शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

ग्रामस्थांनी ‘सीईपीटी’चे काम बंद पाडले

By admin | Updated: September 2, 2014 00:02 IST

पोकलॅनच्या मोडतोडीचा प्रयत्न : प्रदूषित पाण्याचा गंभीर विषय

हुपरी : हुपरी पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतून बाहेर पडणाऱ्या प्रदूषित पाण्याला वैतागलेल्या तळंदगे ग्रामपंचायतीने ‘सीईपीटी’ प्रकल्पाच्या तरसरीबरोबर विस्तारीकरणाचे सुरू असलेले काम बंद पाडले. विस्तारीकरणाचे ठेकेदार आणि सरपंच मंगल वाघमोडे, उपसरपंच राजू हवालदार, तसेच ग्रामपंचायत सदस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वादावादी झाली. यावेळी पोकलॅन मशीनची मोडतोड करण्याचा प्रयत्न झाल्याने पोकलॅन चालकाने घाबरून मशीनसह पळ काढला. प्रदूषित पाण्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावून तळंदगे ग्रामस्थांची डोकेदुखी थांबल्याशिवाय तरसरी प्रकल्पाचे विस्तारीकरण आम्ही होऊ देणार नाही, असा इशारा यावेळी ग्रामपंचायतीच्यावतीने देण्यात आला.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पंचतारांकित औद्योगिक वसाहतीच्या ‘सीईपीटी’ प्रकल्पातून कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता प्रदूषित पाणी तळंदगे गावाच्या ओढ्यात सोडण्यात येते. परिणामी, या पाण्यामुळे गावातील विहिरी, बोअरवेल, ओढे यांच्यातील पाणीही प्रदूषित होऊन ग्रामस्थांबरोबरच जनावरांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. ओढा परिसरातील जमीनही नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे, असा तळंदगे, इंगळी ग्रामस्थांचा आरोप आहे. याप्रश्नी वेळोवेळी रस्त्यावर उतरून आंदोलनेही करण्यात आली आहेत. लोकप्रतिनिधींचे पाठबळ आंदोलनकर्त्यांना मिळत नसल्याने ग्रामस्थांच्या आक्रोशाला औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी व उद्योगपती भीक घालत नाहीत. गावच्या ओढ्यात प्रदूषित पाण्याची मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढच होत आहे. त्यामुळे ग्रामस्थ अक्षरश: वैतागलेले आहेत. ‘सीईपीटी’ प्रकल्पालगत असणाऱ्या सुमारे ४३ एकर शासकीय गायरानामध्ये सीईपीटी प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या प्रदूषित पाण्यावर ‘रिसायकल’ पद्धतीने प्रक्रिया करणाऱ्या ‘तरसरी’ विस्तारीकरणाच्या कामास पोकलॅन मशीनद्वारे सुरुवात केली होती. याबाबतची माहिती समजताच सरपंच मंगल वाघमोडे, उपसरपंच राजू हवालदार यांच्यासह सर्व सदस्य, कर्मचारी प्रकल्पस्थळी आले व त्यांनी काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी ठेकेदारांचे कर्मचारी व ग्रामस्थांमध्ये जोरदार वादावादी झाली. संतप्त ग्रामस्थांनी पोकलॅन मशीनची मोडतोड करण्याचा प्रयत्न करताच पोकलॅन चालकाने मशीनसह पळ काढला.विस्तारीकरणास विरोध राहणारच : वाघमोडेयाबाबत सरपंच वाघमोडे व उपसरपंच हवालदार म्हणाले, प्रदूषित पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता प्रदूषित पाणी गावाच्या ओढ्यात सोडण्यात येते. त्यामुळे संपूर्ण गावाची डोकेदुखी होऊन बसली आहे. त्यावर कायमस्वरूपी मार्ग काढावा, अशी मागणी होऊनही या मागणीकडे दुर्लक्ष करून ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारची माहिती किंवा पूर्व परवानगी न घेता विस्तारीकरणाच्या कामास बेकायदेशीररीत्या सुरुवात केली आहे. या विस्तारीकरणाला आमचा विरोध राहणार आहे.