शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

मतदारांना घ्यावी लागणार ‘रेणुका’ची शपथ

By admin | Updated: April 10, 2015 00:57 IST

आस्थेची मदत : फंदफितुरी टाळण्यासाठी सत्तारूढ गटाची युक्ती

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या निवडणुकीत मतदारांना सौंदत्ती येथे जाऊन आई रेणुकादेवीची शपथ घ्यावी लागणार आहे. परडीवर हात मारून ‘मी सत्तारूढ पॅनललाच मतदान करीन,’ अशी शपथ घेतल्यानंतरच त्यांना कोल्हापुरात आणले जाणार आहे. निवडणुकीतील फंदफितुरी टाळण्यासाठी सत्तारूढ आघाडीने ही युक्ती शोधली आहे.संघाची निवडणूक २३ एप्रिलला होत आहे. रिंगणातील दोन्ही प्रमुख पॅनलची घोषणा गुरुवारी झाल्यानंतर आता सत्तारूढ आघाडीने मतदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. पॅनलची रचना तरी भक्कम झाली आहे; परंतु काही जुन्या संचालकांबद्दल तेच-तेच चेहरे सत्तेचा लाभ घेत असल्याने लोकांत नाराजी आहे. ती नाराजी ठरावधारक मतदारांपर्यंत पोहोचू नये व एकगठ्ठा मतदान सुरक्षित व्हावे यासाठी त्यांना सहलीवर नेण्याचे नियोजन सत्तारूढ गटाने केले आहे. तसे ते प्रत्येक निवडणुकीवेळीच केले जाते.सध्या प्रत्येक तालुक्यातील सुमारे पन्नास मतदारांना सहलीवर हलविण्यात आले आहे. अजून किमान हजारभर मतदारांना बाहेर हलविण्यात येणार आहे. त्या-त्या तालुक्यातील संचालक त्याचे नियोजन करीत आहेत. त्यामुळे आता उमेदवारी निश्चित झाल्यावर ‘बाबा, तू कधी येतोस सहलीला...?’ अशी विनंती करण्यासाठी संचालक ठरावधारक मतदारांचे उंबरठे झिजवू लागले आहेत. राजाराम कारखान्याचे मतदान १९ एप्रिलला आहे. अनेक ठरावधारक तिथेही मतदार असल्याने त्यांना आताच सहलीवर जाण्यास अडचण आहे. शिवाय ‘गोकुळ’च्या मतदानासाठीही आजपासून तब्बल चौदा दिवस आहेत. सहलीवर खाण्यापिण्याची व जे हवे ते मिळण्याची सोय असली तरी इतके दिवस बाहेर जाणे अनेकांना शक्य नसते. काहींची शेतीची कामे सुरू आहेत. काहींच्या कुटुंबांत लग्नकार्ये आहेत. त्यामुळे ते ‘शेवटच्या चार दिवसांतच तुमच्याबरोबर येतो,’ असे सांगून आताच सहलीवर जाण्यास टाळत आहेत. या सहलीवर गेलेल्या सर्व मतदारांना २२ ला सकाळी सौंदत्ती येथील यल्लमा डोंगरावर देवीच्या दर्शनासाठी नेण्यात येणार आहे. तिथे देवीच्या मंदिरात ‘सत्तारूढ गटालाच मतदान करीन,’ अशी शपथ घेण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर त्यांना एकत्रित त्याच दिवशी रात्री कोल्हापुरात आणण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी मतदान झाल्यानंतरच त्यांना घरी सोडण्यात येईल.‘सौंदत्ती’च का...?मतदार असो की अन्य कोणीही; त्याने स्वत:च्या आईबाबांचे नाव घेऊनही जरी शपथ घेतली तरी तिच्याशी तो प्रामाणिक राहण्याची खात्री नसते; परंतु रेणुकादेवीच्या परडीवर हात मारून शपथ घेतल्यास मतदार देवीच्या भीतीपोटी उलटे काही करीत नाही. ही देवी आपले काहीतरी बरेवाईट करील, अशी लोकांना भीती वाटते व ती फक्त या देवीबद्दलच वाटत असल्याने ‘शपथविधी’चा कार्यक्रम डोंगरावर होणार आहे.