शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वडनेरे समितीचीच गाळ काढण्याची शिफारस वेगळी समिती नाही : गाळ-वाळूचा अभ्यास आवश्यकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:27 IST

कोल्हापूर : नदी-नाल्यातील गाळ काढून त्यांचे प्रवाह सुरळीत करावेत ही महत्त्वाची सूचना महापुराचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या नंदकुमार ...

कोल्हापूर : नदी-नाल्यातील गाळ काढून त्यांचे प्रवाह सुरळीत करावेत ही महत्त्वाची सूचना महापुराचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या नंदकुमार वडनेरे समितीनेच केली असल्याने त्यासाठी नव्याने समिती नेमण्यात येणार नसल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. वडनेरे समितीने ढोबळ सूचना केली आहे, ही समिती स्थापन झाली असती तर पंचगंगा नदीतील गाळ व वाळूचा अभ्यास होण्यास मदत झाली असती, ते काम आता होणार नाही.

दरवर्षी पुराच्या पाण्यामुळे वाहत येणारी माती साचून पंचगंगा नदीपात्रात गाळ साचला असल्यास गाळ व वाळू काढून नदीचा प्रवाह सुरळीत ठेवता येईल का, याचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव एकनाथ पाटील यांची समिती स्थापन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी येथे दिल्या होत्या. या समितीचे काम कधी सुरू होणार याबाबत अधिकृत सूत्रांकडे चौकशी केल्यावर ही समितीच अस्तित्वात येणार नसल्याचे सांगण्यात आले. शासकीय विश्रामधाममधील बैठकीनंतर ज्यांची समिती नेमण्याचे जाहीर करण्यात आले होते, त्या निवृत्त प्रधान सचिव एकनाथ पाटील यांनी उपमुख्यमंत्री पवार व पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली व त्यातील वस्तूस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यासाठी वेगळी समिती नेमण्याची गरज नसून गाळ काढण्याची शिफारस वडनेरे समितीनेच केली असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे समितीचा विषय तिथेच संपला असल्याचे सांगण्यात येते. सरकार नुसत्या समित्या नेमते व पुढे काय त्याचे होत नाही, अशीही टीका या समितीच्या घोषणेनंतर लोकांतून उमटली होती. मी वाळू काढायचे म्हटल्यावर त्यातून कोणतेही राजकारण होऊ नये, त्यातील नियम पाहून आणि लोकांची सुरक्षितता विचारात घेऊनच हा उपाय सुचविला असल्याचेही पवार यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते.