शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

गावांचा एल्गार; पंचगंगा प्रदूषण हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:17 IST

रुकडी, माणगाव : पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करावी, या मागणीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील माने यांनी शुक्रवारी रुकडी येथे नदीपात्रातच उतरून साखळी उपोषणास सुरुवात केली. रुकडी येथील ग्रामस्थांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. त्यांनी सर्व व्यवहार बंद ठेऊन या उपोषणास पाठिंबा दिला.पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी समन्वय बैठक बोलवावी, या ...

रुकडी, माणगाव : पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करावी, या मागणीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील माने यांनी शुक्रवारी रुकडी येथे नदीपात्रातच उतरून साखळी उपोषणास सुरुवात केली. रुकडी येथील ग्रामस्थांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. त्यांनी सर्व व्यवहार बंद ठेऊन या उपोषणास पाठिंबा दिला.पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी समन्वय बैठक बोलवावी, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी माने यांनी साखळी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांनी पंचगंगा बचाव कृती समितीची स्थापना केली व हातकणगंले, शिरोळ तालुक्यांतील पंचगंगा प्रदूषणामुळे बाधित गावांतील नागरिकांना साखळी उपोषण करून या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी रुकडी येथील राजेबागस्वार दर्गा येथून पंचगंगा नदीपर्यंत निषेध फेरी काढण्यात आली. या फेरीत महिलांसह बालचमू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी विविध घोषणांनी परिसर दुमदुमला. महिला पंचगंगा बचावकरिता विविध फलक घेऊन सहभागी झाल्या होत्या.फेरी नदीकाठावर आली असता नदीपात्रात उतरून उपोषणास सुरुवात झाली. नदीपात्रातच माने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यानंतर ही फेरी चावडी चौकात आल्यानंतर साखळी उपोषणास सुरुवात झाली.माजी जि. प. सदस्य बबलू मकानदार, माजी पं. स. सदस्य भगवान जाधव, सरपंच रफीक कलावंत, उपसरपंच शीतल खोत, डॉ. विजय पोवार, मुश्ताक पटेल, सामाजिक कार्यकर्ते अमोल कुलकर्णी, राजू अपराध, भरत सुतार, विजय पाटील, शिवाजी घोरपडेसह ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते.निशिंगधाने लक्ष वेधलेयेथील तृतीयपंथीय निशिगंधा लोखंडे हिने पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त झाली पाहिजे, याकरिता आंदोलनात हिरीरिने सहभाग घेतला. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, याकरिता विनंती करीत होती. तिचा सहभाग लक्ष वेधून घेत होता.