शहरं
Join us  
Trending Stories
1
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
2
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
3
आपल्यापेक्षा ५० वर्ष लहान तरुणीशी लग्न अन् अफवांचा बाजार; १.६ कोटींचा हुंड्याचा चेक बनावट निघाला, फोटोग्राफरचे पैसे न देताच...
4
वर्दीतली माणुसकी! एकही पणती विकली गेली नाही; पोलिसांनी 'असं' आणलं आजीच्या चेहऱ्यावर हसू
5
Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश
6
खळबळजनक! भावाची किडनी फेल, बहीण बनली चोर; नवऱ्याच्या घरात मारला ३० लाखांचा डल्ला
7
आई-वडिलांची उपेक्षा केल्यास पगारातून १५% रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार, 'हे' राज्य आणणार कायदा
8
रॉकेट सायन्स...! इतर सर्व फटाके जमिनीवरच फुटतात...मग रॉकेटच का जाते आकाशात? विचार करा, मुलांनाही सांगा...
9
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
10
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
11
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
12
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
13
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
14
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
16
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
17
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
18
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
19
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
20
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास

कालव्याच्या पाण्यासाठी सीमाभागातील गावे तहानलेली

By admin | Updated: May 7, 2015 00:19 IST

शेतकऱ्यांतून संताप : निकृष्ट दर्जाचे काम; सहा वर्षांपासून एकदाही पाणी नाही, सरकारने कोट्यवधी रुपये खर्चूनही उपयोग नाही

राजेंद्र हजारे - निपाणी --सीमाभागातील शेतकऱ्यांना पाटबंधारे खात्यातर्फे कालव्यांद्वारे पाणी देण्याची योजना सरकारने राबविली. निढोरी कालव्यातून येणाऱ्या पाण्यामुळे ४,५४१ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार होती. त्यासाठी बेनाडी, शिवापूरवाडी, आप्पाचीवाडी, सौंदलगा, कुर्ली गावांमध्ये २००८साली कालव्यांचे काम पूर्ण झाले. परंतु, सहा वर्षांपासून एकदाही कालव्यात पाणी आले नाही. बांधकाम निकृष्ट झाल्यानेच कालव्याच्या पाण्यासाठी सीमाभागातील गावे आसुसलेली आहेत.कागल तालुक्यातील चिखली बंधाऱ्यातून वेदगंगा नदी तिरावरील हदनाळ, म्हाकवे, आप्पाचीवाडी, भाट नांगनूर, कुर्ली, सौंदलगा, आडी, बेनाडी, कन्नूरपर्यंत २५ किलोमीटर अंतराचा निढोरी शाखा कालवा आहे. त्यासाठी चिकोडी तालुक्यातील २१ किलोमीटर, तर कागल तालुक्यातील म्हाकवे गावातून ४ किलोमीटरचा कालवा तयार झाला. त्याची खोली आठ फुटांवर ठेवण्यात आली असून, गरजेनुसार त्याची उंची कमी-जास्त करण्यात आली आहे. कालव्यासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये देण्यात येणार होते, पण भरपाईची रक्कम अजून बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेली नाही.मुख्य कालव्याबरोबर १२ उपकालव्यांची निर्मिती करण्यात आली आहे. वेदगंगा नदीला जोडणारे उपकालवे निर्माण केल्याने अतिरिक्त पाणी वाया न जाता नदीद्वारे पुढील शेतकऱ्यांना मिळण्याची योजनासुद्धा आखली आहे. हदनाळ येथे १.२६ कि.मी., म्हाकवे ४ कि.मी. भाटनांगनूर-आप्पाचीवाडी ६, कुर्ली ४, कुर्ली-सौंदलगा ३, सौंदलगा ५, आडी आणि बेनाडी प्रत्येकी ३ कि.मी., बेनाडी ते शिवापूरवाडीपर्यंत १३ कि.मी.चा उपकालवा तयार आहे. अनेक ठिकाणी कालव्याला भगदाड पडले आहे, तर काही ठिकाणी कालव्यांच्या भिंती कोसळल्या आहेत. सहा वर्षांतून एकदाही पाणी न आल्याने पिचिंगमधून झाडे-झुडपे उगवली आहेत. सरकारने कोट्यवधी रुपये खर्चूनही कालव्यांच्या पाण्यापासून शेतकरी अलिप्तच आहेत. त्यामुळे शासनाचा निधी पूर्णपणे वाया गेला आहे. यापूर्वी निढोरी कालव्यातून म्हाकवेपर्यंत पाणी पोहोचले होते, पण त्याचा वेग आणि दाब कमी होत गेल्याने कुर्ली, सौंदलगापर्यंतच पाणी आले. मात्र, बेनाडी, आडी, कन्नूर भागापर्यंत ते पाणीच कधीच पोहोचले नाही. परिणामी, माळभागातील शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.कालव्यांच्या निर्मितीनंतर दोनवेळा पाण्याची चाचणी घेतली; पण पाणी पुढे सरकण्यासाठी योग्य त्या उपाययोजना झाल्या नाहीत. केवळ पाटबंधारे खात्याच्या दुर्लक्षामुळेच कालवे ओस पडले आहेत.- रायगोंडा पाटील, शेतकरी, बेनाडी.