शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

कालव्याच्या पाण्यासाठी सीमाभागातील गावे तहानलेली

By admin | Updated: May 7, 2015 00:19 IST

शेतकऱ्यांतून संताप : निकृष्ट दर्जाचे काम; सहा वर्षांपासून एकदाही पाणी नाही, सरकारने कोट्यवधी रुपये खर्चूनही उपयोग नाही

राजेंद्र हजारे - निपाणी --सीमाभागातील शेतकऱ्यांना पाटबंधारे खात्यातर्फे कालव्यांद्वारे पाणी देण्याची योजना सरकारने राबविली. निढोरी कालव्यातून येणाऱ्या पाण्यामुळे ४,५४१ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार होती. त्यासाठी बेनाडी, शिवापूरवाडी, आप्पाचीवाडी, सौंदलगा, कुर्ली गावांमध्ये २००८साली कालव्यांचे काम पूर्ण झाले. परंतु, सहा वर्षांपासून एकदाही कालव्यात पाणी आले नाही. बांधकाम निकृष्ट झाल्यानेच कालव्याच्या पाण्यासाठी सीमाभागातील गावे आसुसलेली आहेत.कागल तालुक्यातील चिखली बंधाऱ्यातून वेदगंगा नदी तिरावरील हदनाळ, म्हाकवे, आप्पाचीवाडी, भाट नांगनूर, कुर्ली, सौंदलगा, आडी, बेनाडी, कन्नूरपर्यंत २५ किलोमीटर अंतराचा निढोरी शाखा कालवा आहे. त्यासाठी चिकोडी तालुक्यातील २१ किलोमीटर, तर कागल तालुक्यातील म्हाकवे गावातून ४ किलोमीटरचा कालवा तयार झाला. त्याची खोली आठ फुटांवर ठेवण्यात आली असून, गरजेनुसार त्याची उंची कमी-जास्त करण्यात आली आहे. कालव्यासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये देण्यात येणार होते, पण भरपाईची रक्कम अजून बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेली नाही.मुख्य कालव्याबरोबर १२ उपकालव्यांची निर्मिती करण्यात आली आहे. वेदगंगा नदीला जोडणारे उपकालवे निर्माण केल्याने अतिरिक्त पाणी वाया न जाता नदीद्वारे पुढील शेतकऱ्यांना मिळण्याची योजनासुद्धा आखली आहे. हदनाळ येथे १.२६ कि.मी., म्हाकवे ४ कि.मी. भाटनांगनूर-आप्पाचीवाडी ६, कुर्ली ४, कुर्ली-सौंदलगा ३, सौंदलगा ५, आडी आणि बेनाडी प्रत्येकी ३ कि.मी., बेनाडी ते शिवापूरवाडीपर्यंत १३ कि.मी.चा उपकालवा तयार आहे. अनेक ठिकाणी कालव्याला भगदाड पडले आहे, तर काही ठिकाणी कालव्यांच्या भिंती कोसळल्या आहेत. सहा वर्षांतून एकदाही पाणी न आल्याने पिचिंगमधून झाडे-झुडपे उगवली आहेत. सरकारने कोट्यवधी रुपये खर्चूनही कालव्यांच्या पाण्यापासून शेतकरी अलिप्तच आहेत. त्यामुळे शासनाचा निधी पूर्णपणे वाया गेला आहे. यापूर्वी निढोरी कालव्यातून म्हाकवेपर्यंत पाणी पोहोचले होते, पण त्याचा वेग आणि दाब कमी होत गेल्याने कुर्ली, सौंदलगापर्यंतच पाणी आले. मात्र, बेनाडी, आडी, कन्नूर भागापर्यंत ते पाणीच कधीच पोहोचले नाही. परिणामी, माळभागातील शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.कालव्यांच्या निर्मितीनंतर दोनवेळा पाण्याची चाचणी घेतली; पण पाणी पुढे सरकण्यासाठी योग्य त्या उपाययोजना झाल्या नाहीत. केवळ पाटबंधारे खात्याच्या दुर्लक्षामुळेच कालवे ओस पडले आहेत.- रायगोंडा पाटील, शेतकरी, बेनाडी.