शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
Daily Top 2Weekly Top 5

गाव तसं चांगलं; पण राजकारणाने टांगलं!

By admin | Updated: April 28, 2015 00:27 IST

चाफळ-माजगावमध्ये वाढली दुही : युवकांतील वाद ठरतोय कारण; ग्रामस्थ चिंतेत

चाफळ : पाटण तालुक्यातील माजगांव व चाफळ ही दोन्ही गावे शांत आणी समृध्द. दोन्ही गावांना ऐतिहासिक व राजकिय वारसा लाभलेला; पण सध्या याच दोन्ही गावातील युवकांमध्ये दुही निर्माण झाली आहे. येथील ग्रामस्थांमध्ये असणारा एकोपा कमी झाला आहे. युवकांमध्ये वारंवार या ना त्या कारणाने वादावादीचे प्रकार घडत असल्याने या गावांचे गावपणच हरवुन गेल्याचे दिसुन येत आहे.माजगाव व चाफळ ही दोन गावे तालुक्यात संवेदनशिल म्हणुन ओळखली जातात. या दोन्ही गावांचा इतीहास वेगळा आहे. सुसंस्कत व सुविचारी गावे म्हणुन या गावांकडे विभागातिल जनता नेहमीच पाहते. एखादा अडला, नडला तर येथील ग्रामस्थ त्याला मदतीचा हात देतात. मात्र, सध्या या दोन्ही गावातील तरूण एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. राजकारणाच्या वेडात येथील तरूण आपल्याच पायावर दगड मारत एकमेकांची डोकी फोडण्याचे प्रकार करीत आहेत. दोन्ही गावातील तरूण नेहमिच किरकोळ कारणावरून हाणामारी करताना दिसतात. याचा त्रास ग्रामस्थांबरोबर महिलांनाही सहन करावा लागत आहे. एखाद्या ठिकाणी किरकोळ वादावादी झाल्यास त्याला लगेचच राजकारणाची झालर लावली जाते. त्यातुनच ही किरकोळ वादावादी गंभीर रूप धारण करते. राजकारणी मंडळी प्रतिष्ठेचा विषय बनवुन आगित तेल ओतण्याचा प्रकार करताना दिसुन येतात. या सर्व प्रकारांमुळे पुर्वीचे या गावांचे गावपण हरवुन गेले आहे. या तरूणांच्या हाती आता लाकडी दांडकी व शस्त्रे दिसु लागली आहेत. काही दिवसांपुर्वी चाफळच्या महाविद्यालय परिसरात किरकोळ कारणावरून घडलेल्या प्रकारामुळे माजगांव व चाफळच्या युवकांमध्ये जोरदार राडा झाला होता. हे होतेय न होतेय तोपर्यंत पुन्हा माजगावच्या एका तरूणाने उंब्रजमध्ये चाफळच्या युवकाला मारहाण केल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने हे प्रकरण तेथेच मिटले. त्यानंतर गत आठ दिवसांपुर्वी चाफळच्या एका तरूणाने माजगावमध्ये जावुन तेथील तरूणाच्या कानशिलात लगावल्याने पुन्हा चाफळ व माजगांव या गावांमध्ये दुफळी निर्माण झाली. हे सर्व प्रकार भरवस्तीत गजबजलेल्या ठिकाणी दिवसाढवळ्या घडत असताना सर्वजण बघ्याची भुमिका घेत होते. विधानसभा निवडणुक काळातही एका युवकाकडे वाघजाईवाडी गावाजवळ धारदार शस्त्र आढळुन आले होते. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधींमुळे ते प्रकरण तिथेच मिटवले गेले. राजकिय दबावामुळे मारामारी करणाऱ्या युवकांवर कारवाई होत नाही. त्यामुळे युवकांवर कोणाचाही वचक राहिलेला नाही. (प्रतिनिधी)ज्येष्ठ ग्रामस्थांनी पुढाकार घेणे गरजेचेयुवकांमध्ये होत असलेल्या वादावादीच्या घटनांना चाप लावले गरजेचे आहे. त्यासाठी युवकांना मार्गदर्शन होणे व या वादावादीचे दुष्परीणाम त्यांना समजावून सांगणे गरजेचे आहे. दोन्ही गावातील ज्येष्ठ ग्रामस्थांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा. ज्येष्ठ ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन युवकांची समजूत घातल्यास हे प्रकार लवकर थांबतील. तसेच या दोन्ही गावांमध्ये पुर्वीप्रमाणे एकोपा निर्माण होईल.