शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

मतदारांना घ्यावी लागणार ‘रेणुका’ची शपथ

By admin | Updated: April 10, 2015 00:57 IST

आस्थेची मदत : फंदफितुरी टाळण्यासाठी सत्तारूढ गटाची युक्ती

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या निवडणुकीत मतदारांना सौंदत्ती येथे जाऊन आई रेणुकादेवीची शपथ घ्यावी लागणार आहे. परडीवर हात मारून ‘मी सत्तारूढ पॅनललाच मतदान करीन,’ अशी शपथ घेतल्यानंतरच त्यांना कोल्हापुरात आणले जाणार आहे. निवडणुकीतील फंदफितुरी टाळण्यासाठी सत्तारूढ आघाडीने ही युक्ती शोधली आहे.संघाची निवडणूक २३ एप्रिलला होत आहे. रिंगणातील दोन्ही प्रमुख पॅनलची घोषणा गुरुवारी झाल्यानंतर आता सत्तारूढ आघाडीने मतदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. पॅनलची रचना तरी भक्कम झाली आहे; परंतु काही जुन्या संचालकांबद्दल तेच-तेच चेहरे सत्तेचा लाभ घेत असल्याने लोकांत नाराजी आहे. ती नाराजी ठरावधारक मतदारांपर्यंत पोहोचू नये व एकगठ्ठा मतदान सुरक्षित व्हावे यासाठी त्यांना सहलीवर नेण्याचे नियोजन सत्तारूढ गटाने केले आहे. तसे ते प्रत्येक निवडणुकीवेळीच केले जाते.सध्या प्रत्येक तालुक्यातील सुमारे पन्नास मतदारांना सहलीवर हलविण्यात आले आहे. अजून किमान हजारभर मतदारांना बाहेर हलविण्यात येणार आहे. त्या-त्या तालुक्यातील संचालक त्याचे नियोजन करीत आहेत. त्यामुळे आता उमेदवारी निश्चित झाल्यावर ‘बाबा, तू कधी येतोस सहलीला...?’ अशी विनंती करण्यासाठी संचालक ठरावधारक मतदारांचे उंबरठे झिजवू लागले आहेत. राजाराम कारखान्याचे मतदान १९ एप्रिलला आहे. अनेक ठरावधारक तिथेही मतदार असल्याने त्यांना आताच सहलीवर जाण्यास अडचण आहे. शिवाय ‘गोकुळ’च्या मतदानासाठीही आजपासून तब्बल चौदा दिवस आहेत. सहलीवर खाण्यापिण्याची व जे हवे ते मिळण्याची सोय असली तरी इतके दिवस बाहेर जाणे अनेकांना शक्य नसते. काहींची शेतीची कामे सुरू आहेत. काहींच्या कुटुंबांत लग्नकार्ये आहेत. त्यामुळे ते ‘शेवटच्या चार दिवसांतच तुमच्याबरोबर येतो,’ असे सांगून आताच सहलीवर जाण्यास टाळत आहेत. या सहलीवर गेलेल्या सर्व मतदारांना २२ ला सकाळी सौंदत्ती येथील यल्लमा डोंगरावर देवीच्या दर्शनासाठी नेण्यात येणार आहे. तिथे देवीच्या मंदिरात ‘सत्तारूढ गटालाच मतदान करीन,’ अशी शपथ घेण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर त्यांना एकत्रित त्याच दिवशी रात्री कोल्हापुरात आणण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी मतदान झाल्यानंतरच त्यांना घरी सोडण्यात येईल.‘सौंदत्ती’च का...?मतदार असो की अन्य कोणीही; त्याने स्वत:च्या आईबाबांचे नाव घेऊनही जरी शपथ घेतली तरी तिच्याशी तो प्रामाणिक राहण्याची खात्री नसते; परंतु रेणुकादेवीच्या परडीवर हात मारून शपथ घेतल्यास मतदार देवीच्या भीतीपोटी उलटे काही करीत नाही. ही देवी आपले काहीतरी बरेवाईट करील, अशी लोकांना भीती वाटते व ती फक्त या देवीबद्दलच वाटत असल्याने ‘शपथविधी’चा कार्यक्रम डोंगरावर होणार आहे.