शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

वाहतूक नियमांचे उल्लंघन, होईल लायसन्सचे निलंबन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : वाहतूक नियमांचा भंग केल्यास दंडाचा फटका बसतोच;पण किरकोळ दंड भरून सुटका करता येते, अशा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : वाहतूक नियमांचा भंग केल्यास दंडाचा फटका बसतोच;पण किरकोळ दंड भरून सुटका करता येते, अशा भ्रमात असाल तर सावधान...! कारण वारंवार अशापध्दतीने सुटका करणाऱ्यांचे लायसन्स रद्द होऊ शकते. गेल्या साडेचार वर्षांत तब्बल ५८ जणांना प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत लायसन्स निलंबित करून झटका दिला आहे. याशिवाय अनेकांचे प्रस्ताव आरटीओ कार्यालयाकडे प्रलंबित आहेत. त्यामुळे दंड भरल्यानंतर सुटका करता येते, हा भ्रम प्रत्येक वाहनचालकाने काढून टाकला पाहिजे.

परिवहन कार्यालयाने रस्त्यावर वाहन चालविणाऱ्यांसाठी नियमावली ठरवून दिलेली आहे. आजची तरुण पिढी या नियमांचा अनेकवेळा भंग करताना दिसून येत आहे. वाहन चालविणाऱ्यांबरोबरच समोरील व्यक्तीच्या सुरक्षेसाठीच हे नियम आहेत. अनेक वाहनधारकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने त्यात निष्पाप व्यक्तींचा बळी गेल्याच्या तसेच दुखापतीच्याही घटना आहेत. अशा घटना टाळण्यासाठी वाहतूक नियम मोडणाऱ्यांना वाहतूक पोलीस व आरटीओ कार्यालयामार्फत कडक शासन केले जाते. वाहतुकीचे वारंवार नियम तोडणाऱ्यांचे लायसन्स तीन महिन्यांसाठी रद्द करण्याचा प्रस्ताव हा वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत पाठवला जातो. त्यावर आरटीओ अधिकारी अंतिम निर्णय घेतात.

वर्ष : लायसन्स निलंबन संख्या

२०१८ : १६

२०१९ : २०

२०२० : ०८

२०२१ (ऑगस्टपर्यंत) : १४

हे नियम मोडल्यास लायसन्स निलंबन

- अतिवेग : वाहनात क्षमतेपेक्षा जादा प्रवासी बसवून त्यांच्या अगर समोरुन येणाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण केल्यास तसेच अतिवेगाने वाहन चालवल्यास.

- मद्यप्राशन : अंमली पदार्थांसह मद्यप्राशन करून वाहन चालविल्यास.

- सिग्नल जंपिंग : सिग्नल तोडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास.

- मोबाईलवर बोलत वाहन चालवणे : मोबाईलवर बोलत असतानाच वाहन चालविणे हा गुन्हा आहे.

- प्रवासी वाहतूक : मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करत असल्यास.

आधी तीन महिने नंतर कायमचे...

वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांचे लायसन्स तीन महिन्यांसाठी रद्द करण्याचा प्रस्ताव हा वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत आरटीओ कार्यालयास पाठवला जातो, पण वारंवार नियम जाणूनबुजून तोडत असल्यास त्याचे लायसन्स कायमचे रद्द करण्याचा अधिकार हा आरटीओ कार्यालयास आहे.

अशी होते कारवाई...

वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यास प्रत्येकवेळी दंडात्मक कारवाई होते. त्यानंतर दंड भरून वाहन सोडले जाते; पण नंतर वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीचे लायसन्स रद्द करण्याचा प्रस्ताव वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत आरटीओला पाठवला जातो. त्यानंतरच त्या वाहनधारकाचे लायसन्स निलंबन करण्यावर शिक्कामोर्तब केले जाते.

कोट..

वाहतुकीचे नियम हे स्वत:च्या व इतरांच्या सुरक्षेसाठी पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. किरकोळ दंड भरून सुटका करून घेण्याची चूक कधीतरी कोणाच्यातरी जिवावर बेतण्याची शक्यता असते. प्रत्येक वाहनधारकाने वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. - स्नेहा गिरी, पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, कोल्हापूर शहर