शहरं
Join us  
Trending Stories
1
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
2
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
3
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
4
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
5
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
6
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
7
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
9
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
10
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
11
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
12
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
13
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
14
अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नाही, हा आमचा झांगनान; चीनची दर्पोक्ती, भारतावर निशाणा
15
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
16
कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात
17
१८८९ ते १९४९ - राज्यघटनेच्या जन्माची ६० वर्षे! 'असा' भारतीय घटनेच्या निर्मितीचा इतिहास
18
‘काँग्रेस’चे शशी थरूर भाजपमध्ये (कधी) जातील?; केरळच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतील
19
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
20
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
Daily Top 2Weekly Top 5

वडनेरे समितीचीच गाळ काढण्याची शिफारस वेगळी समिती नाही : गाळ-वाळूचा अभ्यास आवश्यकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:27 IST

कोल्हापूर : नदी-नाल्यातील गाळ काढून त्यांचे प्रवाह सुरळीत करावेत ही महत्त्वाची सूचना महापुराचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या नंदकुमार ...

कोल्हापूर : नदी-नाल्यातील गाळ काढून त्यांचे प्रवाह सुरळीत करावेत ही महत्त्वाची सूचना महापुराचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या नंदकुमार वडनेरे समितीनेच केली असल्याने त्यासाठी नव्याने समिती नेमण्यात येणार नसल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. वडनेरे समितीने ढोबळ सूचना केली आहे, ही समिती स्थापन झाली असती तर पंचगंगा नदीतील गाळ व वाळूचा अभ्यास होण्यास मदत झाली असती, ते काम आता होणार नाही.

दरवर्षी पुराच्या पाण्यामुळे वाहत येणारी माती साचून पंचगंगा नदीपात्रात गाळ साचला असल्यास गाळ व वाळू काढून नदीचा प्रवाह सुरळीत ठेवता येईल का, याचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव एकनाथ पाटील यांची समिती स्थापन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी येथे दिल्या होत्या. या समितीचे काम कधी सुरू होणार याबाबत अधिकृत सूत्रांकडे चौकशी केल्यावर ही समितीच अस्तित्वात येणार नसल्याचे सांगण्यात आले. शासकीय विश्रामधाममधील बैठकीनंतर ज्यांची समिती नेमण्याचे जाहीर करण्यात आले होते, त्या निवृत्त प्रधान सचिव एकनाथ पाटील यांनी उपमुख्यमंत्री पवार व पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली व त्यातील वस्तूस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यासाठी वेगळी समिती नेमण्याची गरज नसून गाळ काढण्याची शिफारस वडनेरे समितीनेच केली असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे समितीचा विषय तिथेच संपला असल्याचे सांगण्यात येते. सरकार नुसत्या समित्या नेमते व पुढे काय त्याचे होत नाही, अशीही टीका या समितीच्या घोषणेनंतर लोकांतून उमटली होती. मी वाळू काढायचे म्हटल्यावर त्यातून कोणतेही राजकारण होऊ नये, त्यातील नियम पाहून आणि लोकांची सुरक्षितता विचारात घेऊनच हा उपाय सुचविला असल्याचेही पवार यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते.