शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्यांची गय नको

By admin | Updated: May 21, 2017 00:47 IST

विभागीय आयुक्तांच्या प्रदूषण नियंत्रणला सूचना : ३१ गावांसाठी शंभर कोटींचा आराखडा तयार

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेसह सर्वच घटकांना ठरावीक कालावधी द्या. त्या कालावधीत शुद्धिकरण प्रकल्प उभे केले नाहीत, तर त्यांची गय करू नका, अशा सूचना पंचगंगा प्रदूषणाबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाला केल्याची माहिती विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. ३९ गावांवरच लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देऊन त्यातील आठ गावांचा प्रश्न नाबार्डच्या मदतीने मार्गी लागला आहे. उर्वरित ३१ गावांसाठी जिल्हा परिषदेने शंभर कोटींचा आराखडा तयार केला असून, तो लवकरच सरकारकडे पाठविण्याची सूचनाही संबधितांना केल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, महापालिकेचे शुद्धिकरण प्रकल्प प्रगतिपथावर असून, इचलकरंजी ‘एसटीपी’ प्लॅन्ट जागेअभावी प्रलंबित आहेत. १७४ गावांतील सांडपाण्याचा प्रश्न आहे; पण त्यापैकी ३९ गावे ७० टक्के प्रदूषण करतात. त्यामुळे पहिल्या टप्प्यात तेथील सांडपाण्याबाबत उपाय करावे लागणार आहेत. त्यातील आठ गावांमध्ये नाबार्डच्या सहकार्याने शुद्धीकरण प्रकल्प मंजूर झाले आहेत. उर्वरित ३१ गावांकडे आता लक्ष द्यावे लागणार आहे. जिल्हा परिषदेने २०१४ ला ३९ गावांचा १०८ कोटींचा आराखडा सादर केला होता; पण आता ३१ गावांचा आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय दहा साखर कारखाने व औद्योगिक वसाहतीमधून प्रदूषण होते. यासाठी त्यांना युनिटनिहाय नोटिसा देऊन कालमर्यादा द्या. जादा गाळप करणाऱ्यांनी क्षमता वाढवावीगेल्या हंगामात क्षमतेपेक्षा जादा गाळप करणाऱ्या साखर कारखान्यांवर फौजदारी दाखल केली आहे. त्यांनी आपल्या वाढलेल्या सांडपाण्याचेही नियोजन करून प्लॅन्टची क्षमता वाढवावी, असे आवाहन दळवी यांनी केले. उचगाव, शिरोली पुलाची, पट्टणकोडोली, हुपरी, कबनूर, रुकडी, हातकणंगले, शिरोळ या आठ गावांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी ‘नाबार्ड’कडून प्रत्येकी साडेचार कोटी उपलब्ध होणार आहेत. यामुळे एकूण प्रदूषणापैकी ५१ टक्के प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असल्याचे दळवी यांनी सांगितले.