शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! कंधार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
3
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
4
"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी
5
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
6
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!
7
Swami Samartha: स्वामींची निरपेक्ष सेवा केलीत तर 'या' दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळणारच!
8
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
9
पाकिस्तानच्या शेअर बाजारात भूकंप! कराची बाजारातील व्यवहार अचानक बंद; नेमकं काय घडलं?
10
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
11
२००० किमी प्रवास, आळीपाळीने चालवत होते कार; एका डुलकीनं थांबवला ६ जणांच्या आयुष्याचा प्रवास
12
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
13
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
14
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
15
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
16
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
17
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
18
Rohit Sharma Retires: 'आई, माझं स्वप्न भंगलं' रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर ढसाढसा रडली तरुणी, व्हिडीओ व्हायरल
19
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
20
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई

ग्रामस्थांनी ‘सीईपीटी’चे काम बंद पाडले

By admin | Updated: September 2, 2014 00:02 IST

पोकलॅनच्या मोडतोडीचा प्रयत्न : प्रदूषित पाण्याचा गंभीर विषय

हुपरी : हुपरी पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतून बाहेर पडणाऱ्या प्रदूषित पाण्याला वैतागलेल्या तळंदगे ग्रामपंचायतीने ‘सीईपीटी’ प्रकल्पाच्या तरसरीबरोबर विस्तारीकरणाचे सुरू असलेले काम बंद पाडले. विस्तारीकरणाचे ठेकेदार आणि सरपंच मंगल वाघमोडे, उपसरपंच राजू हवालदार, तसेच ग्रामपंचायत सदस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वादावादी झाली. यावेळी पोकलॅन मशीनची मोडतोड करण्याचा प्रयत्न झाल्याने पोकलॅन चालकाने घाबरून मशीनसह पळ काढला. प्रदूषित पाण्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावून तळंदगे ग्रामस्थांची डोकेदुखी थांबल्याशिवाय तरसरी प्रकल्पाचे विस्तारीकरण आम्ही होऊ देणार नाही, असा इशारा यावेळी ग्रामपंचायतीच्यावतीने देण्यात आला.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पंचतारांकित औद्योगिक वसाहतीच्या ‘सीईपीटी’ प्रकल्पातून कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता प्रदूषित पाणी तळंदगे गावाच्या ओढ्यात सोडण्यात येते. परिणामी, या पाण्यामुळे गावातील विहिरी, बोअरवेल, ओढे यांच्यातील पाणीही प्रदूषित होऊन ग्रामस्थांबरोबरच जनावरांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. ओढा परिसरातील जमीनही नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे, असा तळंदगे, इंगळी ग्रामस्थांचा आरोप आहे. याप्रश्नी वेळोवेळी रस्त्यावर उतरून आंदोलनेही करण्यात आली आहेत. लोकप्रतिनिधींचे पाठबळ आंदोलनकर्त्यांना मिळत नसल्याने ग्रामस्थांच्या आक्रोशाला औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी व उद्योगपती भीक घालत नाहीत. गावच्या ओढ्यात प्रदूषित पाण्याची मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढच होत आहे. त्यामुळे ग्रामस्थ अक्षरश: वैतागलेले आहेत. ‘सीईपीटी’ प्रकल्पालगत असणाऱ्या सुमारे ४३ एकर शासकीय गायरानामध्ये सीईपीटी प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या प्रदूषित पाण्यावर ‘रिसायकल’ पद्धतीने प्रक्रिया करणाऱ्या ‘तरसरी’ विस्तारीकरणाच्या कामास पोकलॅन मशीनद्वारे सुरुवात केली होती. याबाबतची माहिती समजताच सरपंच मंगल वाघमोडे, उपसरपंच राजू हवालदार यांच्यासह सर्व सदस्य, कर्मचारी प्रकल्पस्थळी आले व त्यांनी काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी ठेकेदारांचे कर्मचारी व ग्रामस्थांमध्ये जोरदार वादावादी झाली. संतप्त ग्रामस्थांनी पोकलॅन मशीनची मोडतोड करण्याचा प्रयत्न करताच पोकलॅन चालकाने मशीनसह पळ काढला.विस्तारीकरणास विरोध राहणारच : वाघमोडेयाबाबत सरपंच वाघमोडे व उपसरपंच हवालदार म्हणाले, प्रदूषित पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता प्रदूषित पाणी गावाच्या ओढ्यात सोडण्यात येते. त्यामुळे संपूर्ण गावाची डोकेदुखी होऊन बसली आहे. त्यावर कायमस्वरूपी मार्ग काढावा, अशी मागणी होऊनही या मागणीकडे दुर्लक्ष करून ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारची माहिती किंवा पूर्व परवानगी न घेता विस्तारीकरणाच्या कामास बेकायदेशीररीत्या सुरुवात केली आहे. या विस्तारीकरणाला आमचा विरोध राहणार आहे.