शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

ग्रामीण भागातील ज्येष्ठांना प्रतिक्षा विरंगुळा केंद्रांची: आठ वर्षापूर्वी शासन निर्णय; अद्याप अंमलबजावणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 14:05 IST

ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक गेल्या आठ वर्षापासून विरंगुळा केंद्रांच्या प्रतिक्षेत आहेत. शासन निर्णय होऊनही त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. आणखी किती वाट बघायची असा प्रश्न ज्येष्ठ

ठळक मुद्देशासनाचा निर्णयच जर धाब्यावर बसविण्याचा प्रकार होत असेल तर या ज्येष्ठांनी बघायचे कोणाकडे व यांना वाली कोण?

- प्रवीण देसाई -

कोल्हापूर : ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक गेल्या आठ वर्षापासून विरंगुळा केंद्रांच्या प्रतिक्षेत आहेत. शासन निर्णय होऊनही त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. आणखी किती वाट बघायची असा प्रश्न ज्येष्ठ नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र करण्यासंदर्भात ज्येष्ठ नागरिकांसाठी लढणाऱ्या संघटनांकडून गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर १४ मे २०१० ला शासनाने निर्णय घेतला. यामध्ये जिल्हा परिषद व ग्रामपंचायतींनी स्वनिधीतून ही केंद्रे सुरु करण्यासंदर्भात तरतुद करण्यात आली.

यामध्ये वापराविना असलेली ग्रामपंचायतची इमारत, सांस्कृतिक हॉल, समाज मंदीरे यांचा उपयोग करावा असे म्हंटले आहे. या केंद्रांमध्ये व्यायाम साहित्य, वृत्तपत्रे, आठवड्यातून ज्येष्ठांच्या डोळ्यांची तपासणी करणे, आरोग्य तपासणीसाठी डॉक्टरांची व्यवस्था करावी असे म्हंटले आहे. तसेच विरंगुळा केंद्रासंदर्भात ग्रामपंचायतने वर्षाला एक ग्राम सभा घ्यायची आहे. परंतु हा निर्णय होऊन तब्बल आठ वर्षे उलटली तरी एकही केंद्र जिल्ह्यात सुरु झालेले नाही. एकंदरीत जिल्हा परिषद व ग्रामपंचायतींची अनास्था आहे.

शहरी भागात आमदारांनी आपल्या निधीतून अशी केंद्रे दिली आहेत. मात्र, ग्रामीण भागातील खासदार, आमदारांनी याकडे कानाडोळा केल्याचे दिसत आहे. आमदारांकडे पाठपुरावा करायला गेल्यावर ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाºया संघटनांना ग्रामपंचायतने जागा उपलब्ध करुन दिल्यास आम्ही विरंगुळा केंद्रासाठी निधी देतो, असे आमदारांकडून उत्तर मिळते.

आमदार निधी द्यायला तयार असताना ग्रामपंचायतींची मात्र अनास्था दिसत आहे. यासाठी शासनाने अतिरिक्त अनुदान द्यावे, असा सूर जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींकडून उमटत आहे. या सर्व त्रांगड्यामुळे ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरीकांना प्रतिक्षा करावी लागत आहे. निवृत्तीनंतर व्यतित करावयाच्या वेळेसाठी असणाºया विरंगुळा केंद्रे कधी होणार याकडे त्यांचे डोळे लागून राहीले आहेत. शासनाचा निर्णयच जर धाब्यावर बसविण्याचा प्रकार होत असेल तर या ज्येष्ठांनी बघायचे कोणाकडे व यांना वाली कोण? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. 

ग्रामीण भागात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र करण्यासंदर्भात शासन निर्णय होऊन आठ वर्षे उलटली तरी अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. आमच्याकडून या संदर्भात वारंवार पाठपुरावा सुरु आहे.- सोमनाथ गवस, विभागीय सहसचिव, फेस्कॉम

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNatureनिसर्ग