शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांनी ‘सीईपीटी’चे काम बंद पाडले

By admin | Updated: September 2, 2014 00:02 IST

पोकलॅनच्या मोडतोडीचा प्रयत्न : प्रदूषित पाण्याचा गंभीर विषय

हुपरी : हुपरी पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतून बाहेर पडणाऱ्या प्रदूषित पाण्याला वैतागलेल्या तळंदगे ग्रामपंचायतीने ‘सीईपीटी’ प्रकल्पाच्या तरसरीबरोबर विस्तारीकरणाचे सुरू असलेले काम बंद पाडले. विस्तारीकरणाचे ठेकेदार आणि सरपंच मंगल वाघमोडे, उपसरपंच राजू हवालदार, तसेच ग्रामपंचायत सदस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वादावादी झाली. यावेळी पोकलॅन मशीनची मोडतोड करण्याचा प्रयत्न झाल्याने पोकलॅन चालकाने घाबरून मशीनसह पळ काढला. प्रदूषित पाण्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावून तळंदगे ग्रामस्थांची डोकेदुखी थांबल्याशिवाय तरसरी प्रकल्पाचे विस्तारीकरण आम्ही होऊ देणार नाही, असा इशारा यावेळी ग्रामपंचायतीच्यावतीने देण्यात आला.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पंचतारांकित औद्योगिक वसाहतीच्या ‘सीईपीटी’ प्रकल्पातून कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता प्रदूषित पाणी तळंदगे गावाच्या ओढ्यात सोडण्यात येते. परिणामी, या पाण्यामुळे गावातील विहिरी, बोअरवेल, ओढे यांच्यातील पाणीही प्रदूषित होऊन ग्रामस्थांबरोबरच जनावरांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. ओढा परिसरातील जमीनही नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे, असा तळंदगे, इंगळी ग्रामस्थांचा आरोप आहे. याप्रश्नी वेळोवेळी रस्त्यावर उतरून आंदोलनेही करण्यात आली आहेत. लोकप्रतिनिधींचे पाठबळ आंदोलनकर्त्यांना मिळत नसल्याने ग्रामस्थांच्या आक्रोशाला औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी व उद्योगपती भीक घालत नाहीत. गावच्या ओढ्यात प्रदूषित पाण्याची मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढच होत आहे. त्यामुळे ग्रामस्थ अक्षरश: वैतागलेले आहेत. ‘सीईपीटी’ प्रकल्पालगत असणाऱ्या सुमारे ४३ एकर शासकीय गायरानामध्ये सीईपीटी प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या प्रदूषित पाण्यावर ‘रिसायकल’ पद्धतीने प्रक्रिया करणाऱ्या ‘तरसरी’ विस्तारीकरणाच्या कामास पोकलॅन मशीनद्वारे सुरुवात केली होती. याबाबतची माहिती समजताच सरपंच मंगल वाघमोडे, उपसरपंच राजू हवालदार यांच्यासह सर्व सदस्य, कर्मचारी प्रकल्पस्थळी आले व त्यांनी काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी ठेकेदारांचे कर्मचारी व ग्रामस्थांमध्ये जोरदार वादावादी झाली. संतप्त ग्रामस्थांनी पोकलॅन मशीनची मोडतोड करण्याचा प्रयत्न करताच पोकलॅन चालकाने मशीनसह पळ काढला.विस्तारीकरणास विरोध राहणारच : वाघमोडेयाबाबत सरपंच वाघमोडे व उपसरपंच हवालदार म्हणाले, प्रदूषित पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता प्रदूषित पाणी गावाच्या ओढ्यात सोडण्यात येते. त्यामुळे संपूर्ण गावाची डोकेदुखी होऊन बसली आहे. त्यावर कायमस्वरूपी मार्ग काढावा, अशी मागणी होऊनही या मागणीकडे दुर्लक्ष करून ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारची माहिती किंवा पूर्व परवानगी न घेता विस्तारीकरणाच्या कामास बेकायदेशीररीत्या सुरुवात केली आहे. या विस्तारीकरणाला आमचा विरोध राहणार आहे.