शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
5
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
6
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
7
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
8
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
9
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
11
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
12
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
13
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
14
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
15
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
16
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
17
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
18
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
19
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
20
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!

वडगावला पालिकेचे मुख्याधिकारी पद रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पेठवडगाव : येथील वडगावमधील पालिका मुख्याधिकाऱ्यांचे पद रिक्त असल्यामुळे प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण होत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पेठवडगाव : येथील वडगावमधील पालिका मुख्याधिकाऱ्यांचे पद रिक्त असल्यामुळे प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण होत आहे. तीन महिन्यांपासून नवीन मुख्याधिकारी रुजू झाले नसल्याने जयसिंगपूर मुख्याधिकाऱ्यांकडे वडगावचा अतिरिक्त कारभार सोपवला आहे. त्यामुळे धोरणात्मक निर्णय घेताना अडचणी येत आहेत.

मुख्याधिकारी सुषमा कोल्हे-शिंदे यांची पदोन्नतीवर पिंपरी-चिंचवडच्या सहाय्यक आयुक्त म्हणून बदली झाली. पालिका निवडणुकीपूर्वी शहरातील विकासकामे मार्गी लागावी, यासाठी पालिकेत मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक होण्यासाठी सत्तारूढ गट पाठपुरावा करत आहे. मात्र, त्यांना यश आलेले नाही. सध्या पेठवडगावचा अतिरिक्त पदभार हा सुमारे तीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जयसिंगपूर येथील मुख्याधिकारी टीना गवळी यांच्याकडे आहे. त्या कार्यक्षम असल्या, तरी त्यांना काही बंधने आहेत. त्यामुळे वडगावचा विकास खुंटला आहे तसेच येत्या वर्षभरात आपल्या सोयीच्या व आगामी पालिका निवडणुकीसाठी विकासकामे करताना सोयीचे व्हावे, यासाठी पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने प्रशासकीय कामकाजाकडे दुर्लक्ष होत आहे. शहरात अतिक्रमणात वाढ तसेच कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून, व्यापारी, नागरिकांमध्ये बेशिस्तपणा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर खमक्या मुख्याधिकाऱ्यांची गरज आहे.

अलिकडील काळात अतुल पाटील, सुषमा कोल्हे-शिंदे यांनी उत्कृष्ट काम करून आपल्या कामाची छाप पाडली आहे. शिंदे-कोल्हे यांनी शहराच्या सर्वांगिण विकासासाठी प्रशासकीय यंत्रणा गतिमान केली होती. कोरोना काळात प्रशासकीय यंत्रणा सजग करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. कोरोना जनजागृती, रुग्णांसाठी कोविड सेंटर उभारणी, अलगीकरण आणि विलगीकरण कक्ष उभारणी, आदी उपाययोजना केल्या होत्या. तर स्वच्छता अभियानामध्येही देशात क्रमांक पटकावण्यासाठी स्वतःसह प्रशासन, सामाजिक संस्था यांच्या मदतीने प्रयत्न केले होते.

यामुळे शहरवासीयांच्या अपेक्षा वाढल्या असताना, तीन महिने प्रभारी मुख्याधिकारी कार्यरत आहेत. त्यामुळे नागरिकांची कामे थांबली आहेत. कोणतेही काम असले की, आज प्रभारी मुख्याधिकारी नाहीत, उद्या या, असे सांगितले जाते. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.