शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

कागलची अर्थवाहिनी ‘विक्रमसिंह घाटगे बँक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:41 IST

जहाँगीर शेख । लोकमत न्यूज नेटवर्क कागल : संपूर्ण हिंदुस्तानवर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित झाल्यानंतरही देशातील काही संस्थानांचा स्वतंत्र कारभार ...

जहाँगीर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्ककागल : संपूर्ण हिंदुस्तानवर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित झाल्यानंतरही देशातील काही संस्थानांचा स्वतंत्र कारभार कायम होता. अशा काही मोजक्या संस्थानात ‘करवीर’, ‘कागल’चा समावेश होता.कागलच्या घाटगे घराण्यातील ‘यशवंतराव’ कोल्हापूरच्या छत्रपतींच्या गादीला दत्तक गेले आणि पुढे राजर्षी छत्रपती शाहू महाराज म्हणून जगभर ख्यातीप्राप्त झाले. त्यांनी आपल्या राज्यात जगभरात जनहिताचे जे जे काही नव्याने समोर आले, ते ते आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचे बंधू श्रीमंत पिराजीराव ऊर्फ बापूसाहेब महाराज यांनी हे नवीन बदल व उपक्रम कागल जहागिरीतही अमलात आणले. त्यापैकीच एक म्हणजे ‘सहकार चळवळ’ होय. २१ जुलै १९१७ रोजी कागलमध्ये स्थापन झालेली सहकार तत्त्वावरील पतपेढी म्हणजेच आजची राजे विक्रमसिंह घाटगे को-आॅपरेटिव्ह बँक होय.कागलचे तत्कालीन अधिपती असलेल्या श्रीमंत बापूसाहेब महाराज यांना ‘पुत्ररत्न’ झाले. या दिवशी म्हणजे ८ जुलै १९१७ रोजी ही ‘पतपेढी’ स्थापण्याची मुहूर्तमेढ रोवली आणि २१ जुलैला तशी रीतसर नोंदणी झाली. १९१२ च्या मुंबई इलाखा सहकार कायद्यान्वये ही पतपेढी नोंदवली गेली. एकशे दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या ‘अनलिमिटेड’ पतपेढीचे १९३६ मध्ये ‘लिमिटेड’मध्ये, तर १९४३ मध्ये ‘दि कागल सेंट्रल क ो-आॅप. बँक लि.’ असे रूपांतर झाले. १९४७ ला देश स्वतंत्र झाल्यानंतर कागलचे संस्थानही भारतीय संघराज्यात विलीन झाले. सहकार खात्यांतर्गत ही बँक आली; पण घाटगे घराण्याचे मार्गदर्शन आणि प्रेम या बँकेस कायम मिळत राहिले. बापूसाहेब महाराजांच्या निधनानंतर कागलचा कारभार श्रीमंत जयसिंगराव ऊर्फ बाळ महाराज पाहत होते. स्वातंत्र्यानंतर १९७० च्या दशकात बाळ महाराजांचे चिरंजीव स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांनी बँकेच्या कामकाजावर लक्ष केंद्रित केले. त्यांनी बँकेला विश्वासार्हतेबरोबरच आर्थिक वैभव प्राप्त करून दिले. त्यांचे या बँकेवर खूप प्रेम होते. विक्रमसिंह यांच्या निधनानंतर समरजित घाटगे यांनी बँकेची धुरा हाती घेतली. ते स्वत:च सी.ए. असल्याने आज ही बँक चौफेर प्रगतिपथावर आहे. सभासदांच्या मागणीवरून या बँकेचे दोन वर्षांपूर्वी ‘राजे विक्रमसिंह घाटगे को-आॅपरेटिव्ह बँक’ असे नामकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, सुहासिनीदेवी विक्रमसिंह घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी ३० वर्षे स्थापन झालेल्या या बँकेचा हा वैभवशाली प्रवास समस्त कागलवासीयांना अभिमानास्पद असाच आहे. २४ विविध पारितोषिकांची मानकरी असलेल्या बँकेने आधुनिक बँकिंग प्रणाली आत्मसात केली आहे.धान्य आणिकापड व्यापारही१९४० च्या सुमारास दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची महागाई वाढली होती. लोकांना पुरेसे व योग्य किमतीत धान्य मिळावे म्हणून या बँकेने धान्य तसेच कापड विक्री सुरू केली होती. बाजरी, ज्वारी, मिरची, चहापूड, आगपेट्या, तूरडाळ, तेल, आदी वस्तू विक्रीस उपलब्ध होत्या. स्वातंत्र्यानंतर म्हणजे १९५० मध्ये दोन रेशनकार्ड दुकानेही ही बँक चालवीत होती. नंतर कालौघात केवळ आर्थिक व्यवहारच राहिले.