शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

गाव तसं चांगलं; पण राजकारणाने टांगलं!

By admin | Updated: April 28, 2015 00:27 IST

चाफळ-माजगावमध्ये वाढली दुही : युवकांतील वाद ठरतोय कारण; ग्रामस्थ चिंतेत

चाफळ : पाटण तालुक्यातील माजगांव व चाफळ ही दोन्ही गावे शांत आणी समृध्द. दोन्ही गावांना ऐतिहासिक व राजकिय वारसा लाभलेला; पण सध्या याच दोन्ही गावातील युवकांमध्ये दुही निर्माण झाली आहे. येथील ग्रामस्थांमध्ये असणारा एकोपा कमी झाला आहे. युवकांमध्ये वारंवार या ना त्या कारणाने वादावादीचे प्रकार घडत असल्याने या गावांचे गावपणच हरवुन गेल्याचे दिसुन येत आहे.माजगाव व चाफळ ही दोन गावे तालुक्यात संवेदनशिल म्हणुन ओळखली जातात. या दोन्ही गावांचा इतीहास वेगळा आहे. सुसंस्कत व सुविचारी गावे म्हणुन या गावांकडे विभागातिल जनता नेहमीच पाहते. एखादा अडला, नडला तर येथील ग्रामस्थ त्याला मदतीचा हात देतात. मात्र, सध्या या दोन्ही गावातील तरूण एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. राजकारणाच्या वेडात येथील तरूण आपल्याच पायावर दगड मारत एकमेकांची डोकी फोडण्याचे प्रकार करीत आहेत. दोन्ही गावातील तरूण नेहमिच किरकोळ कारणावरून हाणामारी करताना दिसतात. याचा त्रास ग्रामस्थांबरोबर महिलांनाही सहन करावा लागत आहे. एखाद्या ठिकाणी किरकोळ वादावादी झाल्यास त्याला लगेचच राजकारणाची झालर लावली जाते. त्यातुनच ही किरकोळ वादावादी गंभीर रूप धारण करते. राजकारणी मंडळी प्रतिष्ठेचा विषय बनवुन आगित तेल ओतण्याचा प्रकार करताना दिसुन येतात. या सर्व प्रकारांमुळे पुर्वीचे या गावांचे गावपण हरवुन गेले आहे. या तरूणांच्या हाती आता लाकडी दांडकी व शस्त्रे दिसु लागली आहेत. काही दिवसांपुर्वी चाफळच्या महाविद्यालय परिसरात किरकोळ कारणावरून घडलेल्या प्रकारामुळे माजगांव व चाफळच्या युवकांमध्ये जोरदार राडा झाला होता. हे होतेय न होतेय तोपर्यंत पुन्हा माजगावच्या एका तरूणाने उंब्रजमध्ये चाफळच्या युवकाला मारहाण केल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने हे प्रकरण तेथेच मिटले. त्यानंतर गत आठ दिवसांपुर्वी चाफळच्या एका तरूणाने माजगावमध्ये जावुन तेथील तरूणाच्या कानशिलात लगावल्याने पुन्हा चाफळ व माजगांव या गावांमध्ये दुफळी निर्माण झाली. हे सर्व प्रकार भरवस्तीत गजबजलेल्या ठिकाणी दिवसाढवळ्या घडत असताना सर्वजण बघ्याची भुमिका घेत होते. विधानसभा निवडणुक काळातही एका युवकाकडे वाघजाईवाडी गावाजवळ धारदार शस्त्र आढळुन आले होते. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधींमुळे ते प्रकरण तिथेच मिटवले गेले. राजकिय दबावामुळे मारामारी करणाऱ्या युवकांवर कारवाई होत नाही. त्यामुळे युवकांवर कोणाचाही वचक राहिलेला नाही. (प्रतिनिधी)ज्येष्ठ ग्रामस्थांनी पुढाकार घेणे गरजेचेयुवकांमध्ये होत असलेल्या वादावादीच्या घटनांना चाप लावले गरजेचे आहे. त्यासाठी युवकांना मार्गदर्शन होणे व या वादावादीचे दुष्परीणाम त्यांना समजावून सांगणे गरजेचे आहे. दोन्ही गावातील ज्येष्ठ ग्रामस्थांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा. ज्येष्ठ ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन युवकांची समजूत घातल्यास हे प्रकार लवकर थांबतील. तसेच या दोन्ही गावांमध्ये पुर्वीप्रमाणे एकोपा निर्माण होईल.