शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
2
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
3
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
4
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
5
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
6
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
7
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
8
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
9
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
10
“शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवले जातायत, शक्तिपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी”: नितेश राणे
11
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 
12
गिअरवाली बाईक, ती ही इलेक्ट्रीक...! काय मॅटर हाय...; २५ पैशांचा खर्च फक्त...
13
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
14
बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं, लग्नही केलं... पाकिस्तानात १५ वर्षीय हिंदू मुलीचे झाले हाल
15
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
16
केरळमध्ये अडकलेल्या F-35 लढाऊ विमानाची दुरुस्ती अशक्य, तुकडे करुन ब्रिटनला घेऊन जाणार
17
एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान
18
बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
19
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
20
'माऊस जगलर' वापरून एकाचवेळी ५ कंपन्यात नोकरी; वर्षात ७ कोटींची कमाई; कसा झाला भांडाफोड?

ग्रामसंग्राम आजपासून

By admin | Updated: July 4, 2015 00:45 IST

ज्या गावात ज्याची भावकी मोठी त्यांना निवडणुकीत विजयाची संधी मोठी असते.

कोल्हापूर : ग्रामीण भागातील वातावरण ढवळून काढणाऱ्या आणि राजकारणाची नशा घराघरांत, प्रत्येकाच्या अंगात भिनविणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम आज, शनिवारपासून सुरू होत आहे. जिल्ह्यातील ४२४ ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक होत आहे. याचवेळी ४८ ग्रामपंचायतींत पोटनिवडणूकही होणार आहे. उमेदवारी अर्ज त्या-त्या तहसीलदार कार्यालयात भरले जातील. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. १० जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचे आहेत. या निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील राजकारण पराकोटीला पोहोचलेले पहायला मिळणार आहे. या निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाने थेट सहभाग घेतला नसला तरी सर्वच पक्षांचे कार्यकर्ते ही निवडणूक लढविणार आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने गावातील आपले राजकारण टिकविण्यासाठी स्थानिक गटांनी कंबर कसली आहे. गटाचे उमेदवार कोण असावेत याचीही चाचपणी झाली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर भावकीचा प्रभावही मोठा असतो. त्यामुळे ज्या गावात ज्याची भावकी मोठी त्यांना निवडणुकीत विजयाची संधी मोठी असते. त्यामुळे अशा पातळीवरही स्थानिक गटांनी निवडणुकीची तयारी केली आहे. निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणासुद्धा कार्यरत झाली असून ४६४ निवडणूक अधिकारी नियुक्त केले आहेत. (प्रतिनिधी)