शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
6
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
7
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
8
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
9
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
10
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
11
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
12
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
13
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
14
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
15
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
16
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
17
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
18
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
19
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
20
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

ग्रामीण भागातील ज्येष्ठांना प्रतिक्षा विरंगुळा केंद्रांची: आठ वर्षापूर्वी शासन निर्णय; अद्याप अंमलबजावणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 14:05 IST

ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक गेल्या आठ वर्षापासून विरंगुळा केंद्रांच्या प्रतिक्षेत आहेत. शासन निर्णय होऊनही त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. आणखी किती वाट बघायची असा प्रश्न ज्येष्ठ

ठळक मुद्देशासनाचा निर्णयच जर धाब्यावर बसविण्याचा प्रकार होत असेल तर या ज्येष्ठांनी बघायचे कोणाकडे व यांना वाली कोण?

- प्रवीण देसाई -

कोल्हापूर : ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक गेल्या आठ वर्षापासून विरंगुळा केंद्रांच्या प्रतिक्षेत आहेत. शासन निर्णय होऊनही त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. आणखी किती वाट बघायची असा प्रश्न ज्येष्ठ नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र करण्यासंदर्भात ज्येष्ठ नागरिकांसाठी लढणाऱ्या संघटनांकडून गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर १४ मे २०१० ला शासनाने निर्णय घेतला. यामध्ये जिल्हा परिषद व ग्रामपंचायतींनी स्वनिधीतून ही केंद्रे सुरु करण्यासंदर्भात तरतुद करण्यात आली.

यामध्ये वापराविना असलेली ग्रामपंचायतची इमारत, सांस्कृतिक हॉल, समाज मंदीरे यांचा उपयोग करावा असे म्हंटले आहे. या केंद्रांमध्ये व्यायाम साहित्य, वृत्तपत्रे, आठवड्यातून ज्येष्ठांच्या डोळ्यांची तपासणी करणे, आरोग्य तपासणीसाठी डॉक्टरांची व्यवस्था करावी असे म्हंटले आहे. तसेच विरंगुळा केंद्रासंदर्भात ग्रामपंचायतने वर्षाला एक ग्राम सभा घ्यायची आहे. परंतु हा निर्णय होऊन तब्बल आठ वर्षे उलटली तरी एकही केंद्र जिल्ह्यात सुरु झालेले नाही. एकंदरीत जिल्हा परिषद व ग्रामपंचायतींची अनास्था आहे.

शहरी भागात आमदारांनी आपल्या निधीतून अशी केंद्रे दिली आहेत. मात्र, ग्रामीण भागातील खासदार, आमदारांनी याकडे कानाडोळा केल्याचे दिसत आहे. आमदारांकडे पाठपुरावा करायला गेल्यावर ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाºया संघटनांना ग्रामपंचायतने जागा उपलब्ध करुन दिल्यास आम्ही विरंगुळा केंद्रासाठी निधी देतो, असे आमदारांकडून उत्तर मिळते.

आमदार निधी द्यायला तयार असताना ग्रामपंचायतींची मात्र अनास्था दिसत आहे. यासाठी शासनाने अतिरिक्त अनुदान द्यावे, असा सूर जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींकडून उमटत आहे. या सर्व त्रांगड्यामुळे ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरीकांना प्रतिक्षा करावी लागत आहे. निवृत्तीनंतर व्यतित करावयाच्या वेळेसाठी असणाºया विरंगुळा केंद्रे कधी होणार याकडे त्यांचे डोळे लागून राहीले आहेत. शासनाचा निर्णयच जर धाब्यावर बसविण्याचा प्रकार होत असेल तर या ज्येष्ठांनी बघायचे कोणाकडे व यांना वाली कोण? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. 

ग्रामीण भागात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र करण्यासंदर्भात शासन निर्णय होऊन आठ वर्षे उलटली तरी अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. आमच्याकडून या संदर्भात वारंवार पाठपुरावा सुरु आहे.- सोमनाथ गवस, विभागीय सहसचिव, फेस्कॉम

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNatureनिसर्ग