शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

विस्थापित होत चाललेल्या माणसाच्या स्मृतींचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 19:07 IST

चर्चेतील व्यक्तिशी थेट संवाद माणूस त्याच्या भूतकाळ, मुळापासून, त्याच्या परंपरा, संस्कृतीपासून तसेच त्याची भाषा, त्याचे कुटुंब यापासून ते आजपर्यंत त्याने घेतलेल्या चवीपर्यंत विस्थापित होत चालला आहे. त्याचे हे विस्थापन त्याच्या स्मृतींचे आहे. - प्रा. कृष्णात खोत, साहित्यिक

ठळक मुद्देएका चक्रात अडकलेला माणूस त्यातच कसा गुरफटला जातो, याचे चित्रण

संदीप आडनाईक ।कोल्हापूर : पन्हाळ्याच्या मातीतील साहित्यिक प्रा. कृष्णात खोत यांच्या ग्रामीण जीवनातील रोजचे संघर्षाचे जिणे मांडणाऱ्या गावठाण, रौंदाळा, झडझिंबड आणि धूळमाती या कादंबºया प्रसिद्ध आहेत. त्यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीला जाहीर झालेला महाराष्ट्र फौंडेशनचा प्रतिष्ठेचा पुरस्कार १२ जानेवारी रोजी पुण्यात देण्यात येत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला हा संवाद.

प्रश्न- ग्रामीण मातीतील प्रश्न तुम्ही विषय केले, याची सुरुवात कशी झाली?उत्तर- पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या निकमवाडी या छोट्याशा खेड्यात राहणारा मी. भाताची शेती करणाºया या गावातून रोजच्या जगण्याशी संघर्ष करावा लागायचा. कोणत्याही सुविधा नसल्यामुळे शेतकऱ्यांना रोज काय हालअपेष्टा सहन कराव्या लागायच्या, ते प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले. त्यातूनच खरं तर लिखाणाची ऊर्मी मिळाली.

प्रश्न- तुमचे विषय हे प्रामुख्याने ग्रामीण आहेत, ते कसे काय सुचले?उत्तर- खेड्यांत खूप राजकारण असतं. या राजकारणावर अनेक कथानकं झाली असतील, परंतु या ग्रामीण राजकारणावर अलीकडे कोणीही लिखाण केलेले नाही. त्यामुळे ‘रौंदाळा’ या कादंबरीत गावाकडचा माणूस हा इच्छा असो की नसो, राजकारणात ओढला जातोच. मग तो कसा त्यात गुंतत जातो, मग वाद कसे होतात, याभोवती ही कादंबरी आहे. ‘गावठाण’ कादंबरीत खेड्यात जगणाºया शेतक-याला पाण्यासाठी कशा प्रकारे वणवण फिरावे लागते, याचे भेदक चित्रण आहे.

प्रश्न- रिंगाण बद्दल सांगा?उत्तर- ‘रिंंगाण’ हे ग्रामीण भागातील भयाण वास्तव आहे. एका चक्रात अडकलेला माणूस त्यातच कसा गुरफटला जातो, याचे चित्रण यात आहे. सद्य काळातील हे भाष्य आहे, असे मला वाटते.

प्रश्न- कादंबºया अनेक विद्यापीठात अभ्यासालाउत्तर - ‘गावठाण’ ही कादंबरी सोलापूर विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठात शिकवली जाते. माझ्या चारही कादंब-यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत. ‘रिंगाण’ निमित्ताने त्यावर शिक्कामोर्तब झाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर