शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
6
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
7
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
8
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
9
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
10
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
11
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
12
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
13
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
14
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
15
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
16
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
18
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
19
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
20
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
Daily Top 2Weekly Top 5

गावच्या कारभाऱ्यांना अभ्यास सहलीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:16 IST

भारत पाटील ग्रामीण विकासाचा भविष्यकालीन वेध घेण्यासाठी व गावागावांनुसार ‘परिपूर्ण व शाश्वत विकास करण्यासाठी’ जिल्हा परिषद, पंचायत समिती व ...

भारत पाटीलग्रामीण विकासाचा भविष्यकालीन वेध घेण्यासाठी व गावागावांनुसार ‘परिपूर्ण व शाश्वत विकास करण्यासाठी’ जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत या संस्थांमधील कार्यरत असणाºया लोकप्रतिनिधींची क्षमता बांधणी आवश्यक आहे. यासाठी प्रभावी प्रशिक्षणाबरोबरच अभ्यास सहली आयोजित करणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींना आपले अधिकार, कर्तव्य व जबाबदारीची जाणीव होणे अपेक्षित आहे. विविध राज्यांमधील अनेक ठिकाणी मार्गदर्शक काम झाले आहे. यामध्ये काही जिल्हा परिषद व काही पंचायत समित्यांनी पारदर्शक व आदर्श काम केले आहे. काही सरपंचांनी आपले कर्तव्य उत्तम पद्धतीने निभावले आहे. त्यांनी आपली गावे शाश्वत विकासाची जिवंत उदाहरणे देशासमोर उभी केली आहेत. यामध्ये साताºयातील कोरेगाव, अहमदनगरमधील हिवरे बाजार व राळेगणसिद्धी, चंद्रपूरमधील राजगड, नांदेडमधील शेळगाव, अशा अनेक मार्गदर्शक गावांची नावे घेता येतील.लोकहिताची कामे ज्या गाव व परिसरात यशस्वी झाली आहेत, अशी गावे माझ्या तालुक्यातील पंचायत समिती सदस्यांना, सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांना दाखविली पाहिजेत, असे मला वाटत होते. पोपटराव पवार यांनी हिवरे बाजार गाव कसं घडवलं असेल? लोकसहभाग कसा मिळविला असेल? असे प्रश्न मला पडत. या गावांची यशोगाथा समजून घ्यायची तर गावच्या कारभाऱ्यांना अभ्यास सहलीचे आयोजन केले पाहिजे, अशी माझी भावना तयार झाली होती. २००३-०४च्या पंचायत समिती अंदाजपत्रकात सहलीसाठी निधीची तरतूद केली होती. मला अभिमान वाटतो, कारण देशातील पन्हाळा पंचायत समिती एकमेव असा विचार करणारी होती. कारण बाहेरच्या परिसरामध्ये जिथे-तिथे आदर्श व ग्रामविकासातील रोल मॉडेल कामं झाली आहेत, ती गावे आपल्या तालुक्यातील लोकप्रतिनिधींना दाखविण्यासाठी सहलीचे नियोजन करणे गरजेचे होते.पहिल्या अभ्यास दौºयाविषयी सर्व अधिकारी व पदाधिकाºयांशी संवाद करत असताना सर्वांच्या मतानुसार आम्ही यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी (यशदा), अण्णा हजारेंची राळेगणसिद्धी व पोपटराव पवारांचे हिवरेबाजार या सहलीचे आयोजन केले होते. यावेळी ग्रामीण विकासाला दिशा देण्याचं काम यशदासारखी संस्था करते, हे माझ्यासह तालुक्यातील सरपंचांना प्रथमच समजले होते. ‘यशदा’चा सुशोभित कॅम्पस बघून आम्ही भारावलो होतो. त्यावेळीच मी मनात एक निश्चय केला होता की, एक दिवस पन्हाळ्यातील सर्व सरपंचांसाठी निवासी प्रशिक्षण आयोजित करणाार. राळेगणसिद्धीच्या भेटीत अण्णा हजारेंचा जीवनप्रवास समजून घेता आला. गावांचा विकास लोकसहभागातूनच होऊ शकतो. ग्रामसभा सक्षम झाल्या तरच गावं सक्षम होतील. तरुणांना व महिलांना विकास प्रवाहात आणताना आपली गावे व्यसनमुक्त झाली पाहिजेत, ही अण्णांची शिकवण माझ्या तालुक्यातील सर्व सरपंचांना मिळाली होती.पोपटराव पवारांना माझ्या तालुक्यातील सरपंच व प्रतिनिधी आपल्याकडे घेऊन येत आहेत, याची पूर्वकल्पना अगोदरच दिली होती. यामुळे ते आमची वाट पाहत थांबले होते. सततचा दुष्काळ, अल्प पावसाचे प्रमाण अशा भौगोलिक स्थितीमध्ये असलेलं त्यांचं हिवरेबाजार. गावकºयांना बरोबर घेऊन एक सरपंच काय करू शकतो? याचं उत्तम, प्रेरणादायी व मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पोपटराव पवार! जलसंधारण व पाणलोट विकासातून गावाची समृद्धी हे सूत्र हिवरेबाजारने अंगीकारले आहे.लोकसहभाग व शासन योजना यांचा मेळ घालून माथ्यापासून पायथ्यापर्यंत पाणलोट विकासाचे काम हिवरेबाजार ग्रामस्थांनी साकारले आहे. सीसीटीव्ही, बंधारे, चरखुदाई, बांधबंदिस्ती, वृक्षारोपण यांतून गावांचा चेहरामोहरा बदलविला आहे. चराई बंदी, कुराड बंदी व नशाबंदी या त्रिसूत्री कार्यक्रमामुळे गावाने देशामध्ये वेगळा आदर्श निर्माण केला आहे. ही सगळी कामे पवार यांनी आम्हाला दाखविली होती. यानंतर ग्रामपंचायतीत सरपंच व ग्रामसेवकांना कृतिशील मार्गदर्शन केले होते. यामुळे आमच्या सरपंचांमधला त्यांनी माणूस जागा केला होता. एक सभापती तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या विकासासाठी व सरपंचांच्या क्षमता बांधणीसाठी असा सकारात्मक विचार करू शकतो हे देशातील एकमेव उदाहरण आहे, असे कौतुकास्पद उद्गार अण्णा हजारे व पोपटराव पवार यांनी माझ्याबद्दल काढले होते.लोकप्रतिनिधी आपल्या गावाचा कायापालट करू शकतो, हा यशस्वी मंत्र आम्हाला मिळाला होता. या यशोगाथा बघितल्यामुळे मन, आचार व विचार यांना ऊर्जा मिळाली होती. आम्ही परत येताना पूर्वीचे गटविकास अधिकारी ओमप्रकाश गव्हाणे हे त्यावेळी पुणे जिल्ह्यातील शिरूर पंचायत समितीमध्ये कार्यरत होते. त्यांनी कोरेगाव-भीमा ग्रामपंचायतीला भेटीचे नियोजन केले होते. त्यानंतर आम्हा सर्वांच्या भोजनाची व्यवस्था शिरुर पंचायत समितीने केली होती. पन्हाळ्याचे सर्व सभापती व सरपंच आपल्याकडे आले आहेत, या आनंदाने गव्हाणे भारावले होते. आमच्या पहिल्याच अभ्यास सहलीमधून भविष्यातील पन्हाळा तालुक्याच्या विकासाची उत्तुंग भरारी मिळाली होती.(लेखक ग्रामविकास व व्यसनमुक्ती चळवळीचे बिनीचे कार्यकर्ते आहेत.)