शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

विविध मागण्यांसाठी २३ हजार ग्रामसेवकांचे काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 11:00 IST

ग्रामसेवकांनी विविध आठ मागण्यांसाठी ९ आॅगस्टपासून कामबंद आंदोलन सुरू केल्याने राज्याचा गावगाडा ठप्प झाला आहे. गेले चार वर्षे ग्रामविकास मंत्र्यांकडून आश्वासनापलिकडे काहीच पदरात न पडल्याने ग्रामसेवक संघटना आक्रमक झाली असून, राज्यातील २३ हजार ३६८ ग्रामसेवकांंनी असहकार आंदोलन छेडले आहे.

ठळक मुद्देविविध मागण्यांसाठी २३ हजार ग्रामसेवकांचे काम बंदराज्याचा गावगाडा ठप्प, सरकारकडून पदरी निराशाच

कोल्हापूर : ग्रामसेवकांनी विविध आठ मागण्यांसाठी ९ आॅगस्टपासून कामबंद आंदोलन सुरू केल्याने राज्याचा गावगाडा ठप्प झाला आहे. गेले चार वर्षे ग्रामविकास मंत्र्यांकडून आश्वासनापलिकडे काहीच पदरात न पडल्याने ग्रामसेवक संघटना आक्रमक झाली असून, राज्यातील २३ हजार ३६८ ग्रामसेवकांंनी असहकार आंदोलन छेडले आहे.शासन व नागरिक यांच्यामधील महत्त्वाचा दुवा म्हणून ग्रामसेवक गावोगावी काम करतात. गावच्या विकासात स्थानिक लोकप्रतिनिधींबरोबरच ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वाची ठरते. ग्रामसेवकांच्या आठ मागण्या आहेत, त्यापैकी महत्त्वाच्या म्हणजे, ग्रामसेवक पद रद्द करून, ग्रामविकास अधिकारी पदाचा दर्जा द्यावा, प्रवास भत्ता रकमेत वाढ करावी, या दोन प्रमुख मागण्या आहेत.

आघाडी सरकारच्या काळातही याबाबत बैठक होऊन ग्रामविकास अधिकारी दर्जास मान्यता देऊन पुढील कार्यवाहीसाठी पाठविले होते. युतीचे सरकार आल्यानंतर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे पाठपुरावा केला; पण आश्वासनापलिकडे पदरात काहीच पडले नाही; त्यामुळे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाच्या वतीने कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला. ९ आॅगस्टपासून राज्यातील सुमारे २३ हजार ग्रामसेवकांनी असहकार आंदोलन सुरू केल्याने राज्याचा गावगाडा एकदम ठप्प झाला आहे.पूरस्थितीमुळे कोल्हापूर, सांगलीत काम सुरूआॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत आलेल्या महापुराने जनजीवन विस्कळीत झाले होते. पूरग्रस्तांना मदतीसाठी या दोन जिल्ह्यांतील ग्रामसेवकांचे काम सुरू आहे.

गेले अनेक वर्षे विविध मागण्या ग्रामसेवक शासन दरबारी मांडत आहे. पण करूया, करणार यापलिकडे काहीच पदरात न पडल्याने नाईलाजास्तव कामबंद आंदोलन करावे लागले. जोपर्यंत शासन मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत असहकार आंदोलन सुरूच राहील.- के. आर. किरूळकर,सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतkolhapurकोल्हापूर