शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

आवाजाची ओळख, बोलण्याचा आत्मविश्वास वाढविणारी कार्यशाळा-आज समारोप : निनाद काळे यांचे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:38 IST

कोल्हापूर : आवाजाची ओळख करून देण्यासह बोलण्याचा आत्मविश्वास वाढविणारी कार्यशाळा गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या सभागृहात सुरू आहे.

कोल्हापूर : आवाजाची ओळख करून देण्यासह बोलण्याचा आत्मविश्वास वाढविणारी कार्यशाळा गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या सभागृहात सुरू आहे. आवाज अभिनेता निनाद काळे मार्गदर्शनाखालील या कार्यशाळेत दहा ते सत्तर वर्षांपर्यंतचे आबालवृद्ध आवाजाबाबतचे धडे गिरवित आहेत. या कार्यशाळेचा समारोप आज, मंगळवारी सायंकाळी सात वाजता ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

याबाबत निनाद काळे यांनी सांगितले, मोबाईल क्रांतीमुळे माणसे ‘लँडलाईन’ आणि दूरध्वनी ‘मोबाईल’ झाले. आज एकमेकांशी बोलायचे तर टॉकटाईम रिचार्ज करावा लागतो. अशा पद्धतीने आपले बोलणे महाग होत आहे. अर्थात, आधीच्या काळात सगळचे आलबेल होते असे नाही, तर मोठ्यांनी सांगितलेले लहानांनी ऐकायचे हीच परंपरा होती. त्यामुळे आपल्याकडे कुटुंबात, शाळा-कॉलेज, धर्मात बोलण्याचा संस्कारच केला जात नाही. त्यामुळे पालक आपल्या मुलांशी, शिक्षक-प्राध्यापक विद्यार्थ्यांशी, एकूणच समाजात जसे बोलायला हवे तसे बोलले जात नाही. त्यामुळे आज प्रत्येक नातेसंबंधात तणाव वाढत आहे. मुलांचे बालपण हरवत आहे. त्यासह अभिनय, सूत्रसंचालन, डबिंग, गायन, शिक्षक, प्राध्यापक, वकील, मार्केटिंग, आदी क्षेत्रात करिअर करण्यासाठी बोलण्याचा पाया भक्कम असावा लागतो, पण याकडे आजतागायत कुणी फारसे गंभीर नाही. त्यामुळे मी आणि संगीता राठोड यांनी संबंधित गरज ओळखून वय वर्षे दहा ते सत्तर अशा सर्वांसाठी ही आवाजाची कार्यशाळा सुरू केली. दर महिन्याला दोन अशा पद्धतीने या कार्यशाळेचे राज्यभर आयोजन केले जाते.आवाजासह विचारांची कार्यशाळाचेंबर आॅफ कॉमर्सच्या सभागृहात सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेतील या कार्यशाळेत आवाजाची ओळख, श्वासाचे, जिभेचे अनेक व्यायाम प्रकार, आवाजाचे चढ-उतार, शब्दोच्चार यावर भर देत बोलताना उभे कसे राहायचे, हातवारे कसे करायचे, देहबोली कशी असावी. एखादा विषय समजून घेऊन मगच स्वयंस्फूर्तीने कसे बोलायचे, याचे मार्गदर्शन संपूर्ण प्रात्यक्षिक पद्धतीने केले जाते. ज्यामुळे कार्यशाळेतील प्रत्येक व्यक्तीला सर्वांसमोर बोलण्याचा आत्मविश्वास केवळ पाच ते सहा दिवसांत येतो. आधी स्वत:शी मग इतरांशी बोलण्याचे भान येते. आवाजासह ही विचारांची कार्यशाळा असल्याचे निनाद काळे यांनी सांगितले.कोल्हापुरातील चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या सभागृहातील ‘आवाजाची कार्यशाळा’मध्ये निनाद काळे यांनी मार्गदर्शन केले.