शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

गावांचा एल्गार; पंचगंगा प्रदूषण हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:17 IST

रुकडी, माणगाव : पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करावी, या मागणीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील माने यांनी शुक्रवारी रुकडी येथे नदीपात्रातच उतरून साखळी उपोषणास सुरुवात केली. रुकडी येथील ग्रामस्थांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. त्यांनी सर्व व्यवहार बंद ठेऊन या उपोषणास पाठिंबा दिला.पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी समन्वय बैठक बोलवावी, या ...

रुकडी, माणगाव : पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करावी, या मागणीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील माने यांनी शुक्रवारी रुकडी येथे नदीपात्रातच उतरून साखळी उपोषणास सुरुवात केली. रुकडी येथील ग्रामस्थांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. त्यांनी सर्व व्यवहार बंद ठेऊन या उपोषणास पाठिंबा दिला.पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी समन्वय बैठक बोलवावी, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी माने यांनी साखळी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांनी पंचगंगा बचाव कृती समितीची स्थापना केली व हातकणगंले, शिरोळ तालुक्यांतील पंचगंगा प्रदूषणामुळे बाधित गावांतील नागरिकांना साखळी उपोषण करून या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी रुकडी येथील राजेबागस्वार दर्गा येथून पंचगंगा नदीपर्यंत निषेध फेरी काढण्यात आली. या फेरीत महिलांसह बालचमू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी विविध घोषणांनी परिसर दुमदुमला. महिला पंचगंगा बचावकरिता विविध फलक घेऊन सहभागी झाल्या होत्या.फेरी नदीकाठावर आली असता नदीपात्रात उतरून उपोषणास सुरुवात झाली. नदीपात्रातच माने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यानंतर ही फेरी चावडी चौकात आल्यानंतर साखळी उपोषणास सुरुवात झाली.माजी जि. प. सदस्य बबलू मकानदार, माजी पं. स. सदस्य भगवान जाधव, सरपंच रफीक कलावंत, उपसरपंच शीतल खोत, डॉ. विजय पोवार, मुश्ताक पटेल, सामाजिक कार्यकर्ते अमोल कुलकर्णी, राजू अपराध, भरत सुतार, विजय पाटील, शिवाजी घोरपडेसह ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते.निशिंगधाने लक्ष वेधलेयेथील तृतीयपंथीय निशिगंधा लोखंडे हिने पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त झाली पाहिजे, याकरिता आंदोलनात हिरीरिने सहभाग घेतला. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, याकरिता विनंती करीत होती. तिचा सहभाग लक्ष वेधून घेत होता.