शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
2
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
3
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
4
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
5
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
6
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
7
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
8
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
9
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
10
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
11
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
12
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
13
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
14
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
15
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
16
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
17
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
18
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
19
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
20
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष

वडगावला पालिकेचे मुख्याधिकारी पद रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पेठवडगाव : येथील वडगावमधील पालिका मुख्याधिकाऱ्यांचे पद रिक्त असल्यामुळे प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण होत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पेठवडगाव : येथील वडगावमधील पालिका मुख्याधिकाऱ्यांचे पद रिक्त असल्यामुळे प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण होत आहे. तीन महिन्यांपासून नवीन मुख्याधिकारी रुजू झाले नसल्याने जयसिंगपूर मुख्याधिकाऱ्यांकडे वडगावचा अतिरिक्त कारभार सोपवला आहे. त्यामुळे धोरणात्मक निर्णय घेताना अडचणी येत आहेत.

मुख्याधिकारी सुषमा कोल्हे-शिंदे यांची पदोन्नतीवर पिंपरी-चिंचवडच्या सहाय्यक आयुक्त म्हणून बदली झाली. पालिका निवडणुकीपूर्वी शहरातील विकासकामे मार्गी लागावी, यासाठी पालिकेत मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक होण्यासाठी सत्तारूढ गट पाठपुरावा करत आहे. मात्र, त्यांना यश आलेले नाही. सध्या पेठवडगावचा अतिरिक्त पदभार हा सुमारे तीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जयसिंगपूर येथील मुख्याधिकारी टीना गवळी यांच्याकडे आहे. त्या कार्यक्षम असल्या, तरी त्यांना काही बंधने आहेत. त्यामुळे वडगावचा विकास खुंटला आहे तसेच येत्या वर्षभरात आपल्या सोयीच्या व आगामी पालिका निवडणुकीसाठी विकासकामे करताना सोयीचे व्हावे, यासाठी पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने प्रशासकीय कामकाजाकडे दुर्लक्ष होत आहे. शहरात अतिक्रमणात वाढ तसेच कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून, व्यापारी, नागरिकांमध्ये बेशिस्तपणा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर खमक्या मुख्याधिकाऱ्यांची गरज आहे.

अलिकडील काळात अतुल पाटील, सुषमा कोल्हे-शिंदे यांनी उत्कृष्ट काम करून आपल्या कामाची छाप पाडली आहे. शिंदे-कोल्हे यांनी शहराच्या सर्वांगिण विकासासाठी प्रशासकीय यंत्रणा गतिमान केली होती. कोरोना काळात प्रशासकीय यंत्रणा सजग करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. कोरोना जनजागृती, रुग्णांसाठी कोविड सेंटर उभारणी, अलगीकरण आणि विलगीकरण कक्ष उभारणी, आदी उपाययोजना केल्या होत्या. तर स्वच्छता अभियानामध्येही देशात क्रमांक पटकावण्यासाठी स्वतःसह प्रशासन, सामाजिक संस्था यांच्या मदतीने प्रयत्न केले होते.

यामुळे शहरवासीयांच्या अपेक्षा वाढल्या असताना, तीन महिने प्रभारी मुख्याधिकारी कार्यरत आहेत. त्यामुळे नागरिकांची कामे थांबली आहेत. कोणतेही काम असले की, आज प्रभारी मुख्याधिकारी नाहीत, उद्या या, असे सांगितले जाते. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.