शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकमधील उसावर बसून विश्वास पाटील आले होते खांडेकरांचा सत्कार पाहायला, कोल्हापूरच्या आठवणी

By समीर देशपांडे | Updated: September 15, 2025 12:02 IST

शाहूवाडीचे सुपुत्र, महापालिकेनेही केला होता सत्कार

समीर देशपांडेकोल्हापूर : मराठी साहित्यामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारे ‘पानिपतकार’ विश्वास पाटील हे सहावी, सातवीत असताना ज्ञानपीठ विजेत्या वि. स. खांडेकर यांच्या खासबागेतील सत्कारासाठी बांबवड्यापर्यंत चालत आणि नंतर कोल्हापूरला येणाऱ्या ट्रकमधील उसावर बसून आले होते. त्यांच्या अभिनंदनासाठी फोन केल्यानंतर त्यांनीच ही लहानपणची आठवण सांगितली आणि तो सत्कारही प्रेरणादायी ठरल्याचे सांगितले.शाहूवाडी तालुक्यातील नेरले गावच्या या सुपुत्राची सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड जाहीर झाली आणि त्यांच्या कोल्हापुरातील आठवणीही चर्चेत येऊ लागल्या आहेत. सातवीपर्यंत गावातच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण. त्यानंतर पुढचे शिक्षण शिराळा तालुक्यातील कोकरूड येथे घेतले. येथील न्यू कॉलेजमधून त्यांनी इंग्रजीची पदवी घेतली. प्राचार्य रा. कृ. कणबरकर त्यांना अध्यापनासाठी होते. त्यानंतर शिवाजी विद्यापीठातून त्यांनी एमएची पदवी संपादन केली. त्यावेळी प्रसिद्ध कन्नड लेखक डॉ. शांतीनाथ देसाई हे इंग्रजी विभागाचे प्रमुख होते.त्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत गेलेल्या पाटील यांनी सातारा येथून वकिलीचीही पदवी घेतली. सांगली जिल्ह्यात कार्यरत असताना त्यांनी धरणग्रस्तांच्या वेदना अनुभवल्या आणि त्यांच्या ‘झाडाझडती’ कादंबरीद्वारे मांडल्या. या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर उदय कुलकर्णी आणि रूपा शहा यांच्या पुढाकाराने त्यावेळी पाटील यांचा कोल्हापूर महापालिकेतर्फे सत्कारही करण्यात आला होता. जिल्ह्यातील मूळचे आजऱ्यातील असलेले मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांच्याशीही त्यांचा विशेष स्नेह होता. साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर शिवाजीदादा खूष झाले होते अशी आठवणही पाटील यांनी सांगितली आहे.माजी विद्यार्थी मेळाव्याला उपस्थितीन्यू कॉलेजच्या वतीने चार वर्षांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या माजी विद्यार्थी मेळाव्याला विश्वास पाटील आले होते. त्यावेळी बराच वेळ थांबून त्यांनी मनाेगतामध्ये सविस्तर आठवणी सांगून महाविद्यालयाला देणगीही दिली होती असे सांगण्यात आले.

ज्ञानेश्वर मुळे आणि पाटील यांचा एकत्र अभ्यासविश्वास पाटील यांनी आपल्या एका जुन्या फेसबुक पोस्टमध्ये आठवणी लिहिली आहे की, ते आणि ज्ञानेश्वर मुळे दोघे मिळून मुंबईतील डॉ. प्रमिला जरग यांच्या नायगावमधील फ्लॅटवर एकत्र अभ्यास करत होतो. आम्ही दोघेही कोल्हापूर जिल्हा परिषदेचे प्रॉडक्ट आहोत.