शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

वृक्ष प्रसाद योजना राज्यभर मॉडेल ठरेल, अभिनेते मनोज वाजपेयींनी कौतुक केले

By संदीप आडनाईक | Updated: December 3, 2022 15:46 IST

ही योजना सध्या सिद्धिविनायक दगडूशेठ, पुणे, शिर्डी येथे राबविण्यात येत असल्याचे सांगून आता राज्यभर ही याजना राबवण्यात येणार असल्याचे अभिनेते सयाजी शिंदे यांनी सांगितले.

कोल्हापूर : कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिरातून सुरू केलेली वृक्ष प्रसाद योजना यापुढे राज्यभर महाराष्ट्र मॉडेल म्हणून ओळखली जाईल, अशा शब्दात या उपक्रमाचे अभिनेते मनोज वाजपेयी यांनी कौतुक केले. ही योजना सध्या सिद्धिविनायक दगडूशेठ, पुणे, शिर्डी येथे राबविण्यात येत असल्याचे सांगून आता राज्यभर ही याजना राबवण्यात येणार असल्याचे अभिनेते सयाजी शिंदे यांनी सांगितले.सह्याद्री देवराई सामाजिक संस्था, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती आणि सामाजिक वनीकरण विभागातर्फे अंबाबाई मंदिरात सयाजी शिंदे आणि मनोज वाजपेयी यांच्या हस्ते वृक्ष प्रसाद योजनेच्या लोकार्पण सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. दोघांनीही प्रारंभी देवी अंबाबाईला अभिषेक केला. दोघांच्या हस्ते भाविकांना म्हाळुंग, पारिजातक, बेल, जास्वंदी, अर्जुन या प्रजातीमधील फळांची आणि फुलांची रोपे देण्यात आली.यांनतर प्रेस क्लब येथील वार्तालाप कार्यक्रमात सयाजी शिंदे आणि अभिनेते मनोज वाजपेयी यांनी या उपक्रमाची माहिती दिली. हा वृक्षप्रसाद पर्यावरणाच्या संवर्धनाचा विचार आहे. प्रसाद म्हणून आपण नारळ, लाडू किंवा पेढा याऐवजी झाडच प्रसाद म्हणून मिळाल्यास त्याचा घरोघरी फायदा होणार आहे. या योजनेचे देशभर त्याचे धडे गिरवले जातील अशी अपेक्षा वाजपेयी यांनी व्यक्त केली. सयाजी म्हणाले, हा एक विचार आहे, तो कोल्हापुरातूनच सुरू झाला आहे. ज्यांची देव आणि आई-वडिलांवर श्रद्धा आहे, त्यांनी हा प्रसाद द्यायचा आहे. झाड कधी तुम्हाला फसवत नाही, त्यामुळे हा प्रसाद म्हणून नेलेले झाड पुढच्या अनेक पिढ्या तुम्हाला फळे देत राहणार आहे. मुकुल माधव फाउंडेशन, फिनोलेक्स यांनी या योजनेला सहकार्य केले. यावेळी वन्य जीव मंडळाचे सदस्य सुहास वायंगणकर, सह्याद्रीचे कोल्हापूर प्रमुख शैलेश बांदेकर, देवस्थान समितीचे महादेव दिंडे, धनाजी जाधव, सुहास भयंकर, बबलू मोकळे, जितेश गिरी उपस्थित होते.वृक्षांना ट्रेकिंग सिस्टीम कोडया वृक्षांना ट्रेकिंग सिस्टीम कोड असून याची माहिती ऑनलाईन समजू शकणार आहे. भाविकांना मिळालेले झाड त्यांनी कुठे लावले आणि त्यांची संगोपन केले याचे सेल्फीही पाठवण्याचे आवाहन सयाजी यांनी केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर