शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: गळफासासाठी वापरलेली साडी आणि पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का?
2
सैनिकांचे मृतदेह, युद्धकैद्यांची अदलाबदल,...; रशिया-युक्रेन यांच्या शांतता बैठकीत काय ठरलं?
3
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
4
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
5
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
6
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
7
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
8
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
9
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
10
Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद
11
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
12
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
13
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
15
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला
16
Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…"
17
रिंकू सिंहची होणारी पत्नी खासदार, किती आहे तिची संपत्ती...; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...
18
सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले
19
शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला; सोनम अद्याप बेपत्ताच...
20
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव

वाहतूक नियमांचे उल्लंघन, होईल लायसन्सचे निलंबन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : वाहतूक नियमांचा भंग केल्यास दंडाचा फटका बसतोच;पण किरकोळ दंड भरून सुटका करता येते, अशा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : वाहतूक नियमांचा भंग केल्यास दंडाचा फटका बसतोच;पण किरकोळ दंड भरून सुटका करता येते, अशा भ्रमात असाल तर सावधान...! कारण वारंवार अशापध्दतीने सुटका करणाऱ्यांचे लायसन्स रद्द होऊ शकते. गेल्या साडेचार वर्षांत तब्बल ५८ जणांना प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत लायसन्स निलंबित करून झटका दिला आहे. याशिवाय अनेकांचे प्रस्ताव आरटीओ कार्यालयाकडे प्रलंबित आहेत. त्यामुळे दंड भरल्यानंतर सुटका करता येते, हा भ्रम प्रत्येक वाहनचालकाने काढून टाकला पाहिजे.

परिवहन कार्यालयाने रस्त्यावर वाहन चालविणाऱ्यांसाठी नियमावली ठरवून दिलेली आहे. आजची तरुण पिढी या नियमांचा अनेकवेळा भंग करताना दिसून येत आहे. वाहन चालविणाऱ्यांबरोबरच समोरील व्यक्तीच्या सुरक्षेसाठीच हे नियम आहेत. अनेक वाहनधारकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने त्यात निष्पाप व्यक्तींचा बळी गेल्याच्या तसेच दुखापतीच्याही घटना आहेत. अशा घटना टाळण्यासाठी वाहतूक नियम मोडणाऱ्यांना वाहतूक पोलीस व आरटीओ कार्यालयामार्फत कडक शासन केले जाते. वाहतुकीचे वारंवार नियम तोडणाऱ्यांचे लायसन्स तीन महिन्यांसाठी रद्द करण्याचा प्रस्ताव हा वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत पाठवला जातो. त्यावर आरटीओ अधिकारी अंतिम निर्णय घेतात.

वर्ष : लायसन्स निलंबन संख्या

२०१८ : १६

२०१९ : २०

२०२० : ०८

२०२१ (ऑगस्टपर्यंत) : १४

हे नियम मोडल्यास लायसन्स निलंबन

- अतिवेग : वाहनात क्षमतेपेक्षा जादा प्रवासी बसवून त्यांच्या अगर समोरुन येणाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण केल्यास तसेच अतिवेगाने वाहन चालवल्यास.

- मद्यप्राशन : अंमली पदार्थांसह मद्यप्राशन करून वाहन चालविल्यास.

- सिग्नल जंपिंग : सिग्नल तोडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास.

- मोबाईलवर बोलत वाहन चालवणे : मोबाईलवर बोलत असतानाच वाहन चालविणे हा गुन्हा आहे.

- प्रवासी वाहतूक : मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करत असल्यास.

आधी तीन महिने नंतर कायमचे...

वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांचे लायसन्स तीन महिन्यांसाठी रद्द करण्याचा प्रस्ताव हा वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत आरटीओ कार्यालयास पाठवला जातो, पण वारंवार नियम जाणूनबुजून तोडत असल्यास त्याचे लायसन्स कायमचे रद्द करण्याचा अधिकार हा आरटीओ कार्यालयास आहे.

अशी होते कारवाई...

वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यास प्रत्येकवेळी दंडात्मक कारवाई होते. त्यानंतर दंड भरून वाहन सोडले जाते; पण नंतर वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीचे लायसन्स रद्द करण्याचा प्रस्ताव वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत आरटीओला पाठवला जातो. त्यानंतरच त्या वाहनधारकाचे लायसन्स निलंबन करण्यावर शिक्कामोर्तब केले जाते.

कोट..

वाहतुकीचे नियम हे स्वत:च्या व इतरांच्या सुरक्षेसाठी पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. किरकोळ दंड भरून सुटका करून घेण्याची चूक कधीतरी कोणाच्यातरी जिवावर बेतण्याची शक्यता असते. प्रत्येक वाहनधारकाने वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. - स्नेहा गिरी, पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, कोल्हापूर शहर