शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

जयसिंगपुरात ‘धर्म बचाव’साठी विराट मोर्चा

By admin | Updated: August 25, 2015 00:25 IST

हजारो जैन श्रावक-श्राविका सहभागी : राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध आंदोलन

जयसिंगपूर : सल्लेखना/संथारा व्रतावर निर्बंध घालण्याच्या निर्णयाविरुद्ध जयसिंगपुरात सोमवारी ‘धर्म बचाव आंदोलन’ करण्यात आले. राजस्थान उच्च न्यायालयाने जैन धर्माची तत्त्वे समजून न घेता ‘सल्लेखना’ म्हणजे ‘आत्महत्या’ असा निर्णय दिला आहे. तो शासनाने रद्द करावा, या मागणीप्रश्नी जैन समाजाच्यावतीने शहरातून विराट मूक मोर्चा काढून निषेध नोंदविण्यात आला. शासनाने निर्णय रद्द न केल्यास भविष्यात अहिंसेच्या मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. सुमारे एक लाख स्वाक्षऱ्यांचे निवेदन तहसीलदार सचिन गिरी यांना देण्यात आले. सोमवारी सकाळी अकरा वाजता नगराध्यक्ष सुनील पाटील-मजलेकर यांच्या हस्ते मादनाईक मळा येथून ‘धर्म बचाव आंदोलन’ मोर्चास सुरुवात झाली. ‘जीवन में तप और धर्म का मूल हैं, आत्महत्या जुर्म हैं, सल्लेखना/संथारा धर्म हैं’ सल्लेखना मरण नही, मोक्ष है, अशा आशयाचे फलक घेऊन मोर्चात श्रावक-श्राविका सहभागी झाले होते. मोर्चा आठवी गल्ली ते स्टेशन रोड, पहिली गल्ली त्यानंतर गांधी चौक ते तेराव्या गल्लीतून विक्रमसिंह क्रीडांगणावर आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी आ. उल्हास पाटील म्हणाले, सल्लेखना व्रताबाबत घेतलेला निर्णय जैन धर्मावर अन्यायकारक आहे. न्याय मिळविण्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने शासनाकडे दाद मागणार आहे. जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, जैन धर्मावर झालेल्या अन्यायाविरोधात अहिंसेच्या मार्गाने लढायचे आहे. कायद्यातील कलम रद्द व्हावे, यासाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आपण सर्वांनी संघटितपणे लढायचे आहे. जिल्हा परिषद सदस्य सावकार मादनाईक, अभयकुमार बरगाले, सुरेश चौगुले, अ‍ॅड. आप्पासाहेब पाटील, जैन कासार संघटनेचे अध्यक्ष सुभाष साळवी, आदींनी मार्गदर्शन केले. प्रारंभी नगरसेविका स्वरूपा पाटील-यड्रावकर यांनी स्वागत केले. बा. ब्र. तात्याभैया नेजकर प्रास्ताविकात म्हणाले की, याबाबत सुप्रीम कोर्टात दाद मागणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करून निर्णय रद्द करावा, अशी आमची प्रमुख मागणी आहे. रॅलीचे संयोजन आध्यात्मिक पावन वर्षायोग समितीच्यावतीने सागर मादनाईक, राजू नरदे, लोहीकांत खोत, आदिनाथ मादनाईक, प्रेमजित पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले होते. मोर्चात श्वेतांबर, तेरापंथी, स्थानकवासी समाजाचे प्रतिनिधी, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील तसेच कर्नाटक सीमाभागातील हजारो श्रावक-श्राविका सहभागी झाले होते. सूत्रसंचालन अभयकुमार भिलवडे यांनी केले, तर प्रदीप सूर्यवंशी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)