंद्रांच्या प्रतिक्षेत आहेत. शासन निर्णय होऊनही त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. आणखी किती वाट बघायची असा प्रश्न ज्येष्ठ नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र करण्यासंदर्भात ज्येष्ठ नागरिकांसाठी लढणाऱ्या संघटनांकडून गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर १४ मे २०१० ला शासनाने निर्णय घेतला. यामध्ये जिल्हा परिषद व ग्रामपंचायतींनी स्वनिधीतून ही केंद्रे सुरु करण्यासंदर्भात तरतुद करण्यात आली.

यामध्ये वापराविना असलेली ग्रामपंचायतची इमारत, सांस्कृतिक हॉल, समाज मंदीरे यांचा उपयोग करावा असे म्हंटले आहे. या केंद्रांमध्ये व्यायाम साहित्य, वृत्तपत्रे, आठवड्यातून ज्येष्ठांच्या डोळ्यांची तपासणी करणे, आरोग्य तपासणीसाठी डॉक्टरांची व्यवस्था करावी असे म्हंटले आहे. तसेच विरंगुळा केंद्रासंदर्भात ग्रामपंचायतने वर्षाला एक ग्राम सभा घ्यायची आहे. परंतु हा निर्णय होऊन तब्बल आठ वर्षे उलटली तरी एकही केंद्र जिल्ह्यात सुरु झालेले नाही. एकंदरीत जिल्हा परिषद व ग्रामपंचायतींची अनास्था आहे.

शहरी भागात आमदारांनी आपल्या निधीतून अशी केंद्रे दिली आहेत. मात्र, ग्रामीण भागातील खासदार, आमदारांनी याकडे कानाडोळा केल्याचे दिसत आहे. आमदारांकडे पाठपुरावा करायला गेल्यावर ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाºया संघटनांना ग्रामपंचायतने जागा उपलब्ध करुन दिल्यास आम्ही विरंगुळा केंद्रासाठी निधी देतो, असे आमदारांकडून उत्तर मिळते.

आमदार निधी द्यायला तयार असताना ग्रामपंचायतींची मात्र अनास्था दिसत आहे. यासाठी शासनाने अतिरिक्त अनुदान द्यावे, असा सूर जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींकडून उमटत आहे. या सर्व त्रांगड्यामुळे ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरीकांना प्रतिक्षा करावी लागत आहे. निवृत्तीनंतर व्यतित करावयाच्या वेळेसाठी असणाºया विरंगुळा केंद्रे कधी होणार याकडे त्यांचे डोळे लागून राहीले आहेत. शासनाचा निर्णयच जर धाब्यावर बसविण्याचा प्रकार होत असेल तर या ज्येष्ठांनी बघायचे कोणाकडे व यांना वाली कोण? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. 

ग्रामीण भागात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र करण्यासंदर्भात शासन निर्णय होऊन आठ वर्षे उलटली तरी अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. आमच्याकडून या संदर्भात वारंवार पाठपुरावा सुरु आहे.- सोमनाथ गवस, विभागीय सहसचिव, फेस्कॉम

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNatureनिसर्ग