शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

कागलची अर्थवाहिनी ‘विक्रमसिंह घाटगे बँक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:41 IST

जहाँगीर शेख । लोकमत न्यूज नेटवर्क कागल : संपूर्ण हिंदुस्तानवर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित झाल्यानंतरही देशातील काही संस्थानांचा स्वतंत्र कारभार ...

जहाँगीर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्ककागल : संपूर्ण हिंदुस्तानवर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित झाल्यानंतरही देशातील काही संस्थानांचा स्वतंत्र कारभार कायम होता. अशा काही मोजक्या संस्थानात ‘करवीर’, ‘कागल’चा समावेश होता.कागलच्या घाटगे घराण्यातील ‘यशवंतराव’ कोल्हापूरच्या छत्रपतींच्या गादीला दत्तक गेले आणि पुढे राजर्षी छत्रपती शाहू महाराज म्हणून जगभर ख्यातीप्राप्त झाले. त्यांनी आपल्या राज्यात जगभरात जनहिताचे जे जे काही नव्याने समोर आले, ते ते आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचे बंधू श्रीमंत पिराजीराव ऊर्फ बापूसाहेब महाराज यांनी हे नवीन बदल व उपक्रम कागल जहागिरीतही अमलात आणले. त्यापैकीच एक म्हणजे ‘सहकार चळवळ’ होय. २१ जुलै १९१७ रोजी कागलमध्ये स्थापन झालेली सहकार तत्त्वावरील पतपेढी म्हणजेच आजची राजे विक्रमसिंह घाटगे को-आॅपरेटिव्ह बँक होय.कागलचे तत्कालीन अधिपती असलेल्या श्रीमंत बापूसाहेब महाराज यांना ‘पुत्ररत्न’ झाले. या दिवशी म्हणजे ८ जुलै १९१७ रोजी ही ‘पतपेढी’ स्थापण्याची मुहूर्तमेढ रोवली आणि २१ जुलैला तशी रीतसर नोंदणी झाली. १९१२ च्या मुंबई इलाखा सहकार कायद्यान्वये ही पतपेढी नोंदवली गेली. एकशे दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या ‘अनलिमिटेड’ पतपेढीचे १९३६ मध्ये ‘लिमिटेड’मध्ये, तर १९४३ मध्ये ‘दि कागल सेंट्रल क ो-आॅप. बँक लि.’ असे रूपांतर झाले. १९४७ ला देश स्वतंत्र झाल्यानंतर कागलचे संस्थानही भारतीय संघराज्यात विलीन झाले. सहकार खात्यांतर्गत ही बँक आली; पण घाटगे घराण्याचे मार्गदर्शन आणि प्रेम या बँकेस कायम मिळत राहिले. बापूसाहेब महाराजांच्या निधनानंतर कागलचा कारभार श्रीमंत जयसिंगराव ऊर्फ बाळ महाराज पाहत होते. स्वातंत्र्यानंतर १९७० च्या दशकात बाळ महाराजांचे चिरंजीव स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांनी बँकेच्या कामकाजावर लक्ष केंद्रित केले. त्यांनी बँकेला विश्वासार्हतेबरोबरच आर्थिक वैभव प्राप्त करून दिले. त्यांचे या बँकेवर खूप प्रेम होते. विक्रमसिंह यांच्या निधनानंतर समरजित घाटगे यांनी बँकेची धुरा हाती घेतली. ते स्वत:च सी.ए. असल्याने आज ही बँक चौफेर प्रगतिपथावर आहे. सभासदांच्या मागणीवरून या बँकेचे दोन वर्षांपूर्वी ‘राजे विक्रमसिंह घाटगे को-आॅपरेटिव्ह बँक’ असे नामकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, सुहासिनीदेवी विक्रमसिंह घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी ३० वर्षे स्थापन झालेल्या या बँकेचा हा वैभवशाली प्रवास समस्त कागलवासीयांना अभिमानास्पद असाच आहे. २४ विविध पारितोषिकांची मानकरी असलेल्या बँकेने आधुनिक बँकिंग प्रणाली आत्मसात केली आहे.धान्य आणिकापड व्यापारही१९४० च्या सुमारास दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची महागाई वाढली होती. लोकांना पुरेसे व योग्य किमतीत धान्य मिळावे म्हणून या बँकेने धान्य तसेच कापड विक्री सुरू केली होती. बाजरी, ज्वारी, मिरची, चहापूड, आगपेट्या, तूरडाळ, तेल, आदी वस्तू विक्रीस उपलब्ध होत्या. स्वातंत्र्यानंतर म्हणजे १९५० मध्ये दोन रेशनकार्ड दुकानेही ही बँक चालवीत होती. नंतर कालौघात केवळ आर्थिक व्यवहारच राहिले.