शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्यांची गय नको

By admin | Updated: May 21, 2017 00:47 IST

विभागीय आयुक्तांच्या प्रदूषण नियंत्रणला सूचना : ३१ गावांसाठी शंभर कोटींचा आराखडा तयार

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेसह सर्वच घटकांना ठरावीक कालावधी द्या. त्या कालावधीत शुद्धिकरण प्रकल्प उभे केले नाहीत, तर त्यांची गय करू नका, अशा सूचना पंचगंगा प्रदूषणाबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाला केल्याची माहिती विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. ३९ गावांवरच लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देऊन त्यातील आठ गावांचा प्रश्न नाबार्डच्या मदतीने मार्गी लागला आहे. उर्वरित ३१ गावांसाठी जिल्हा परिषदेने शंभर कोटींचा आराखडा तयार केला असून, तो लवकरच सरकारकडे पाठविण्याची सूचनाही संबधितांना केल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, महापालिकेचे शुद्धिकरण प्रकल्प प्रगतिपथावर असून, इचलकरंजी ‘एसटीपी’ प्लॅन्ट जागेअभावी प्रलंबित आहेत. १७४ गावांतील सांडपाण्याचा प्रश्न आहे; पण त्यापैकी ३९ गावे ७० टक्के प्रदूषण करतात. त्यामुळे पहिल्या टप्प्यात तेथील सांडपाण्याबाबत उपाय करावे लागणार आहेत. त्यातील आठ गावांमध्ये नाबार्डच्या सहकार्याने शुद्धीकरण प्रकल्प मंजूर झाले आहेत. उर्वरित ३१ गावांकडे आता लक्ष द्यावे लागणार आहे. जिल्हा परिषदेने २०१४ ला ३९ गावांचा १०८ कोटींचा आराखडा सादर केला होता; पण आता ३१ गावांचा आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय दहा साखर कारखाने व औद्योगिक वसाहतीमधून प्रदूषण होते. यासाठी त्यांना युनिटनिहाय नोटिसा देऊन कालमर्यादा द्या. जादा गाळप करणाऱ्यांनी क्षमता वाढवावीगेल्या हंगामात क्षमतेपेक्षा जादा गाळप करणाऱ्या साखर कारखान्यांवर फौजदारी दाखल केली आहे. त्यांनी आपल्या वाढलेल्या सांडपाण्याचेही नियोजन करून प्लॅन्टची क्षमता वाढवावी, असे आवाहन दळवी यांनी केले. उचगाव, शिरोली पुलाची, पट्टणकोडोली, हुपरी, कबनूर, रुकडी, हातकणंगले, शिरोळ या आठ गावांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी ‘नाबार्ड’कडून प्रत्येकी साडेचार कोटी उपलब्ध होणार आहेत. यामुळे एकूण प्रदूषणापैकी ५१ टक्के प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असल्याचे दळवी यांनी सांगितले.