शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

कागलची अर्थवाहिनी ‘विक्रमसिंह घाटगे बँक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:41 IST

जहाँगीर शेख । लोकमत न्यूज नेटवर्क कागल : संपूर्ण हिंदुस्तानवर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित झाल्यानंतरही देशातील काही संस्थानांचा स्वतंत्र कारभार ...

जहाँगीर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्ककागल : संपूर्ण हिंदुस्तानवर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित झाल्यानंतरही देशातील काही संस्थानांचा स्वतंत्र कारभार कायम होता. अशा काही मोजक्या संस्थानात ‘करवीर’, ‘कागल’चा समावेश होता.कागलच्या घाटगे घराण्यातील ‘यशवंतराव’ कोल्हापूरच्या छत्रपतींच्या गादीला दत्तक गेले आणि पुढे राजर्षी छत्रपती शाहू महाराज म्हणून जगभर ख्यातीप्राप्त झाले. त्यांनी आपल्या राज्यात जगभरात जनहिताचे जे जे काही नव्याने समोर आले, ते ते आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचे बंधू श्रीमंत पिराजीराव ऊर्फ बापूसाहेब महाराज यांनी हे नवीन बदल व उपक्रम कागल जहागिरीतही अमलात आणले. त्यापैकीच एक म्हणजे ‘सहकार चळवळ’ होय. २१ जुलै १९१७ रोजी कागलमध्ये स्थापन झालेली सहकार तत्त्वावरील पतपेढी म्हणजेच आजची राजे विक्रमसिंह घाटगे को-आॅपरेटिव्ह बँक होय.कागलचे तत्कालीन अधिपती असलेल्या श्रीमंत बापूसाहेब महाराज यांना ‘पुत्ररत्न’ झाले. या दिवशी म्हणजे ८ जुलै १९१७ रोजी ही ‘पतपेढी’ स्थापण्याची मुहूर्तमेढ रोवली आणि २१ जुलैला तशी रीतसर नोंदणी झाली. १९१२ च्या मुंबई इलाखा सहकार कायद्यान्वये ही पतपेढी नोंदवली गेली. एकशे दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या ‘अनलिमिटेड’ पतपेढीचे १९३६ मध्ये ‘लिमिटेड’मध्ये, तर १९४३ मध्ये ‘दि कागल सेंट्रल क ो-आॅप. बँक लि.’ असे रूपांतर झाले. १९४७ ला देश स्वतंत्र झाल्यानंतर कागलचे संस्थानही भारतीय संघराज्यात विलीन झाले. सहकार खात्यांतर्गत ही बँक आली; पण घाटगे घराण्याचे मार्गदर्शन आणि प्रेम या बँकेस कायम मिळत राहिले. बापूसाहेब महाराजांच्या निधनानंतर कागलचा कारभार श्रीमंत जयसिंगराव ऊर्फ बाळ महाराज पाहत होते. स्वातंत्र्यानंतर १९७० च्या दशकात बाळ महाराजांचे चिरंजीव स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांनी बँकेच्या कामकाजावर लक्ष केंद्रित केले. त्यांनी बँकेला विश्वासार्हतेबरोबरच आर्थिक वैभव प्राप्त करून दिले. त्यांचे या बँकेवर खूप प्रेम होते. विक्रमसिंह यांच्या निधनानंतर समरजित घाटगे यांनी बँकेची धुरा हाती घेतली. ते स्वत:च सी.ए. असल्याने आज ही बँक चौफेर प्रगतिपथावर आहे. सभासदांच्या मागणीवरून या बँकेचे दोन वर्षांपूर्वी ‘राजे विक्रमसिंह घाटगे को-आॅपरेटिव्ह बँक’ असे नामकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, सुहासिनीदेवी विक्रमसिंह घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी ३० वर्षे स्थापन झालेल्या या बँकेचा हा वैभवशाली प्रवास समस्त कागलवासीयांना अभिमानास्पद असाच आहे. २४ विविध पारितोषिकांची मानकरी असलेल्या बँकेने आधुनिक बँकिंग प्रणाली आत्मसात केली आहे.धान्य आणिकापड व्यापारही१९४० च्या सुमारास दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची महागाई वाढली होती. लोकांना पुरेसे व योग्य किमतीत धान्य मिळावे म्हणून या बँकेने धान्य तसेच कापड विक्री सुरू केली होती. बाजरी, ज्वारी, मिरची, चहापूड, आगपेट्या, तूरडाळ, तेल, आदी वस्तू विक्रीस उपलब्ध होत्या. स्वातंत्र्यानंतर म्हणजे १९५० मध्ये दोन रेशनकार्ड दुकानेही ही बँक चालवीत होती. नंतर कालौघात केवळ आर्थिक व्यवहारच राहिले.